शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली गडकरींची भेट, आंध्र प्रदेशमधील सिंचन प्रकल्पांना गती देण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 22:20 IST

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

नागपूर : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. आंध्र प्रदेशमधील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसंदर्भात नायडू यांनी गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. या सिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी व गडकरी यांनी स्वत: जातीने लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.रात्री ८ च्या सुमारास चंद्राबाबू नायडू गडकरी यांच्या भक्ती या निवासस्थानी आले. यावेळी त्यांच्यासमवेत आंध्र प्रदेशचे जलसंपदामंत्री डी. उमा महेश्वर राव हेदेखील होते. मागील आठवड्यात विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नितीन गडकरी आंध्र प्रदेशमध्ये होते. यावेळीच मंगळवारच्या बैठक निश्चित करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.आंध्र प्रदेशमधील पोलावरम् हा राष्ट्रीय सिंचन प्रकल्प प्रलंबित आहे. हा सिंचन प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचा आंध्र प्रदेश शासनाचा मानस होता. मात्र तसे होऊ शकले नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात यावी, अशी विनंती चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी केली. सोबतच आंध्रप्रदेशातील गुंडलाकामा, ताडीपुडी एलआसएस, थोतापल्ली, ताराकरम तीर्त सागरम, मुसुरुमिल्ली, पुष्कर एलआयएस, येराकल्वा आणि मादिगेडा या प्राधान्य-२ गटामधील प्रकल्पांच्या पूर्ततेसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.गडकरी चांगले काम करत आहेतपोलावरम् प्रकल्प आंध्र प्रदेशच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यासाठी मी आलो होतो. त्यांना या प्रकल्पाची सखोल माहितीदेखील दिली. नितीन गडकरी यांच्या कामाशी शैली प्रभावित करणारी आहे. ते खूप चांगले काम करत आहेत, असे प्रतिपादन चंद्राबाबू नायडू यांनी केले.भाजप आमदारांनी केले स्वागतदरम्यान, भाजपचे आमदार व पदाधिकाºयांनी चंद्राबाबू नायडू यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. भाजप शहराध्यक्ष व आ.सुधाकर देशमुख, आ.विकास कुंभारे, आ.डॉ मिलिंद माने, भाजपा शहर महामंत्री किशोर पलांदुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.