शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

चांदोली धरण जवळपास १०० टक्के भरले; धरणातून  ३२५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 21:15 IST

धरण प्रशासनाकडून देण्यात आला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

सतीश नांगरे-लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण: पावसाचे आगर म्हणुन संबोधल्या जाणार्‍या चांदोली धरण क्षेत्रात दरवर्षी चार ते पाच हजार मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. आजअखेर धरण क्षेत्रात २६५२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापण यंत्रावर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले पाहिजे व पूर नियंत्रणही झाले पाहिजे या दृष्टीने धरण व्यवस्थापनाने दरवर्षीप्रमाणे पावसाचा अंदाज घेत केलेले योग्य नियोजन व पाण्याच्या कमीअधिक केलेल्या विसर्गामुळेच चांदोली धरण याहीवर्षी जवळपास १०० टक्के भरले आहे.

सध्या धरणाची पाणी पातळी ६२६.८० मीटरवर पोहचली आहे. ३४.४० टिएमसी पाणी साठवण क्षमता असलेले चांदोली धरण आज ९९.७२ टक्के भरले असून धरणात सध्या ९७१.४८२ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. गेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रात ५० मी. मी. पाऊस पडला आहे. यामुळे धरणात ११२८९ क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातून व पायथा विजगृहातून ३२५० क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

वारणा धारणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारणा डावा व उजवा कालवा, वाकुर्डे योजना व वारणा नदीत पाणी सोडले जाते. शाहुवाडी, शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले असते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धरण शंभर टक्के भरल्यामुळे लोकांची पाण्याची चिंता मिटली आहे.  

टि. एस. धामणकर - (शाखा अभियंता- वारणा पाटबंधारे, वारणावती) 

धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवावा लागणार आहे. नदीकाठच्या गावांना दिलेला सतर्कतेचा इशारा कायम आहे. 

टॅग्स :Damधरण