शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

केंद्रातील सरकार केवळ उद्योगपतींचे

By admin | Updated: October 11, 2014 06:20 IST

केंद्रातील मोदी यांचे सरकार हे केवळ श्रीमंत व उद्योगपतींचे हित जपत असून, महाराष्ट्रातील जनतेने गरिबांच्या हिताचा विचार करणारेच सरकार सत्तेवर आणावे,

नाशिक/पुणे : केंद्रातील मोदी यांचे सरकार हे केवळ श्रीमंत व उद्योगपतींचे हित जपत असून, महाराष्ट्रातील जनतेने गरिबांच्या हिताचा विचार करणारेच सरकार सत्तेवर आणावे, असे आवाहन कॉँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.वणी (ता. दिंडोरी) व सासवड (पुणे) येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर घाणाघाती टीका केली. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले, खोटी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदींनी लोकांची फसवणूक केली आहे. काँग्रेसच्या काळात आधार योजनेद्वारे ‘मनरेगा’ आणि अन्य योजनांतून अनुदानाच्या स्वरूपात थेट नागरिकांच्या खात्यात निधी वर्ग केला जात होता. आता मोदी सरकारच्या काळात जनतेचा पैसा थेट उद्योगपतींच्याच खात्यात जमा होत आहे. राज्यात दुष्काळ पडलेला असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. आता निर्यातबंदीमुळे भाव कोसळल्याने कांदा उत्पादकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस सरकारने ६ लाख लोकांना मोफत औषधे व आरोग्यसुविधा पुरविल्या. अमेरिकन उद्योगपतींच्या सांगण्यावरून १०८ औषधांच्या किमतींमध्ये वाढ करण्यास पंतप्रधानांनी मान्यता दिली आहे. मोदी सरकारच्या काळात कर्करोग आणि मधुमेहाची हजाराच्या घरातील औषधे लाखांत गेली आहेत. चीनच्या राष्ट्रपतींसोबत हिंदुस्थानात लडाखमध्ये चिनी सैन्यही घुसले. पाकिस्तानकडून भारतीय सैन्यावर गोळीबार सुरूच आहे. (प्रतिनिधी)