शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: ‘नमों’चा करिष्मा, देवेंद्रनीतीचा जय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:45 IST

भाजपने राज्यात मिळविलेला जबरदस्त विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे आखलेल्या रणनीतीचा विजय आहे.

- यदु जोशीभाजपने राज्यात मिळविलेला जबरदस्त विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे आखलेल्या रणनीतीचा विजय आहे. मोदींबद्दल विरोधक गरळ ओकत असले तरी सामान्य माणसांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची आणि विश्वासाची भावना होती ती मतदानात उतरली. मोदी विरोधकांचा पालापाचोळा झाला. मोदी द्वेषावर आधारित विरोधकांचा प्रचार अंगलट आला.मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटची सहा महिने पद्धतशीर मोर्चेबांधणी केली. विरोधक त्या बाबत पार गाफील राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे बलस्थान असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि त्याला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांनी भाजपत आणले. राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील या व्यक्ती म्हणून नव्हे तर संस्था म्हणून वावरणाऱ्या नेत्यांना त्यांनी भाजपसोबत आणले. साताराा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढात उमेदवारी देऊन जोखीम पत्करली. तशीच जोखीम त्यांनी नांदेडमध्ये पत्करली. आ. प्रताप पाटील चिखलीकर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचे घोर विरोधक. त्यांना मैदानात उतरवून मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांच्या पराभवाचा पाया रचला.शिवसेनेशी युती होईलच असा विश्वास मुख्यमंत्री बाळगून होते आणि ते युतीचे शिल्पकार ठरले. प्रसंगी भाजपकडे २५ जागा घेत शिवसेनेला २३ जागा देत एक पाऊल मागे घेण्याचे राजकीय शहाणपण त्यांनी दाखविले. युतीमुळे मोठ्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. फडणवीस पक्षहिताशी कधीही तडजोड करत नाहीत.ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंत भाजपला राज्यात देदीप्यमान विजय मिळवून देणरा नेता म्हणून फडणवीस यांची नोंद झाली आहे. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवेंनी पक्षसंघटना बांधली.भाजपच्या राज्यातील विजयात रा.स्व.संघ परिवाराचा मोठा सहभाग आहेच. मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत म्हणून संघच भाजपला हरवेल वगैरे कंड्या अपरिपक्व आणि संघ अजिबात न कळणाऱ्यांकडून पिकविल्या जात होत्या. अशांना संघ कळायला वेळच लागेल; अर्थात तो समजून घ्यायचा असेल तरच.>शिवसेनेला दिली ताकददुष्काळ हाताळण्याबाबत विरोधकांची टीकाही मतदारांनी अनाठायी ठरविली. त्या भागात युतीने दमदार यश मिळविले. कर्जमाफी फसवी असल्याची विरोधकांचा आरोपही साफ फेटाळून लावला.प. महाराष्ट्र चंद्रकांत पाटील, उ.महाराष्ट्र गिरीश महाजन, विदर्भ सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मराठवाडा पंकजा मुंडे, संभाजीा निलंगेकर असे मंत्र्यांना भाग वाटून देत मुख्यमंत्रंनी अचृक ु नियोजन केले. शिवसेना उमेदवारांना सगळे बळ मिळेल याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली.शिवसेनेच्या मतदारसंघातही त्यांनी भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांना कामाला लावले आणि दरदिवशी तेथील आढावा ते घेत होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019