शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक

By admin | Updated: July 28, 2016 19:52 IST

कुख्यात छोटा राजन टोळीच्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २८ : कुख्यात छोटा राजन टोळीच्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. हा सराईत गुन्हेगार छोटा राजनचा जवळचा हस्तक  माट्या भाई याच्यासाठी काम करीत असल्याचे समोर आले असून अनेक बिल्डरांकडून खंडणी उकळण्याची त्यांची कार्यपध्दती असल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.

प्रशांत भगवान वनशिव (वय 28, रा. धायरी गाव, महादेवनगर, सिंहगड रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना खब-याने वनशिव याच्याकडे बेकायदा अग्निशस्त्र असल्याची माहिती दिली होती. हे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी तो धायरेश्वर मंदिराजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या सुचनांनुसार तातडीने सापळा लावण्यात आला. वनशिव याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

त्याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, शैलेश जगताप, संतोष पागार, निलेश पाटील, अशोक आटोळे, राहुल घाडगे, विनायक जोरकर, प्रमोद गायकवाड, परवेज जमादार, धनाजी पाटील यांच्या पथकाने केली. पुढे येऊन तक्रारी द्याप्रशांत वनशिव हा छोटा राजनचा जवळचा मुंबईस्थित हस्तक ह्यमाट्याभाईह्ण याच्यासाठी काम करतो. धायरी आणि त्या परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना छोट्या राजनच्या नावाने धमकावून खंडणी उकळत असल्याची माहिती पोलिसांना समजली आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकांना त्याने धमकावले असेल अगर खंडणी उकळली असेल त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी केले आहे. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही पाटील स्पष्ट केले आहे.वनशिव याने 15 जुलै 2014 रोजी सुरेश बाबुलाल शिंदे (वय 40, रा. आंबेगाव खुर्द) यांचा राजकीय वैमनस्यातून खून केला होता. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये वनशिव याची आई उमेदवार म्हणून उभी होती. तिच्या विरोधात शिंदे यांची पत्नी निवडणूक लढवीत होती. त्या वादामधून शिंदे यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.