शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

मतांची फूट टाळण्याचे विदर्भवाद्यांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 20:57 IST

आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी विदर्भवाद्यांनीदेखील दंड थोपटले आहेत. नगरपरिषद निवडणूकांत यश मिळविणारा ‘विदर्भ माझा’ व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे

योगेश पांडे / ऑनलाइन लोकमत
नागपूर,दि. 18 - आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी विदर्भवाद्यांनीदेखील दंड थोपटले आहेत. नगरपरिषद निवडणूकांत यश मिळविणारा ‘विदर्भ माझा’ व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या ‘विदर्भ राज्य आघाडी’ हे केवळ विदर्भ हाच मुद्दा घेऊन निवडणूकांत उतरणार आहेत. शहरातील काही जागांवर हे दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विदर्भवाद्यांची मते दुभंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पेचातून मार्ग कसा काढायचा याबाबत पक्षांमध्ये विचार सुरू आहे.
 
एरवी दर निवडणूकांत विविध पक्षांकडून प्रचारात विदर्भाचा मुद्दा असतो. मात्र गेल्या काही काळापासून वेगळ््या विदर्भ राज्याच्या मागणीने परत जोर धरला आहे. यंदा केवळ विदर्भ हाच मुद्दा घेऊन राजकुमार तिरपुडे यांचा ‘विदर्भ माझा’ व अणे यांची ‘विरा’ निवडणूकांत उतरणार आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याला परत ऐरणीवर आणणारे अ‍ॅड.श्रीहरी अणे हे स्वत: प्रचारात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘विरा’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. दुसरीकडे काटोल नगर परिषदेवर विजयाचा झेंडा फडकविणारा ‘विदर्भ माझा’ पक्षदेखील चांगलात चर्चेत आहे. ‘विदर्भ माझा’कडूनदेखील नागपूर मनपा निवडणूकांची जोरदार तयारी सुरू आहे. अशा स्थितीत या दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आल्यास विदर्भवादी मतदारांची मते दुभंगण्याची शक्यता आहे. असे झाले तर दोन्ही पक्षांचे नुकसानच होणार आहे. हीच बाब लक्षात घेता दोन्ही पक्षांमध्ये समन्वय सुरू आहे. मात्र अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झाला नसल्याने निवडणूकांत काय होणार हा प्रश्न कायम आहे.
 
विदर्भवादी पक्षांचा मोट बांधणार कशी ?
मनपा निवडणूकांत सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा ‘विदर्भ माझा’तर्फे अगोदरच करण्यात आली आहे. त्यांनी ८ उमेदवार घोषितही केले आहेत. दुसरीकडे सद्यस्थितीत ‘विरा’ने केवळ एकाच प्रभागात उमेदवार उतरविण्याची घोषणा केली आहे. लहानमोठ्या १८ विदर्भवादी पक्षांची मोट बांधण्याचे अणे यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे नेमक्या किती ठिकाणी ‘विरा’ निवडणूक लढणार हे निश्चित झालेले नाही. मात्र ही मोट बांधणार कशी हा प्रश्नदेखील अनुत्तरीतच आहे. 
 
तिरपुडे म्हणतात, जो जिता वही सिकंदर
यासंदर्भात ‘विदर्भ माझा’चे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांच्याशी संपर्क केला असता, आम्ही सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भाच्या नावावर अनेक पक्ष निवडणूक लढत आहेत. मात्र राजकीय आखाड्यात जो जिंकतो तोच सिकंदर ठरतो. विदर्भवाद्यांची मते दुभंगतील असे वाटत नाही, असे ते म्हणाले. दुसरीकडे ‘विरा’चे अध्यक्ष रवी संन्याल यांनी मात्र ‘विदर्भ माझा’सोबत समन्वय साधणार असल्याचे सांगितले. नेमक्या किती ठिकाणी ‘विरा’ निवडणूक लढेल हे सांगता येत नाही. मात्र विदर्भवाद्यांची मते फुटू नयेत यासाठी आम्ही अणे यांच्या नेतृत्वात पुढाकार घेऊ. एकमेकांना फटका बसू नये अशी रुपरेषा तयार करु, असे त्यांनी स्पष्ट केले.