शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने आमदार पाटणींची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 12:16 IST

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितल्याने कारंजाची जागा पुन्हा भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा पेच कायम आहे. भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी नेतृत्व करित असलेल्या कारंजा लाड विधानसभा मतदारसंघावर यावेळी शिवसेनेने दावा केला आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपात सेना-भाजपच्या सिटींग जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याचा खुलासा शनिवारी झालेल्या पत्रकार परिषेदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने आमदार पाटणींचा मार्ग मोकळा झाला आहे. तर शिवसेना दावा करत असलेला कारंजा विधानसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा व शिवसेनेत युती न झाल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले आणि भाजपचे राजेंद्र पाटणी हे ४ हजार १४७ मतांनी विजयी झाले होते. मात्र जुन्या युतीच्या फॉर्म्युलानुसार हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आता पुन्हा युती होणार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कारंजाची जागा सेनेला सोडण्याची मागणी होती आहे. दुसरीकडे मात्र गत निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून आल्याने व यावेळीही भाजपाकडून या मतदारसंघावर दावा केला जात असल्याने या मतदार संघात मोठा पेच निर्माण झाला होता.

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितल्याने कारंजाची जागा पुन्हा भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर विद्यामान आमदार पाटणींचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे. महायुती म्हणून निवडणूक लढताना सुरवातीला इतर मित्र पक्षांच्या जागा निश्चित केल्या जाणार असून, उर्वरित जागांचे फिफ्टी-फिफ्टी वाटप करताना, सिटींग जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याचा खुलासा मुख्यमंत्री यांनी केला आहे. तर एखादी दुसरी जागा अदलाबदल करायची झाल्यास त्यावर चर्चा केली जाणार असल्याचे सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले. 

खासदार भावना गवळी यांनी माजी आमदार प्रकाश डहाके यांचा विधानसभेत उमेदवारी देण्याच्या आश्वासन देत शिवसेनेत प्रवेश करून घेतला होता. मात्र आता युतीच्या नवीन फॉर्म्युलानुसार विद्यमान आमदार असलेल्या जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याने कारंजाची जागा भाजपच्या वाट्याला जात आहे. त्यामुळे डहाके हे आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.