शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

कृषी विद्यापीठच बनलेय प्रभारी

By admin | Updated: April 1, 2015 00:14 IST

रिक्त पदे : शासकीय धोरणामुळे कारभारावर होतोय परिणाम...

शिवाजी गोरे - दापोली -डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, विस्तार क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे अल्पावधीतच कोकण कृषी विद्यापीठाने देशातील नामवंत कृषी विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवले. आज देशातील कृषी विद्यापीठातील नंबर एकचे कृषी विद्यापीठ म्हणून कोकण कृषी विद्यापीठाकडे पाहिले जाते. परंतु या विद्यापीठात कुलगुरुपासून सहयोगी अधिष्ठातापर्यंतची महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत. या प्रभारी कारभाराच्या धोरणामुळे विद्यापीठाच्या कारभारावर मोठा परिणाम होत आहे.डॉ. किसन लवांडे १९ डिसेंबर २०१४ रोजी कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून निवृत्त झाले. त्याआधीच नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरु झाली. ३ महिने अगोदर ही प्रक्रिया सुरु झाल्याने डॉ. लवांडे सेवानिवृत्त होण्यापूर्वी नवा कुलगुरु मिळण्याची आशा होती. परंतु निवड समितीने मुलाखती घेतल्यानंतर कुलगुरु पदासाठी एकही उमेदवार पात्र नसल्याचा शेरा मारल्याने विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळाला नाही. या पदाचा अतिरिक्त कार्यभार परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेंकटेश्वरलू यांच्याकडे सोपवण्यात आला. कुलगुरुप्रमाणेच विद्यापीठात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे कुलसचिव पदही रिक्त आहे. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. विद्यापीठातील संशोधन संचालक, शिक्षण संचालक, विस्तार शिक्षण संचालक ही महत्त्वाची पदे भरली नसल्याने या पदांचाही अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. कृषी विद्यापीठातील बांधकामावर देखरेख करण्यासाठी स्वतंत्र बांधकाम विभाग आहे. बांधकाम विभागातील विद्यापीठ अभियंता पदही रिक्त असल्याने त्याचा कार्यभार अन्य व्यक्तीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी महाविद्यालय, मत्स्य महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, फलोद्यान महाविद्यालय, काढणीपश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर महाविद्यालय या महाविद्यालयांतील सहयोगी अधिष्ठाता पदेही रिक्त आहेत.महत्त्वाची पदेही रिक्तचडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील महत्त्वाच्या सर्वच पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याने त्या व्यक्तिला स्वत:च्या पदाला न्याय देता येत नाही व अतिरिक्त पदही दुर्लक्षित राहाते. एका व्यक्तीकडे अनेक पदे असल्याने पूर्ण क्षमतेने काम होत नसून, कृषी विद्यापीठातील अतिरिक्त पदामुळे अनेक महत्त्वपूर्ण कामांना खीळ बसण्याची भीती आहे.कोणत्याही विद्यापीठाच्या कुलगुरुंची भूमिका पालकासारखी असते. परंतु डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सध्या पालकच नाहीत. परभणी कृषी विद्यापीठाचा कार्यभार सांभाळून दापोलीकडे लक्ष देणे सोपे काम नाही. भौगोलिकदृष्ट्या त्यांना दापोलीत वारंवार येणेही त्रासदायकच आहे.