शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

"छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच, अजितदादांची अवस्था 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण' अशी’’ शंभुराज देसाईंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 12:36 IST

Shambhuraj Desai : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नका, असं विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नका, असं विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अजित पवार यांच्या या विधानाविरोधात सत्ताधारी नेते कमालीचे आक्रमक झाले आहे. शिंदे सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई यांनीही अजित पवारांच्या या विधानाचा समाचार घेतला असून, अजित पवारांचं वक्तव्य लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशापद्धतीचं असल्याची टीका शंभुराज देसाई यांनी केली आहे.

शिंदे सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई अजित पवार यांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हणाले की, मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी ४० दिवस हाल केले. तुम्ही धर्मपरिवर्तन करा, मुस्लिम धर्म स्वीकारा, आम्ही तुम्हाला सोडतो. असं सांगितलं. पण छत्रपती संभाजी महाराजांनी देहाचं बलिदान केलं पण धर्म बदलला नाही. मग छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर धर्मरक्षक का म्हणायचं नाही. दादांन हे मान्य नाही. संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान योग्य नाही असं दादांना वाटतं का. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर धर्मरक्षकच म्हटलं गेलं पाहिजे. कारण हिंदू धर्मासाठी त्यांनी अनन्वित हाल सोसले होते. 

शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपुरुषांबाबत महापुरुषांबाबत सेना-भाजपाच्या सरकारमधील मंत्री, पदाधिकारी काय बोलतात, याबाबत अजित पवार यांनी त्वेशानं भाषण केलं होतं. सुरुवातीचं ते भाषण आणि आताचं सभागृह संपतानाचं हे भाषण. एका बाजूला स्वत: सांगायचं की थोर पुरुषांचा आदर करा आणि दुसऱ्या बाजूला सभागृह संपताना छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका म्हणून सांगायचं. याचा अर्थ लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशापद्धतीचं अजितदादांचं हे वक्तव्य आहे. त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. दादांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर म्हणून नका असं सांगणं हे निषेधार्ह आहे. महाराष्ट्रामध्ये या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल आणि आपण बोललो हे चुकीचं आहे हे अजित पवारांच्या लक्षात येईल. छत्रपती संभाजी महाराज हे कालही धर्मवीर, धर्मरक्षक होते आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरीपर्यंत ते धर्मवीर धर्मरक्षकच राहतील, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले. 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईAjit Pawarअजित पवार