लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नवीन फौजदारी कायद्यांतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत ६० दिवसांच्या आत १.३४ लाख गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झाले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली. या कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल राहील याची दक्षता घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
वर्षा निवासस्थानी नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत बैठक पार पडली. बैठकीस गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इक्बाल सिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते.
नवीन कायद्याची सद्यस्थिती
- राज्यात २ लाख ८८४ पोलिस अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण.
- दूरदृष्टी संवाद प्रणाली व्यवस्था २१४८ कोर्ट रूम आणि ६० कारागृहांमध्ये उपलब्ध.
- घरबसल्या तक्रार नोंदवण्यासाठी ई-एफआयआरची सुविधा.
- कोणत्याही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी झिरो एफआयआर सुविधा
Web Summary : Maharashtra filed chargesheets in 1.34 lakh cases under the new criminal laws by September 30. Chief Minister Fadnavis urged prioritizing the law's implementation during a review meeting. The state boasts completed police training, e-FIR facilities, and zero FIR registration.
Web Summary : महाराष्ट्र में नए फौजदारी कानूनों के तहत 30 सितंबर तक 1.34 लाख मामलों में आरोप पत्र दाखिल किए गए। मुख्यमंत्री फडणवीस ने समीक्षा बैठक के दौरान कानून के कार्यान्वयन को प्राथमिकता देने का आग्रह किया। राज्य में पुलिस प्रशिक्षण, ई-एफआईआर सुविधाएँ और शून्य एफआईआर पंजीकरण पूरा हो चुका है।