शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: ‘नमों’चा करिष्मा, देवेंद्रनीतीचा जय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:45 IST

भाजपने राज्यात मिळविलेला जबरदस्त विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे आखलेल्या रणनीतीचा विजय आहे.

- यदु जोशीभाजपने राज्यात मिळविलेला जबरदस्त विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे आखलेल्या रणनीतीचा विजय आहे. मोदींबद्दल विरोधक गरळ ओकत असले तरी सामान्य माणसांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची आणि विश्वासाची भावना होती ती मतदानात उतरली. मोदी विरोधकांचा पालापाचोळा झाला. मोदी द्वेषावर आधारित विरोधकांचा प्रचार अंगलट आला.मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटची सहा महिने पद्धतशीर मोर्चेबांधणी केली. विरोधक त्या बाबत पार गाफील राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे बलस्थान असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि त्याला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांनी भाजपत आणले. राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील या व्यक्ती म्हणून नव्हे तर संस्था म्हणून वावरणाऱ्या नेत्यांना त्यांनी भाजपसोबत आणले. साताराा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढात उमेदवारी देऊन जोखीम पत्करली. तशीच जोखीम त्यांनी नांदेडमध्ये पत्करली. आ. प्रताप पाटील चिखलीकर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचे घोर विरोधक. त्यांना मैदानात उतरवून मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांच्या पराभवाचा पाया रचला.शिवसेनेशी युती होईलच असा विश्वास मुख्यमंत्री बाळगून होते आणि ते युतीचे शिल्पकार ठरले. प्रसंगी भाजपकडे २५ जागा घेत शिवसेनेला २३ जागा देत एक पाऊल मागे घेण्याचे राजकीय शहाणपण त्यांनी दाखविले. युतीमुळे मोठ्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. फडणवीस पक्षहिताशी कधीही तडजोड करत नाहीत.ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंत भाजपला राज्यात देदीप्यमान विजय मिळवून देणरा नेता म्हणून फडणवीस यांची नोंद झाली आहे. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवेंनी पक्षसंघटना बांधली.भाजपच्या राज्यातील विजयात रा.स्व.संघ परिवाराचा मोठा सहभाग आहेच. मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत म्हणून संघच भाजपला हरवेल वगैरे कंड्या अपरिपक्व आणि संघ अजिबात न कळणाऱ्यांकडून पिकविल्या जात होत्या. अशांना संघ कळायला वेळच लागेल; अर्थात तो समजून घ्यायचा असेल तरच.>शिवसेनेला दिली ताकददुष्काळ हाताळण्याबाबत विरोधकांची टीकाही मतदारांनी अनाठायी ठरविली. त्या भागात युतीने दमदार यश मिळविले. कर्जमाफी फसवी असल्याची विरोधकांचा आरोपही साफ फेटाळून लावला.प. महाराष्ट्र चंद्रकांत पाटील, उ.महाराष्ट्र गिरीश महाजन, विदर्भ सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मराठवाडा पंकजा मुंडे, संभाजीा निलंगेकर असे मंत्र्यांना भाग वाटून देत मुख्यमंत्रंनी अचृक ु नियोजन केले. शिवसेना उमेदवारांना सगळे बळ मिळेल याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली.शिवसेनेच्या मतदारसंघातही त्यांनी भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांना कामाला लावले आणि दरदिवशी तेथील आढावा ते घेत होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019