शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ३ कोटी मराठे दिसले नाहीत तर नाव बदलून ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 16:55 IST

गोरगरिब मराठा लेकरांसाठी ७ महिने वेळ दिला. तुम्ही जाणुनबुजून करताय हे वाटायला लागलंय असं मनोज जरांगे म्हणाले.

जालना -  आम्ही सरकारच्या आशेवर नाही. पोरांचे नुकसान व्हायला लागलंय मग आणखी किती दिवस वेळ द्यायचा? आता मराठ्यांनी ठरवलंय घराघरातून मराठे मुंबईत येणार आहे. आमची तयारी सुरू आहे. जे मुंबईत येणार नाही ते जिथे असतील तिथून आंदोलनात उतरणार आहे. सरकार गुप्तपणे आकडेवारी काढतंय पण तुमचे गणित कोलमडून जाणार आहे. मुंबईत ३ कोटी मराठा दिसतील. पुण्याच्या पुढे गेले आणि पनवेलजवळ पाहिले तर ३ कोटीला कमी पडले तर नाव बदलून ठेवा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईत जायची वेळ येणार आहे. त्यामुळे मराठे कामाला लागले आहेत. दारोदारी जाऊन समाजाला जागरुक करत आहोत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी होणार आहे. काही मुंबईत येतील काही रस्त्यावर निरोप द्यायला येतील. प्रत्येकाला लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ओबीसी नेते जितक्या सभा घेतात तितका आमचा समाज आणखी एक होतोय. सुप्रीम कोर्टातील आरक्षण टिकणार आहे का हा मुद्दा आहे. सातारच्या गादीला मी प्रचंड मानतो. त्याबद्दल एक शब्दही काढणार नाही. ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण झाले तर टिकत नाही हे आधी पाहिलेले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुंबईला जाण्याचा मार्ग ठरवला आहे. आजही बैठक झाली. कुठे कुठे मुक्काम करायचा, तिथे सगळ्या गोष्टींची व्यवस्था आहे की नाही याचा आढावा घेतला जातोय. १५ तारखेला पत्रकार परिषद घेऊन कुठे कुठे मुक्काम असेल हे जाहीर करू. आम्ही मुंबईला जाण्याच्या तयारीत आहोत. किती दिवस संयम पाळायचा, गोरगरिब मराठा लेकरांसाठी ७ महिने वेळ दिला. तुम्ही जाणुनबुजून करताय हे वाटायला लागलंय. त्यामुळे आज-उद्या करण्यात पोरांचे वाटोळे होतंय, समाजाची पोरं मोठी व्हायला पाहिजे हे आम्ही ठाम ठरवलंय त्यामुळे आमचे मुंबईला जायचंय हे फिक्स आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, आमच्या नोंदी सापडलेल्या असतानाही कायदा पारित होत नाही.  बैठका होत राहतात मात्र त्यातून काही होत नाही. २० जानेवारी रोजी मुंबईला निघण्याची  तयारी झालेली आहे . तयारी अंतिम टप्प्यात आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. किती लोक येणार आहे याचा शोध घेण्यासाठी सरकारी यंत्रणाही कामाला लागली आहे असे जरांगे म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण