शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

केंद्राकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम - मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 07:34 IST

केंद्र सरकारचे सध्याचे धोरण पाहता, त्यांच्याकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम सुरू आहे, असे मत राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरूंनी धर्मनिरपेक्ष देश घडविला तसेच त्यांनी लोकशाही वाचविण्याचे काम केले. नेहरूंनी समाजवादी विचार जपत गरीब व शेतकऱ्यांना त्यांचा हक्क दिला. पंडित नेहरू यांची जयंती साजरी करीत असताना, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरता कामा नये. पण देशात काही गडबड झाल्यास मोदी नेहरूंना दोष देतात. केंद्र सरकारचे सध्याचे धोरण पाहता, त्यांच्याकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम सुरू आहे, असे मत राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले.बालदिनाच्या पूर्वसंध्येला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सरहदी गांधी मेमोरियल सोसायटीच्यावतीने जवाहरलाल नेहरू यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पंडित नेहरू आणि द आयडिया ऑफ इंडिया या चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतवर निशाणा साधताना ते म्हणाले की, कंगनाचा पद्मश्री तिच्याकडून खेचून घ्यायला हवा. यासाठी राष्ट्रपतींना प्रत्येक नागरिकाने पत्र पाठविणे गरजेचे आहे. कंगनाने जे वक्तव्य केले ते संघाचे विचार आहेत. कोणी खोटे पसरवत असल्यास आपण ते खोडणे गरजेचे आहे. या चर्चासत्रात सय्यद जलालुद्दीन, भालचंद्र कांगो, फिरोज मिथीबोरवाला, हुसेन दलवाई, राम पुनियानी, अशोक कुमार पांडे यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू