शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

शहराचे नाव बदलायचे? राजकीयच नव्हे, तर पैशांचाही असतो प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 08:34 IST

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले या शहरांचे नामांतर अखेर पूर्णत्वास गेले आहे.

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले या शहरांचे नामांतर अखेर पूर्णत्वास गेले आहे. कोणत्याही शहराचे नाव बदलण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते. प्रत्यक्ष नामांतर पूर्ण होईपर्यंत या प्रक्रियेवर २०० ते ३०० कोटी रुपयांचा खर्च येतो. 

नामांतराच्या बाबतीत कोण आघाडीवर?  उत्तर प्रदेशात शहरांची नावे बदलण्यावरून सर्वाधिक वाद निर्माण झाले असले, तरी नावे बदलण्याच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर नाही. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ७६ नावे बदलली आहेत. तामिळनाडूने ३१ तर महाराष्ट्राने १८ ठिकाणांची नावे बदलली आहेत.

प्रक्रिया कशी असते?कोणत्याही शहराचे नाव बदलण्याचा अधिकार राज्याच्या मंत्रिमंडळाला असतो. साधारणपणे शहरातील लोकांनी यासंदर्भात मागणी केली तरच या प्रस्तावावर विचार सुरू केला जातो. एखादा आमदाराच्या मागणीवरूनही सरकार मंत्रिमंडळासमोर शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आणू शकते. मंत्रिमंडळाने शहराचे नाव बदलण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर राज्याची विधानसभा त्यावर शिक्कामोर्तब करते. नंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविला जातो. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय या प्रस्तावावर संबंधित मंत्रालये आणि विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र घेते. यात रेल्वे, टपाल विभाग, रस्ते वाहतूक मंत्रालय आदींचा समावेश असतो. प्रत्येक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर गृह मंत्रालय संबंधित प्रस्तावाला मंजुरी देते व नावातील बदल लागू होतो. 

कशासाठी, किती खर्च येतो? एखाद्या शहराचे नाव बदलण्यासाठी २०० ते ३०० कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. शहर मोठे असेल तर हा खर्च १००० कोटींच्या घरात जाऊ शकतो. 

सरकारी स्टेशनरीमध्ये करावा लागतो बदल 

शहरातील सर्व सार्वजनिक सूचना फलक, रेल्वे तसेच बस स्थानकांवरील फलक, मार्गांवरील फलक बदलण्याचा खर्च शेजारी असलेल्या राज्यांमध्ये असलेले फलक देखील बदलावे लागतात.

आंध्र प्रदेश      ७६ तामिळनाडू      ३१ केरळ      २६ महाराष्ट्र      १८ कर्नाटक      १४ मध्य प्रदेश      १३ गुजरात      १२ प. बंगाल     ९उत्तर प्रदेश     ८तेलंगणा     ८हरयाणा     ६पंजाब     ४राजस्थान     ४आसाम     ३गोवा     ३ओडिशा     २पद्दुचेरी     २हिमाचल      २छत्तीसगड     १मिझोराम     १नागालँड     १

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद