शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शिवसेनेत जे घडलं ते राष्ट्रवादीत घडलं नाही; आमची बाजू भक्कम, छगन भुजबळ म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 16:42 IST

राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आणि वकील आहेत. या प्रकरणात अनेक कायदे तज्ज्ञांनी त्यांना मदत केली असणार आहे असं भुजबळांनी म्हटलं.

मुंबई - शिवसेनेत व्हिप बदलले, कुणी व्हिप काढले, कुणी आदेश दिले अशा असंख्य गोष्टीची चर्चा शिवसेनेच्या निकालावेळी झाली. आमच्याबाबतीत ही परिस्थिती नाही. आमचा व्हिप बदललेला नाही. आधी जो होता तोच आहे असं त्यामुळे आमच्या प्रकरणात आणि ठाकरेंच्या प्रकरणात फार मोठा फरक आहे असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. 

छगन भुजबळ यांनी म्हटलं की, विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला. त्यामुळे कुठलाही गट असता तरी ज्याच्याविरोधात हा निकाल लागला तो हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जाणारच. कालच्या निकालात व्हिप कोण, व्हिपचा आदेश बरोबर आहे का? व्हिपची नेमणूक बरोबर आहे का? या असंख्य गोष्टी फिरत होत्या. मात्र आमच्या बाबतीत तसे नाही. आमचा व्हिप बदलेलाच नाही. जो व्हिप आधी होता तोच आताही आहे. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आणि वकील आहेत. या प्रकरणात अनेक कायदे तज्ज्ञांनी त्यांना मदत केली असणार आहे. दीड तास निकालाचे वाचन सुरू होते असं भुजबळांनी सांगितले. दरम्यान, अजून दोन्ही बाजूची सुनावणी होणार आहे. आमची जी मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांसमोर मांडू. त्यामुळे धाकधूक वाटण्याचा प्रश्न नाही. विधानसभा अध्यक्षांनी जर पुरावे पाहिले तर त्यांना योग्य तो निर्णय करावा लागेल असं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव

लोकशाहीत निवडणुक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसऱ्याबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केले. बाळासाहेबांनी कॉंग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसला डोक्यावर बसविले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांच्या विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल एक ही मोठी चपराक असल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे.  सर्वोच्य न्यायालयाला देखील सल्ला देण्याचे काम या मंडळींनी केले. मात्र आता स्वत:च मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही, एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होते, मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मनमानी कारभार करुन स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस