शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिवसेनेत जे घडलं ते राष्ट्रवादीत घडलं नाही; आमची बाजू भक्कम, छगन भुजबळ म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 16:42 IST

राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आणि वकील आहेत. या प्रकरणात अनेक कायदे तज्ज्ञांनी त्यांना मदत केली असणार आहे असं भुजबळांनी म्हटलं.

मुंबई - शिवसेनेत व्हिप बदलले, कुणी व्हिप काढले, कुणी आदेश दिले अशा असंख्य गोष्टीची चर्चा शिवसेनेच्या निकालावेळी झाली. आमच्याबाबतीत ही परिस्थिती नाही. आमचा व्हिप बदललेला नाही. आधी जो होता तोच आहे असं त्यामुळे आमच्या प्रकरणात आणि ठाकरेंच्या प्रकरणात फार मोठा फरक आहे असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. 

छगन भुजबळ यांनी म्हटलं की, विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला. त्यामुळे कुठलाही गट असता तरी ज्याच्याविरोधात हा निकाल लागला तो हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जाणारच. कालच्या निकालात व्हिप कोण, व्हिपचा आदेश बरोबर आहे का? व्हिपची नेमणूक बरोबर आहे का? या असंख्य गोष्टी फिरत होत्या. मात्र आमच्या बाबतीत तसे नाही. आमचा व्हिप बदलेलाच नाही. जो व्हिप आधी होता तोच आताही आहे. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आणि वकील आहेत. या प्रकरणात अनेक कायदे तज्ज्ञांनी त्यांना मदत केली असणार आहे. दीड तास निकालाचे वाचन सुरू होते असं भुजबळांनी सांगितले. दरम्यान, अजून दोन्ही बाजूची सुनावणी होणार आहे. आमची जी मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांसमोर मांडू. त्यामुळे धाकधूक वाटण्याचा प्रश्न नाही. विधानसभा अध्यक्षांनी जर पुरावे पाहिले तर त्यांना योग्य तो निर्णय करावा लागेल असं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव

लोकशाहीत निवडणुक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसऱ्याबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केले. बाळासाहेबांनी कॉंग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसला डोक्यावर बसविले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांच्या विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल एक ही मोठी चपराक असल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे.  सर्वोच्य न्यायालयाला देखील सल्ला देण्याचे काम या मंडळींनी केले. मात्र आता स्वत:च मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही, एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होते, मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मनमानी कारभार करुन स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस