शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हेलिकॉप्टर खरेदीत मुख्यमंत्र्यांनी रुपयाचे आणखी अवमुल्यन केले : निरुपम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 19:09 IST

फडणवीस यांनी शासनातर्फे २ हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी एका अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. या करारासाठी ग्लोबल टेंडर इश्यू करण्यात आला. निश्चितच ही टेंडरिंग डॉलरमध्ये झाली. या टेंडरमध्ये त्यांनी रुपयाचा भाव १ डॉलरमागे ८० रुपये असल्याचे नमूद केलेले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर खरेदीच्या करारामध्ये काल जे रुपयाचे अवमूल्यन केले, यावरून त्यांचा त्यांच्या सरकारवर विश्वास राहिलेला नाही, त्यांचे सरकार ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारू शकत नाही, हेच स्पष्ट होते, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले. 

फडणवीस यांनी शासनातर्फे २ हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी एका अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. या करारासाठी ग्लोबल टेंडर इश्यू करण्यात आला. निश्चितच ही टेंडरिंग डॉलरमध्ये झाली. पण ग्लोबल टेंडरिंग करताना त्या दिवशी रुपयाचा दर डॉलर मागे किती आहे? हे पाहूनच त्या वस्तूची किंमत ठरते. काल रुपयाचा भाव १ डॉलरमागे ७२.६ रुपये होता. पण या टेंडरमध्ये त्यांनी रुपयाचा भाव १ डॉलरमागे ८० रुपये असल्याचे नमूद केलेले आहे. जरी आज रुपयाची स्थिती १ डॉलरमागे ७२.६ इतकी खराब असली, भाजप सरकार हे कसे गृहीत धरू शकते की, हा करार जेव्हा अंतिम टप्प्यात असेल तेव्हा रुपया १ डॉलरमागे ८० रुपये असेल. अशी मुख्यमंत्र्यांना खात्री आहे का? रुपयाच्या अवमूल्यनामागे भाजपचा हात आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

१५० करोड रुपयांचा हा व्यवहार आहे, रुपयाचा भाव 1 डॉलरमागे 80 रुपये दाखवल्याने सरकारला १८ करोड रुपयांचा तोटा होत आहे. सरकार १८ करोड जास्त का देत आहे. १५० करोड रुपयांचे हेलिकॉप्टर्स घेण्यासाठी महाराष्ट्राकडे पैसे आहेत का? महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत. गाव-खेड्यांतील लोक उपाशी मारत आहेत. डिझेल पेट्रोल महाग होत आहे. आम्ही जेव्हा पेट्रोल डिझेलवरील व्हॅट १ रुपया कमी करायची मागणी करतो, तेव्हा तुम्ही सांगता की असे केले, तर ३ हजार करोड रुपयांचा महसूल बुडेल. म्हणजे तुम्ही सरकारमध्ये बसून एक एक पैसा लोकांच्या खिशातून काढता आणि सरकारची तिजोरी भरता, मग स्वतःसाठी १८ करोड रुपये तोटा सहन करून एवढे महाग हेलिकॉप्टर विकत का विकत घेत आहेत? हा अट्टाहास का? या करारामध्ये १ डॉलरमागे रुपया किंमत ८० रुपये का टाकली आहे. यामध्ये कोणी दलाली केली आहे का? ही शासनाची चूक आहे. हा करार रद्द झालाच पाहिजे. या कराराच्या पैशांनी मुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी इतर विधायक कामे करावीत. महाराष्ट्रातील जनतेला १५० करोडची हेलिकॉप्टर्स नको आहेत. त्यांना इतर सोयीसुविधा हव्या आहेत. त्यांना स्वस्त पेट्रोल डिझेल हवे आहे. त्यांना महागाई नको आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी