शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

मध्य वैतरणा जलविद्युत प्रकल्पाचे ५१ कोटी पाण्यात. सात वर्षे रखडला प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 04:49 IST

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मध्य वैतरणा जलविद्युत प्रकल्पाला राज्याच्या जलसंपदा विभागाने परवानगी दिलेली नाही़ गेली सात वर्षे या प्रकल्पाची फाइल शासन दरबारी रेंगाळली आहे़

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मध्य वैतरणा जलविद्युत प्रकल्पाला राज्याच्या जलसंपदा विभागाने परवानगी दिलेली नाही़ गेली सात वर्षे या प्रकल्पाची फाइल शासन दरबारी रेंगाळली आहे़ त्यामुळे या प्रकल्पासाठी नियुक्त सल्लागाराचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ परिणामी, या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा आणि सल्लागारावर खर्च केलेले ५१ कोटी रुपयेही पाण्यात गेले आहेत़२००८ मध्ये महापालिकेने जलविद्युत प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार, या प्रकल्पातून ५० मेगावॅट विजेची निर्मिती करण्याचे निश्चित झाले़ यासाठी मे. ट्रीगॉन कन्सल्टंट कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली़ या कंपनीला कंत्राटासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. जून २०१० पासून महापालिकेने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे जलविद्युत प्रकल्पासाठी पाठपुरावा केला़ मात्र, आजतागायत जलसंपदा विभागाने पालिकेला संमती पत्र दिलेले नाही़ सल्लागारच आता पुढे काम करण्यास तयार नसल्याने, पालिकेने सल्लागाराचे कंत्राट गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र, यामुळे या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात आलेले ५१ कोटी रुपयेही वाया जाणार आहेत़ राज्य शासनाने भविष्यात या प्रकल्पाला मंजुरी दिल्यास नवीन सल्लागार नेमण्यात येणार आहे़ तूर्तास विद्यमान सल्लागाराला मुदतवाढ न देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे़असा आहे प्रकल्पमुंबईच्या पाणीपुरवठ्यात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण २०१२ मध्ये पूर्ण झाले़ रोलर कॉम्पेक्टेड काँक्रिट रोलर (आरसीसी) पद्धतीने बांधण्यात आलेले महाराष्ट्रातील हे पहिले धरण आहे़या प्रकल्पात ४४ कुटुंब बाधित झाली़ या प्रकल्पासाठी लाख ७५ हजार वृक्षांची कत्तल झाली आहे़ त्यामुळे पालिकेने बीड जिल्ह्यात दोन लाख वृक्षांचे रोपण केले़६४८ हेक्टर्स जागेवर असलेल्या या धरणाची उंची १,०४२ मीटर्स आहे़ जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत हाप्रकल्प उभा राहिला आहे़सप्टेंबर २०१६ रोजी या धरणाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले़ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मदत करण्याचे आश्वासन दिले होते़यावर केले सल्लागाराने कामया कंत्राटानुसार प्रकल्पाबाबत कंपनीने प्राथमिक अभ्यासासह भूगर्भीय व तांत्रिक सर्वेक्षण, आर्थिक-तांत्रिक अहवाल तयार करणे, प्रकल्पाचा तपशीलवार तांत्रिक अहवाल तयार करून, तो राज्य शासनाकडे सादर करणे, अहवालाच्या मान्यतेनंतर प्रकल्पाचे अंदाजपत्रक, आराखडे निविदा तयार करणे, छाननी करणे, प्रकल्पाच्या बांधकाम व उभारणीत देखरेख ठेवणे अशी कामे करणे अपेक्षित होते.परवानगी पत्राची प्रतीक्षामध्य वैतरणा जलविद्युत प्रकल्पासाठी २०१० पासून पालिकेचा राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़ या दरम्यान पायाभूत सुविधांसाठी आतापर्यंत ५०.४८ कोटी रुपये, तर सल्लागार सेवेसाठी ४९.०८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे़संबंधित ठेकेदाराला मुदत वाढवून न देण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याने, आता या प्रकल्पाला राज्य शासनाकडून परवानगी पत्र मिळाल्यानंतरच ई-निविदा मागवून नवीन सल्लागाराची नेमणूक करता येईल, असे अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले़

टॅग्स :DamधरणMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार