शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

ओबीसी जनगणनेची मागणी आयुक्तांनी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 06:56 IST

विधिमंडळाने केला होता ठराव; आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना घालणार साकडे

मुंबई : महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ही विधिमंडळाने एकमताच्या ठरावाद्वारे केलेली मागणी केंद्रीय जनगणना आयुक्तांनी फेटाळल्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. शेवटी अशी जनगणना व्हावी यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ चालू महिन्याअखेर दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून साकडे घालेल, असे एकमताने ठरले.काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विधिमंडळाने ठराव तर केला; स्वत: अध्यक्ष नाना पटोले यांनी तो मांडला होता. पण त्याचे पुढे काय झाले, अशी विचारणा त्यांनी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडताना अशी जनगणना झाल्याशिवाय एससी, एसटीप्रमाणे ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातात विकासासाठी निधी देता येणार नाही, असे मत मांडले. ते म्हणाले की, तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी, शरद पवार, शरद यादव, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी पूर्वी हीच भूमिका घेतली आणि त्यानुसार ग्रामविकास विभागाने ओबीसी जनगणना केली पण तिचे आकडे समोर आले नाहीत; कारण त्यात अनेक उणिवा होत्या. २०२१ मध्ये अशी जनगणना व्हावी यासाठी मुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्राकडे आग्रह धरला पाहिजे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हीच मागणी करताना सांगितले की योगायोगाने पंतप्रधान हे ओबीसी समाजाचे आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपण सगळ्यांनी मिळून त्यांना या मागणीसाठी भेटले पाहिजे. अशी जनगणना झाल्याशिवाय ओबीसींना निधीबाबत न्याय मिळणार नाही.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Parishadविधान परिषदNarendra Modiनरेंद्र मोदी