शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

अर्ज केलेल्या शिक्षकांच्याच बदल्या

By admin | Updated: July 23, 2016 03:12 IST

सुमारे दीड वर्षापूर्वी लागू केलेली समायोजन बदल्यांची जाचक अट रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ठाणे : पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतर तेथे शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील काही शिक्षकांची परस्परांच्या क्षेत्रात बदली करून ती संख्या भरून काढण्यासाठी सुमारे दीड वर्षापूर्वी लागू केलेली समायोजन बदल्यांची जाचक अट रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या अटीला शिक्षकांचा मोठा विरोध होता. त्यांची ती मागणी मान्य झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.त्याऐवजी आता राज्य शासनाने शुक्रवार, २२ जुलैला नवा अध्यादेश जारी करून बदल्यांच्या जाचक अटीतून कर्मचाऱ्यांची मुक्तता केली आहे. समायोजनाचा निर्णय बदलल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांत रिक्त राहणाऱ्या जागांवर कर्मचारी भरतीचे आदेशही जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. यामुळे ठाणे जि.प.च्या शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांची संख्या समान ठेवण्याची अट या नव्या शासन निर्णयातून वगळण्यात आली आहे. याशिवाय, बिंदूनामावलीचाही यात समावेश नसून पदोन्नतीनंतर त्यांची त्या-त्या जिल्हा परिषदेमध्ये बदली होणार आहे. यामुळे पालघरमध्ये बदली होणार नसल्यामुळे ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे, तर जुन्या निर्णयानुसार ठाणे जिल्हा परिषदेत येऊ घातलेल्या पालघरमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांची संधी हुकल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. ठाण्यातील कर्मचाऱ्यांची बदल्यांच्या या संकटातून मुक्तता करण्यात आम्हाला यश आल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे संपर्क सचिव शरद भिडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>१,४११ शिक्षक व ४५० कर्मचाऱ्याचा जीव भांड्यातनव्या शासन निर्णयामुळे एक हजार ४११ शिक्षकांसह सुमारे ४५० कर्मचाऱ्यांची पालघरमध्ये होणारी बदली टळली आहे. केवळ बदलीचा पर्याय दिलेला असल्यास सेवाज्येष्ठता सूचीतील सर्वात कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दुसऱ्या जिल्हा परिषदेत वर्ग करण्याचे नमूद केले आहे. ठाणे-पालघर या दोन जिल्हा परिषदांसाठी स्वतंत्र आकृतीबंध मंजूर आहे. त्यानुसार, प्रथम जिल्ह्यातील मंजूर पदे समायोजनाने विकल्पाप्रमाणे भरणे, ही पदभरती सेवाज्येष्ठता सूचीप्रमाणे होईल. याशिवाय, विकल्पानुसार प्राधान्याने समायोजन करणे. कर्मचारी कोणत्या जिल्हा परिषदेत कार्यरत राहणार, ते निश्चित करून पर्यायी कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत त्याची कार्यमुक्तता करू नये, पद रिक्त राहणार नाही याची काळजी घेऊन रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश आहे.