शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

केंद्र सरकारने बदलली घटनेतील उद्देशिका - वाघमारे

By admin | Updated: November 28, 2015 01:59 IST

संविधान दिनानिमित्त केंद्र सरकारने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींमध्ये राज्यघटनेतील मूळ उद्देशिकेतील काही शब्द बदलून घटनेचा अवमान केला

मुंबई : संविधान दिनानिमित्त केंद्र सरकारने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींमध्ये राज्यघटनेतील मूळ उद्देशिकेतील काही शब्द बदलून घटनेचा अवमान केला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केला आहे. यासंदर्भात शनिवारी केंद्र सरकारविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले, केंद्र सरकारने २६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये मराठी भाषेतील उद्देशिका प्रकाशित करण्यात आली आहे. परंतु, ही उद्देशिका घटनेच्या मूळ मराठी अनुवादातील उद्देशिकेप्रमाणे नसून, त्यामध्ये तब्बल २२ बदल करण्यात आले आहेत. ‘सार्वभौम’ शब्दाऐवजी ‘प्रभुत्व-संपन्न’, ‘धर्मनिरपेक्ष’ऐवजी ‘पंथनिरपेक्ष’, ‘लोकशाही’ऐवजी ‘लोकतंत्रात्मक’, ‘राजनैतिक’ऐवजी ‘राजकीय’, ‘धर्म’ऐवजी ‘श्रद्धा’ आणि ‘एकात्मता’ऐवजी ‘अखंडता’ असे शब्द वापरून मूळ गाभाच बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे उद्देशिकेचा अर्थ बदलला असून, अनेक महत्त्वाचे शब्द वगळून घटनेने नागरिकांना दिलेल्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्नही या जाहिरातील उद्देशिकेत करण्यात आल्याचे डॉ. राजू वाघमारे म्हणाले. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशाला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता संविधान दिनी छापलेली ही उद्देशिका म्हणजे भाजपा व संघाच्या विधानांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. एकीकडे घटना देशाचा आत्मसन्मान असल्याचे पंतप्रधान सांगतात आणि दुसरीकडे त्यांचेच सरकार उद्देशिकेत परस्पर बदल करते, ही बाब त्यांच्या उक्ती व कृतीतील विसंगती दर्शविणारी आहे. घटनेतील एकही शब्द घटना दुरुस्तीशिवाय बदलता येत नाही. यासंदर्भात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)