शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

"छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच, अजितदादांची अवस्था 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण' अशी’’ शंभुराज देसाईंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 12:36 IST

Shambhuraj Desai : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नका, असं विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नका, असं विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अजित पवार यांच्या या विधानाविरोधात सत्ताधारी नेते कमालीचे आक्रमक झाले आहे. शिंदे सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई यांनीही अजित पवारांच्या या विधानाचा समाचार घेतला असून, अजित पवारांचं वक्तव्य लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशापद्धतीचं असल्याची टीका शंभुराज देसाई यांनी केली आहे.

शिंदे सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई अजित पवार यांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हणाले की, मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी ४० दिवस हाल केले. तुम्ही धर्मपरिवर्तन करा, मुस्लिम धर्म स्वीकारा, आम्ही तुम्हाला सोडतो. असं सांगितलं. पण छत्रपती संभाजी महाराजांनी देहाचं बलिदान केलं पण धर्म बदलला नाही. मग छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर धर्मरक्षक का म्हणायचं नाही. दादांन हे मान्य नाही. संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान योग्य नाही असं दादांना वाटतं का. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर धर्मरक्षकच म्हटलं गेलं पाहिजे. कारण हिंदू धर्मासाठी त्यांनी अनन्वित हाल सोसले होते. 

शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपुरुषांबाबत महापुरुषांबाबत सेना-भाजपाच्या सरकारमधील मंत्री, पदाधिकारी काय बोलतात, याबाबत अजित पवार यांनी त्वेशानं भाषण केलं होतं. सुरुवातीचं ते भाषण आणि आताचं सभागृह संपतानाचं हे भाषण. एका बाजूला स्वत: सांगायचं की थोर पुरुषांचा आदर करा आणि दुसऱ्या बाजूला सभागृह संपताना छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका म्हणून सांगायचं. याचा अर्थ लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशापद्धतीचं अजितदादांचं हे वक्तव्य आहे. त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. दादांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर म्हणून नका असं सांगणं हे निषेधार्ह आहे. महाराष्ट्रामध्ये या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल आणि आपण बोललो हे चुकीचं आहे हे अजित पवारांच्या लक्षात येईल. छत्रपती संभाजी महाराज हे कालही धर्मवीर, धर्मरक्षक होते आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरीपर्यंत ते धर्मवीर धर्मरक्षकच राहतील, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले. 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईAjit Pawarअजित पवार