शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत जे घडलं ते राष्ट्रवादीत घडलं नाही; आमची बाजू भक्कम, छगन भुजबळ म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 16:42 IST

राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आणि वकील आहेत. या प्रकरणात अनेक कायदे तज्ज्ञांनी त्यांना मदत केली असणार आहे असं भुजबळांनी म्हटलं.

मुंबई - शिवसेनेत व्हिप बदलले, कुणी व्हिप काढले, कुणी आदेश दिले अशा असंख्य गोष्टीची चर्चा शिवसेनेच्या निकालावेळी झाली. आमच्याबाबतीत ही परिस्थिती नाही. आमचा व्हिप बदललेला नाही. आधी जो होता तोच आहे असं त्यामुळे आमच्या प्रकरणात आणि ठाकरेंच्या प्रकरणात फार मोठा फरक आहे असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. 

छगन भुजबळ यांनी म्हटलं की, विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला. त्यामुळे कुठलाही गट असता तरी ज्याच्याविरोधात हा निकाल लागला तो हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जाणारच. कालच्या निकालात व्हिप कोण, व्हिपचा आदेश बरोबर आहे का? व्हिपची नेमणूक बरोबर आहे का? या असंख्य गोष्टी फिरत होत्या. मात्र आमच्या बाबतीत तसे नाही. आमचा व्हिप बदलेलाच नाही. जो व्हिप आधी होता तोच आताही आहे. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आणि वकील आहेत. या प्रकरणात अनेक कायदे तज्ज्ञांनी त्यांना मदत केली असणार आहे. दीड तास निकालाचे वाचन सुरू होते असं भुजबळांनी सांगितले. दरम्यान, अजून दोन्ही बाजूची सुनावणी होणार आहे. आमची जी मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांसमोर मांडू. त्यामुळे धाकधूक वाटण्याचा प्रश्न नाही. विधानसभा अध्यक्षांनी जर पुरावे पाहिले तर त्यांना योग्य तो निर्णय करावा लागेल असं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव

लोकशाहीत निवडणुक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसऱ्याबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केले. बाळासाहेबांनी कॉंग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसला डोक्यावर बसविले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांच्या विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल एक ही मोठी चपराक असल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे.  सर्वोच्य न्यायालयाला देखील सल्ला देण्याचे काम या मंडळींनी केले. मात्र आता स्वत:च मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही, एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होते, मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मनमानी कारभार करुन स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस