शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

राज्यात ११ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या ८ विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 06:50 IST

कोरोनाचे नियम पाळून केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी

मुंबई : राज्यात ११ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे ८ विशेष गाड्या सुरू करणार आहे. मुंबई-कोल्हापूर, मुंबई-लातूर, पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, कोल्हापूर- गोंदिया व मुंबई- नांदेड या मार्गांवर त्या धावतील. या गाड्यांमधून कोरोनाचे नियम पाळून केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे.११ ऑक्टोबरपासून कोल्हापूर-गोंदिया ही विशेष गाडी दररोज धावेल. ती परतीच्या प्रवासासाठीही उपलब्ध असेल. तर, ११ ऑक्टोबरपासून मुंबई-नांदेड विशेष गाडी दररोज धावेल. दुसऱ्या दिवशी ती नांदेड येथे पोहोचून मुंबईला रवाना होईल. ११ ऑक्टोबरपासून मुंबई-लातूर विशेष सुपरफास्ट आठवड्यात चार दिवस धावेल. ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवारी, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी लातूरसाठी रवाना होईल. ही गाडी सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवारी परतीसाठी उपलब्ध असेल.१२ ऑक्टोबरला कोल्हापूरहून मुंबईसाठी गाडी रवाना होईल. मुंबई-कोल्हापूर ही विशेष गाडी १३ आॅक्टोबरपासून रोज धावेल. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कोल्हापूरसाठी रवाना होईल.१५ ऑक्टोबरपासून पुणे-नागपूर एसी स्पेशल साप्ताहिक गाडी दर गुरुवारी पुणे येथून सोडण्यात येईल. नागपूर येथून दर गुरुवारी ही गाडी सोडण्यात येईल.१७ ऑक्टोबरपासून पुणे-अजनी एसी स्पेशल साप्ताहिक गाडी दर शनिवारी पुणे येथून सोडण्यात येईल. तसेच अजनी येथून दर रविवारी ही गाडी पुण्यासाठी रवाना होईल. १३ ऑक्टोबरपासून अजनी-पुणे एसी स्पेशल साप्ताहिक दर मंगळवारी पुण्यासाठी सोडण्यात येईल. पुण्याहून अजनीसाठी दर गुरुवारी ही गाडी रवाना होईल.१४ ऑक्टोबरपासून पुणे-अमरावती एसी स्पेशल साप्ताहिक गाडी बुधवारी पुणे येथून सोडण्यात येईल. अमरावती येथून दर गुरुवारी ती पुण्यासाठी रवाना होईल.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे