शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

सकारात्मक विरोधकाची भूमिका बजावू - चव्हाण

By admin | Updated: March 3, 2015 02:31 IST

पक्षासमोरील आव्हानांना सामोरे जातानाच राज्यात सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्यावर आपला भर असणार आहे.

मुंबई : पक्षासमोरील आव्हानांना सामोरे जातानाच राज्यात सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्यावर आपला भर असणार आहे. केवळ विरोधाला विरोध ही काँग्रेसची भूमिका नाही तर सरकारवर अंकुश लावण्याचे काम करणार असल्याचे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदाच्या घोषणेनंतर प्रथमच पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी, केंद्र आणि राज्य शासनाचा कारभार, शेतकरी आत्महत्या, स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव, आघाडीचे राजकारण आणि आदर्श प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निकालांनी आव्हानात्मक परिस्थिती स्पष्ट केली आहे. ज्या जिल्ह्यात पक्षाची स्थिती कमकुवत झाली आहे तिथे अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. लवकरच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून जिल्हावार दौरे करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आपली भूमिका असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. सरकारमध्ये राहून शिवसेना वेगळी भूमिका कशी घेते? भूसंपादनाला त्यांचा खरोखरच विरोध असे तर त्यांनी सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडावे, असा टोलाही चव्हाण यांनी हाणला. शेतकरी आत्महत्या आणि स्वाइन फ्लू रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न पुरेसे नाहीत. माझ्या कार्यकाळातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या. तसे आता दिसत नसल्याचे चव्हाण म्हणाले. फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात विचारांची लढाई लढावी लागेल. हा केवळ पोलीस बंदोबस्ताचा विषय नाही. सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन काम करू. राष्ट्रवादीसोबत आपले ट्युनिंग चांगले आहे. पण जिथे पटणार नाही तिथे विरोध करणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.एमआयएमला ‘व्यवस्थित’ हाताळू एमआयएमप्रमाणे मुस्लीम लीगचाही उदय नांदेडमध्येच झाला. भावना भडकावण्याचे राजकारण फार काळ टिकणार नाही. एमआयएमचा प्रभाव जसा वाढला तसाच तो लवकरच नष्टही होईल. पण आगामी निवडणुकीत एमआयएमला ‘व्यवस्थित’ हाताळू, असे चव्हाण म्हणाले.