शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

अर्ज केलेल्या शिक्षकांच्याच बदल्या

By admin | Updated: July 23, 2016 03:12 IST

सुमारे दीड वर्षापूर्वी लागू केलेली समायोजन बदल्यांची जाचक अट रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ठाणे : पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतर तेथे शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील काही शिक्षकांची परस्परांच्या क्षेत्रात बदली करून ती संख्या भरून काढण्यासाठी सुमारे दीड वर्षापूर्वी लागू केलेली समायोजन बदल्यांची जाचक अट रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या अटीला शिक्षकांचा मोठा विरोध होता. त्यांची ती मागणी मान्य झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.त्याऐवजी आता राज्य शासनाने शुक्रवार, २२ जुलैला नवा अध्यादेश जारी करून बदल्यांच्या जाचक अटीतून कर्मचाऱ्यांची मुक्तता केली आहे. समायोजनाचा निर्णय बदलल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांत रिक्त राहणाऱ्या जागांवर कर्मचारी भरतीचे आदेशही जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. यामुळे ठाणे जि.प.च्या शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांची संख्या समान ठेवण्याची अट या नव्या शासन निर्णयातून वगळण्यात आली आहे. याशिवाय, बिंदूनामावलीचाही यात समावेश नसून पदोन्नतीनंतर त्यांची त्या-त्या जिल्हा परिषदेमध्ये बदली होणार आहे. यामुळे पालघरमध्ये बदली होणार नसल्यामुळे ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे, तर जुन्या निर्णयानुसार ठाणे जिल्हा परिषदेत येऊ घातलेल्या पालघरमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांची संधी हुकल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. ठाण्यातील कर्मचाऱ्यांची बदल्यांच्या या संकटातून मुक्तता करण्यात आम्हाला यश आल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे संपर्क सचिव शरद भिडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>१,४११ शिक्षक व ४५० कर्मचाऱ्याचा जीव भांड्यातनव्या शासन निर्णयामुळे एक हजार ४११ शिक्षकांसह सुमारे ४५० कर्मचाऱ्यांची पालघरमध्ये होणारी बदली टळली आहे. केवळ बदलीचा पर्याय दिलेला असल्यास सेवाज्येष्ठता सूचीतील सर्वात कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दुसऱ्या जिल्हा परिषदेत वर्ग करण्याचे नमूद केले आहे. ठाणे-पालघर या दोन जिल्हा परिषदांसाठी स्वतंत्र आकृतीबंध मंजूर आहे. त्यानुसार, प्रथम जिल्ह्यातील मंजूर पदे समायोजनाने विकल्पाप्रमाणे भरणे, ही पदभरती सेवाज्येष्ठता सूचीप्रमाणे होईल. याशिवाय, विकल्पानुसार प्राधान्याने समायोजन करणे. कर्मचारी कोणत्या जिल्हा परिषदेत कार्यरत राहणार, ते निश्चित करून पर्यायी कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत त्याची कार्यमुक्तता करू नये, पद रिक्त राहणार नाही याची काळजी घेऊन रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश आहे.