शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

वंचित वर्गाच्या विकासाला पेमेंट बँकेच्या माध्यमातून गती मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 02:18 IST

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा प्रारंभ ही मोठी क्रांती असून याद्वारे टपाल खात्याच्या माध्यमातून सरकारची अनुदाने व निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे सोपे होईल.

मुंबई : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा प्रारंभ ही मोठी क्रांती असून याद्वारे टपाल खात्याच्या माध्यमातून सरकारची अनुदाने व निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे सोपे होईल. विकासापासून वंचित राहिलेल्या वर्गाच्या विकासाला या माध्यमातून गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई जीपीओमध्ये झालेल्या कार्यक्रमात गिरगाव येथील पेमेंट बँकेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी करण्यात झाले.राज्यातील ४२ शाखा व १६८ अ‍ॅक्सेस पॉइंटचे उद्घाटन शनिवारी राज्यभरात करण्यात आले. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या प्रारंभानिमित्त टपाल खात्यातर्फे विशेष पोस्टाचे कव्हर प्रसिद्ध करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरिश अग्रवाल, आमदार राज पुरोहित आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधानांच्या माध्यमातून टपाल खात्याच्या पेमेंट बँकेची सुरुवात झाल्याने देशाच्या इतिहासामध्ये नवीन अध्याय जोडला गेला आहे.बँकिंग क्षेत्राला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सध्या देशात बँकांच्या १ लाख शाखा आहेत.मात्र, देशाचा मोठा विभाग बँकांपासून दूर आहे. आर्थिक समावेशन हे विकासाचे पहिले पाऊल आहे. त्यामुळे या बँकेच्या माध्यमातून या मोठ्या वर्गाचे आर्थिक समावेशन होऊन त्यांच्या विकासाला गती मिळेल.ांतप्रधानांनी जनधन योजनेच्या माध्यमातून ३२ कोटी कुटुंबीयांना बँकांसोबत जोडले. सध्या देशातील सर्वांत मोठे नेटवर्क टपालाचे आहे. प्रत्येक खेड्यापाड्यात टपाल खाते कार्यरत आहे. सोशल मीडियाच्या काळात टपाल खात्याची उपयुक्तता कमी होण्याची भीती होती. मात्र या माध्यमातून खात्यासमोरील आव्हानाला संधीत रूपांतरित करण्यात आले आहे.टपाल खात्याद्वारे झालेली मोठी क्रांतीदेशात ३ लाख बँक शाखांची एका दिवसात वाढ झाली आहे. या बँकेचा राज्यात पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला. डिजिटल व्यवस्थेमुळे दिल्लीतून पाठवलेला पूर्ण रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. हा बदल महत्त्वपूर्ण आहे. गेल्या तीन वर्षांत सरकारी अनुदान थेट खात्यात देण्यामुळे (डीबीटी) देशात ७५ हजार कोटींची बचत झाली आहे. सरकारची विविध अनुदाने, शिष्यवृत्ती थेट पोहोचेल, कोणत्याही प्रकारचा मध्यस्थ यामध्ये येणार नाहीत त्यामुळे टपाल खात्याद्वारे झालेली ही मोठी क्रांती आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री