शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने आमदार पाटणींची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 12:16 IST

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितल्याने कारंजाची जागा पुन्हा भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा पेच कायम आहे. भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी नेतृत्व करित असलेल्या कारंजा लाड विधानसभा मतदारसंघावर यावेळी शिवसेनेने दावा केला आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपात सेना-भाजपच्या सिटींग जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याचा खुलासा शनिवारी झालेल्या पत्रकार परिषेदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने आमदार पाटणींचा मार्ग मोकळा झाला आहे. तर शिवसेना दावा करत असलेला कारंजा विधानसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा व शिवसेनेत युती न झाल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले आणि भाजपचे राजेंद्र पाटणी हे ४ हजार १४७ मतांनी विजयी झाले होते. मात्र जुन्या युतीच्या फॉर्म्युलानुसार हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आता पुन्हा युती होणार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कारंजाची जागा सेनेला सोडण्याची मागणी होती आहे. दुसरीकडे मात्र गत निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून आल्याने व यावेळीही भाजपाकडून या मतदारसंघावर दावा केला जात असल्याने या मतदार संघात मोठा पेच निर्माण झाला होता.

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितल्याने कारंजाची जागा पुन्हा भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर विद्यामान आमदार पाटणींचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे. महायुती म्हणून निवडणूक लढताना सुरवातीला इतर मित्र पक्षांच्या जागा निश्चित केल्या जाणार असून, उर्वरित जागांचे फिफ्टी-फिफ्टी वाटप करताना, सिटींग जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याचा खुलासा मुख्यमंत्री यांनी केला आहे. तर एखादी दुसरी जागा अदलाबदल करायची झाल्यास त्यावर चर्चा केली जाणार असल्याचे सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले. 

खासदार भावना गवळी यांनी माजी आमदार प्रकाश डहाके यांचा विधानसभेत उमेदवारी देण्याच्या आश्वासन देत शिवसेनेत प्रवेश करून घेतला होता. मात्र आता युतीच्या नवीन फॉर्म्युलानुसार विद्यमान आमदार असलेल्या जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याने कारंजाची जागा भाजपच्या वाट्याला जात आहे. त्यामुळे डहाके हे आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.