शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

कृषी विद्यापीठच बनलेय प्रभारी

By admin | Updated: April 1, 2015 00:14 IST

रिक्त पदे : शासकीय धोरणामुळे कारभारावर होतोय परिणाम...

शिवाजी गोरे - दापोली -डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, विस्तार क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे अल्पावधीतच कोकण कृषी विद्यापीठाने देशातील नामवंत कृषी विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवले. आज देशातील कृषी विद्यापीठातील नंबर एकचे कृषी विद्यापीठ म्हणून कोकण कृषी विद्यापीठाकडे पाहिले जाते. परंतु या विद्यापीठात कुलगुरुपासून सहयोगी अधिष्ठातापर्यंतची महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत. या प्रभारी कारभाराच्या धोरणामुळे विद्यापीठाच्या कारभारावर मोठा परिणाम होत आहे.डॉ. किसन लवांडे १९ डिसेंबर २०१४ रोजी कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून निवृत्त झाले. त्याआधीच नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरु झाली. ३ महिने अगोदर ही प्रक्रिया सुरु झाल्याने डॉ. लवांडे सेवानिवृत्त होण्यापूर्वी नवा कुलगुरु मिळण्याची आशा होती. परंतु निवड समितीने मुलाखती घेतल्यानंतर कुलगुरु पदासाठी एकही उमेदवार पात्र नसल्याचा शेरा मारल्याने विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळाला नाही. या पदाचा अतिरिक्त कार्यभार परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेंकटेश्वरलू यांच्याकडे सोपवण्यात आला. कुलगुरुप्रमाणेच विद्यापीठात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे कुलसचिव पदही रिक्त आहे. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. विद्यापीठातील संशोधन संचालक, शिक्षण संचालक, विस्तार शिक्षण संचालक ही महत्त्वाची पदे भरली नसल्याने या पदांचाही अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. कृषी विद्यापीठातील बांधकामावर देखरेख करण्यासाठी स्वतंत्र बांधकाम विभाग आहे. बांधकाम विभागातील विद्यापीठ अभियंता पदही रिक्त असल्याने त्याचा कार्यभार अन्य व्यक्तीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी महाविद्यालय, मत्स्य महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, फलोद्यान महाविद्यालय, काढणीपश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर महाविद्यालय या महाविद्यालयांतील सहयोगी अधिष्ठाता पदेही रिक्त आहेत.महत्त्वाची पदेही रिक्तचडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील महत्त्वाच्या सर्वच पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याने त्या व्यक्तिला स्वत:च्या पदाला न्याय देता येत नाही व अतिरिक्त पदही दुर्लक्षित राहाते. एका व्यक्तीकडे अनेक पदे असल्याने पूर्ण क्षमतेने काम होत नसून, कृषी विद्यापीठातील अतिरिक्त पदामुळे अनेक महत्त्वपूर्ण कामांना खीळ बसण्याची भीती आहे.कोणत्याही विद्यापीठाच्या कुलगुरुंची भूमिका पालकासारखी असते. परंतु डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सध्या पालकच नाहीत. परभणी कृषी विद्यापीठाचा कार्यभार सांभाळून दापोलीकडे लक्ष देणे सोपे काम नाही. भौगोलिकदृष्ट्या त्यांना दापोलीत वारंवार येणेही त्रासदायकच आहे.