शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जातवैधता प्रमाणपत्र कधीही काढता येईल, वर्तमानातील उद्देशाचे बंधन नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 01:02 IST

सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश इत्यादी ठिकाणी जातीच्या आधारावर मिळणाऱ्या आरक्षणाचा व इतर लाभ घेण्यासाठी आणि अन्य विविध उद्देशांकरिता जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

- राकेश घानोडे 

नागपूर : भूतकाळात पूर्ण झालेल्या अथवा भविष्यातील इच्छित उद्देशाकरिता जातवैधता प्रमाणपत्र मिळविले जाऊ शकते. जातवैधता प्रमाणपत्रासाठी दावा दाखल करतेवेळी संबंधित उद्देश अस्तित्वात असला पाहिजे असे बंधन जात प्रमाणपत्र कायद्याने घालून दिलेले नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश इत्यादी ठिकाणी जातीच्या आधारावर मिळणाऱ्या आरक्षणाचा व इतर लाभ घेण्यासाठी आणि अन्य विविध उद्देशांकरिता जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जातवैधता प्रमाणपत्र हे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीद्वारे जारी केले जाते. त्याकरिता समितीकडे दावा दाखल करावा लागतो.परंतु, समिती, जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याचा उद्देश वर्तमानकाळात अस्तित्वात असेल तरच, दावा विचारात घेऊन कायद्यानुसार आदेश जारी करते. अन्यथा दाव्यावर विचार केला जात नाही. राज्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या सुरुवातीपासून याच पद्धतीचे पालन करीत होत्या. उच्च न्यायालयाने ही पद्धत बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे समितीला कायदेशीर उद्देशाकरिता दाखल केला जाणारा जात वैधता प्रमाणपत्राचा प्रत्येक दावा विचारात घ्यावा लागणार आहे.‘या’ प्रकरणात दिला निर्वाळाअनुसूचित जमातीमधील हलबा जातीचे प्रमाणपत्र असताना नागपूर सरगम पराते हिने बी.डी.एस. अभ्यासक्रमात खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतला आहे. परंतु, भविष्यात तिला शिक्षणामध्ये अनुसूचित जमातीचे लाभ घ्यायचे आहेत. त्यामुळे तिने फेब्रुवारी-२०२० मध्ये अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्राकरिता दावा दाखल केला होता. परंतु, उद्देश वर्तमानकाळातील नसल्यामुळे तिचा दावा अमान्य करण्यात आला होता. त्याविरुद्ध तिने याचिका केली होती. सरगमतर्फे अ‍ॅड. अनिल ढवस यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालय