शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गाडीतूनच मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन; हिंगोली पुराचा आढावा घेत दिले 'हे' निर्देश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 13:31 IST

Chief Minister Eknath Shinde : नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधून घेतला.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये ते भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधून घेतला.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे येथील कुरुंदा गाव संपूर्ण पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब समजताच त्यांनी गाडीतूनच स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच, पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. याशिवाय, काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे, असेही निर्देश त्यांना दिले.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात आज सकाळी आठ वाजेपर्यंत ६६.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, आंबा, गिरगाव, कुरुंदा या सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, कुरुंदा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी घुसले असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे. गुरे वाहून गेली, वाहने वाहून गेली तर गाव सकाळी सात वाजेपर्यंत पाण्याखालीच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. २०१६ मध्ये कुरुंदा गाव पाण्याखाली गेले होते, तेव्हाही करोडो रुपयांची हानी झाली होती. यावेळीही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. 

मिळेल तेथे घेतला आश्रयकुरुंदा गावात रात्री दोन वाजेपासून पुराचे थैमान सुरू होते, जिकडे तिकडे हाहाकार पसरला होता. एक मजली घर असलेल्यांना जीव वाचवायचा कसा? असा प्रश्न पडला होता, घरात पाणी घुसले रस्त्यावर वेगाने पाणी वाहत होते.  त्यामुळे कोणी शेजाऱ्याकडे दुसऱ्या मजल्यावर आसरा घेतला. तर काहींनी उंच भागातील शाळा ग्रामपंचायत इमारत आधी ठिकाणी आश्रय घेतल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेHingoliहिंगोलीfloodपूर