शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

केंद्र, राज्य सरकार असंवेदनशील

By admin | Updated: May 5, 2015 02:11 IST

दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडला आहे. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी फायदेशीर ठरू शकते.

औरंगाबाद : दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडला आहे. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी फायदेशीर ठरू शकते. सरकारने वास्तवतेचे भान ठेवून कर्जमाफी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी पत्र परिषदेत केली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला़ पवार म्हणाले, की यापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात जास्त होत होत्या. या वेळेला मराठवाड्यात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. याच्या खोलात जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नैराश्य दिसत आहे. दुष्काळ किंवा गारपिटीमुळे नुकसान झाले, तर त्याला तत्परतेने मदत करण्याची खबरदारी घ्यायला पाहिजे; पण सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार त्यात कमी पडत असल्याचे पवार म्हणाले़ राज्यातील मागास भागांच्या अभ्यासासाठी नेमलेल्या केळकर समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. विशेषत: पाण्याचा असमतोल कमी करण्यासाठी ज्या शिफारशी केल्या त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली़ विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा असेल तर आम्ही त्यांच्या बाजूने आहोत; पण आतापर्यंत जनतेकडून तसे दिसत नाही. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये तेथील जनतेने तसा कौल दिलेला नाही. त्यामुळे मला वेगळ्या विदर्भाचे मत हे तेथील जनतेचे असेल असे वाटत नाही. ते चार नेत्यांचे असेल. एमआयएमचे यश तात्पुरतेऔरंगाबाद महापालिकेत एमआयएमने मिळविलेल्या यशाविषयी पवार म्हणाले, एमआयएमकडे काही लोक खेचले गेले हे खरे आहे; पण ही कायमची फेज नाही. केवळ अशा गोष्टी वर्ष दोन वर्षे होतात. उसाला तीन हजार भाव हवासरकार बदलल्यानंतर वर्षभरात शेतकऱ्यांची काय दैना केली हे सर्व जण बघतायत. म्हणून वेडीवाकडी भाषणे करायची आणि स्वत:वर जबाबदारी आली तेव्हा ती दुसऱ्यावर ढकलायची हे बरोबर नाही, असा टोला पवार यांनी खा. राजू शेट्टी यांना लगावला. उसाला २७०० ते ३००० रुपये भाव मिळाला पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)