शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

मुंबईत ३ कोटी मराठे दिसले नाहीत तर नाव बदलून ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 16:55 IST

गोरगरिब मराठा लेकरांसाठी ७ महिने वेळ दिला. तुम्ही जाणुनबुजून करताय हे वाटायला लागलंय असं मनोज जरांगे म्हणाले.

जालना -  आम्ही सरकारच्या आशेवर नाही. पोरांचे नुकसान व्हायला लागलंय मग आणखी किती दिवस वेळ द्यायचा? आता मराठ्यांनी ठरवलंय घराघरातून मराठे मुंबईत येणार आहे. आमची तयारी सुरू आहे. जे मुंबईत येणार नाही ते जिथे असतील तिथून आंदोलनात उतरणार आहे. सरकार गुप्तपणे आकडेवारी काढतंय पण तुमचे गणित कोलमडून जाणार आहे. मुंबईत ३ कोटी मराठा दिसतील. पुण्याच्या पुढे गेले आणि पनवेलजवळ पाहिले तर ३ कोटीला कमी पडले तर नाव बदलून ठेवा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईत जायची वेळ येणार आहे. त्यामुळे मराठे कामाला लागले आहेत. दारोदारी जाऊन समाजाला जागरुक करत आहोत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी होणार आहे. काही मुंबईत येतील काही रस्त्यावर निरोप द्यायला येतील. प्रत्येकाला लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ओबीसी नेते जितक्या सभा घेतात तितका आमचा समाज आणखी एक होतोय. सुप्रीम कोर्टातील आरक्षण टिकणार आहे का हा मुद्दा आहे. सातारच्या गादीला मी प्रचंड मानतो. त्याबद्दल एक शब्दही काढणार नाही. ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण झाले तर टिकत नाही हे आधी पाहिलेले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुंबईला जाण्याचा मार्ग ठरवला आहे. आजही बैठक झाली. कुठे कुठे मुक्काम करायचा, तिथे सगळ्या गोष्टींची व्यवस्था आहे की नाही याचा आढावा घेतला जातोय. १५ तारखेला पत्रकार परिषद घेऊन कुठे कुठे मुक्काम असेल हे जाहीर करू. आम्ही मुंबईला जाण्याच्या तयारीत आहोत. किती दिवस संयम पाळायचा, गोरगरिब मराठा लेकरांसाठी ७ महिने वेळ दिला. तुम्ही जाणुनबुजून करताय हे वाटायला लागलंय. त्यामुळे आज-उद्या करण्यात पोरांचे वाटोळे होतंय, समाजाची पोरं मोठी व्हायला पाहिजे हे आम्ही ठाम ठरवलंय त्यामुळे आमचे मुंबईला जायचंय हे फिक्स आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, आमच्या नोंदी सापडलेल्या असतानाही कायदा पारित होत नाही.  बैठका होत राहतात मात्र त्यातून काही होत नाही. २० जानेवारी रोजी मुंबईला निघण्याची  तयारी झालेली आहे . तयारी अंतिम टप्प्यात आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. किती लोक येणार आहे याचा शोध घेण्यासाठी सरकारी यंत्रणाही कामाला लागली आहे असे जरांगे म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण