शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

जिल्ह्याच्या दळणवळणात आमूलाग्र बदल शक्य

By admin | Updated: June 6, 2017 02:37 IST

विकासकामांमुळे रायगड जिल्ह्याच्या दळणवळणात येत्या काळात आमूलाग्र बदल घडून येणार, असे चित्र स्पष्ट झाले आहे.

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सावित्री नदी पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या विविध विकासकामांमुळे रायगड जिल्ह्याच्या दळणवळणात येत्या काळात आमूलाग्र बदल घडून येणार, असे चित्र स्पष्ट झाले आहे.रायगड जिल्हा पॅकेजअंतर्गत, २४७.१३ कोटी रुपये खर्चाचा महाड जंक्शन (रा.म.६६ वरील कि.मी.१२३/४००), ते रायगड किल्ला (जिजामाता समाधीपर्यंत व चित्त दरवाजा व हिरकणीवाडीपर्यंत)चा दुपदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रीट रस्ता. रस्त्याची एकूण लांबी २५.६०९ कि.मी. ठळक वैशिष्ट्ये :- काँक्रीट रस्ता २ लेन पेव्हड शोल्डरसह, एक मोठा पूल, १९ लहान पूल, १४० मोऱ्या. ४२१.०२ कोटी रुपये खर्चून आंबडवे-पाचळ-मंडणगड-राजेवाडी (रा.म.क्र. ६६ जंक्शन)चे दोन पदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रीट रस्ता बांधणी. रस्त्याची एकूण लांबी ५९.६६७ कि.मी. ठळक वैशिष्ट्ये - काँक्रीट रस्ता २ लेन पेव्हड शोल्डरसह, एक मोठा पूल, १७ लहान पूल, ३२४ मोऱ्या आणि रेल्वे खालील एक पूल. वरील रस्ते विकासामुळे दळणवळण सुकर होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा रस्ता चौपदरीकरण (तीन पॅकेजेस)इंदापूर (कि.मी. ८४/००) ते वडपाले (कि.मी. १०८/४००) या टप्प्याच्या चौपदरीकरणाकरिता चेतक एटंरप्रायजेस, जयपूर या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, याकामी १२०२.५२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्याची एकूण लांबी २६.७५ कि.मी. आहे. ठळक वैशिष्ट्ये -फोरलेन काँक्र ीट रस्ता पेव्हड शोल्डरसह, इंदापूर व माणगाव शहरास बायपास, एक उड्डाणपूल, रेल्वेवरील तीन पूल, एक मोठा पूल, ९ लहान पूल, ८ बसथांबे, एक ट्रक थांबा यांचा समावेश आहे.वीर (कि.मी. १०८/४००) ते भोगाव (खुर्द), (कि.मी. १४८/००) या रस्त्याच्या चौपदरीकरणाकरिता एल अ‍ॅण्ड टी कंपनी, मुंबई या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून, याकामी १५९८.४७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्याची एकूण लांबी ३८.७६ कि.मी. आहे. ठळक वैशिष्ट्ये - काँक्र ीट रस्ता फोर लेन पेव्हड शोल्डरसह, एक उड्डाणपूल, दोन मोठे पूल, नऊ लहान पूल, वाहनांसाठी १८ ओव्हर/अंडर पास रोड, तीन पादचारी पूल यांचा समावेश राहणार आहे.भोगाव (खुर्द), (कि.मी. १४८/००) ते कशेडी घाट (कि.मी. १६१/६००)दरम्यान १.७२ कि.मी.चे दोन बोगदे व ९ कि.मी. जोडरस्ता, यांचा समावेश असून याकामी १०११.८९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. रस्त्याची एकूण लांबी ९ कि.मी. दोन बोगद्यांची प्रत्येकी लांबी १.७२० कि.मी., पोचमार्गाची लांबी ७.२८ कि.मी. दरीवरील पुलाची लांबी ६८० मी., नदीवरील पुलाची लांबी ४६६ मी. राहणार आहे.केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत मंजूर विकासकामेअलिबाग-रेवदंडा रस्ता (प्रा.रा.मा. ४ कि.मी. 00/00 ते १४/१००)चे १० कोटी खर्चून काँक्रि टीकरण करणे, शिरवली माणकुले रस्त्याची १० कोटी खर्चून सुधारणा करणे, सुधागड तालुक्यातील वाकण-पाली-खोपोली (रा.मा. ९३), रस्त्याची ४.५ कोटी रुपये खर्चून सुधारणा करणे, सुधागड तालुक्यातील उद्धर-कुंभरघर-महागाव-हातोंड-गोंदाव (रा.मा.९३ प्र.जी ता.४०), रस्त्याची ४ कोटी रुपये खर्चून सुधारणा करणे. दिघी-नानावटी-साव-आडगाव-वेळास रस्त्याचे ६ कोटी ५० लाख रुपये खर्चून रुंदीकरण व सुधारणा करणे, या कामांचा समावेश आहे.