शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वंचित वर्गाच्या विकासाला पेमेंट बँकेच्या माध्यमातून गती मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 02:18 IST

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा प्रारंभ ही मोठी क्रांती असून याद्वारे टपाल खात्याच्या माध्यमातून सरकारची अनुदाने व निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे सोपे होईल.

मुंबई : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा प्रारंभ ही मोठी क्रांती असून याद्वारे टपाल खात्याच्या माध्यमातून सरकारची अनुदाने व निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे सोपे होईल. विकासापासून वंचित राहिलेल्या वर्गाच्या विकासाला या माध्यमातून गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई जीपीओमध्ये झालेल्या कार्यक्रमात गिरगाव येथील पेमेंट बँकेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी करण्यात झाले.राज्यातील ४२ शाखा व १६८ अ‍ॅक्सेस पॉइंटचे उद्घाटन शनिवारी राज्यभरात करण्यात आले. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या प्रारंभानिमित्त टपाल खात्यातर्फे विशेष पोस्टाचे कव्हर प्रसिद्ध करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरिश अग्रवाल, आमदार राज पुरोहित आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधानांच्या माध्यमातून टपाल खात्याच्या पेमेंट बँकेची सुरुवात झाल्याने देशाच्या इतिहासामध्ये नवीन अध्याय जोडला गेला आहे.बँकिंग क्षेत्राला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सध्या देशात बँकांच्या १ लाख शाखा आहेत.मात्र, देशाचा मोठा विभाग बँकांपासून दूर आहे. आर्थिक समावेशन हे विकासाचे पहिले पाऊल आहे. त्यामुळे या बँकेच्या माध्यमातून या मोठ्या वर्गाचे आर्थिक समावेशन होऊन त्यांच्या विकासाला गती मिळेल.ांतप्रधानांनी जनधन योजनेच्या माध्यमातून ३२ कोटी कुटुंबीयांना बँकांसोबत जोडले. सध्या देशातील सर्वांत मोठे नेटवर्क टपालाचे आहे. प्रत्येक खेड्यापाड्यात टपाल खाते कार्यरत आहे. सोशल मीडियाच्या काळात टपाल खात्याची उपयुक्तता कमी होण्याची भीती होती. मात्र या माध्यमातून खात्यासमोरील आव्हानाला संधीत रूपांतरित करण्यात आले आहे.टपाल खात्याद्वारे झालेली मोठी क्रांतीदेशात ३ लाख बँक शाखांची एका दिवसात वाढ झाली आहे. या बँकेचा राज्यात पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला. डिजिटल व्यवस्थेमुळे दिल्लीतून पाठवलेला पूर्ण रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. हा बदल महत्त्वपूर्ण आहे. गेल्या तीन वर्षांत सरकारी अनुदान थेट खात्यात देण्यामुळे (डीबीटी) देशात ७५ हजार कोटींची बचत झाली आहे. सरकारची विविध अनुदाने, शिष्यवृत्ती थेट पोहोचेल, कोणत्याही प्रकारचा मध्यस्थ यामध्ये येणार नाहीत त्यामुळे टपाल खात्याद्वारे झालेली ही मोठी क्रांती आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री