शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सकारात्मक विरोधकाची भूमिका बजावू - चव्हाण

By admin | Updated: March 3, 2015 02:31 IST

पक्षासमोरील आव्हानांना सामोरे जातानाच राज्यात सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्यावर आपला भर असणार आहे.

मुंबई : पक्षासमोरील आव्हानांना सामोरे जातानाच राज्यात सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्यावर आपला भर असणार आहे. केवळ विरोधाला विरोध ही काँग्रेसची भूमिका नाही तर सरकारवर अंकुश लावण्याचे काम करणार असल्याचे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदाच्या घोषणेनंतर प्रथमच पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी, केंद्र आणि राज्य शासनाचा कारभार, शेतकरी आत्महत्या, स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव, आघाडीचे राजकारण आणि आदर्श प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निकालांनी आव्हानात्मक परिस्थिती स्पष्ट केली आहे. ज्या जिल्ह्यात पक्षाची स्थिती कमकुवत झाली आहे तिथे अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. लवकरच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून जिल्हावार दौरे करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आपली भूमिका असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. सरकारमध्ये राहून शिवसेना वेगळी भूमिका कशी घेते? भूसंपादनाला त्यांचा खरोखरच विरोध असे तर त्यांनी सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडावे, असा टोलाही चव्हाण यांनी हाणला. शेतकरी आत्महत्या आणि स्वाइन फ्लू रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न पुरेसे नाहीत. माझ्या कार्यकाळातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या. तसे आता दिसत नसल्याचे चव्हाण म्हणाले. फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात विचारांची लढाई लढावी लागेल. हा केवळ पोलीस बंदोबस्ताचा विषय नाही. सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन काम करू. राष्ट्रवादीसोबत आपले ट्युनिंग चांगले आहे. पण जिथे पटणार नाही तिथे विरोध करणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.एमआयएमला ‘व्यवस्थित’ हाताळू एमआयएमप्रमाणे मुस्लीम लीगचाही उदय नांदेडमध्येच झाला. भावना भडकावण्याचे राजकारण फार काळ टिकणार नाही. एमआयएमचा प्रभाव जसा वाढला तसाच तो लवकरच नष्टही होईल. पण आगामी निवडणुकीत एमआयएमला ‘व्यवस्थित’ हाताळू, असे चव्हाण म्हणाले.