शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Hasan Mushrif V/S chandrakant patil : चंद्रकांत पाटील यांनी दावा दाखल करावाच : मुश्रीफ यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 14:54 IST

Hasan Mushrif V/S chandrakant patil kolhapur : भाजपच्या सांगण्यावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केल्याचा आरोप आपण केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंभर कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे वक्तव्य केले. आपले त्यांना सांगणे आहे, त्यांनी वेळ दवडू नये, आजच दावा दाखल करावा, असे उघड आव्हान ग्र्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर दावा दाखल करावाच, हसन मुश्रीफ यांचे आव्हानसुशांतसिंग राजपूत, वाझे प्रकरणात एनआय अपयशी

कोल्हापूर : भाजपच्या सांगण्यावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केल्याचा आरोप आपण केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंभर कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे वक्तव्य केले. आपले त्यांना सांगणे आहे, त्यांनी वेळ दवडू नये, आजच दावा दाखल करावा, असे उघड आव्हान ग्र्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, अंबानीच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकातील मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर करावे, या प्रकणात जे आरोप आहेत, त्यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची चौकशीच कशी होऊ शकते? राज्य सरकार अस्थिर करण्याचे कारस्थान भाजपचे सुरू असल्याचे आपण म्हटले होते.

त्यावर चंद्रकांत पाटील यांनी दाव्याची धमकी दिली आहे, त्यांनी दावा दाखल करावाच, दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊदे. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणूकीतील आरोपाबाबत आपण चंद्रकांत पाटील यांच्यावर शंभर कोटीचा दावा दाखल केला आहे, तो जिल्हा सत्र न्यायालयात चालू असल्याची आठवणही मंत्री मुश्रीफ यांनी करून दिली.सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ह्यएसआयटीह्ण ने तपास पुर्ण करत आणला असताना तो एनआयए कडे दिला. आताही स्फोटकांचा तपासाचा मुंबई पोलीसांनी छडा लावला होता, त्यातील नावे बाहेर येणार होती, तोपर्यंत हाही तपास एनआयए कडे दिला. या देशात चालले तरी काय? तपास देऊन काय? हाती लागले, सुशांतसिंग व वाझे प्रकरणात एनआयए पुर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला.केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतींना चिंतादेशात कोरोनाचे संकट भयावह झाले आहे. अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे येत तरीही या मंडळींना राजकारण सूचते. केंद्र सरकार गेली सहा महिने काय करत होते? असा प्रश्न खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतीनीच केला आहे. आता एकमेकावर टीका करत बसण्याची वेळ नाही. राज्य सरकार लस व रेमडिशिवर खरेदीचे ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.कायदा बदलण्यापेक्षा साखरेचा दर वाढच योग्यएफआरपीचा कायदा बदलणे कठीण आहे. त्यापेक्षा केंद्र सरकारने साखरेच्या किमान दरात वाढ करून तो प्रतिक्विंटल ३४०० रूपये करणे अधिक उचित ठरेल. साखर कारखान्यांनी ऑक्सीजन प्रकल्प उभारणीबाबत २ मे नंतर बैठक घेणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर