शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

सीबीएसई शाळांची मुजोरी बंद करणार - प्रकाश जावडेकर

By admin | Updated: April 29, 2017 18:07 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न शाळांवर नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे या शाळांकडून शासकीय अधिकाºयांनाही प्रवेश दिला जात नाही.

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 29 - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न शाळांवर नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे या शाळांकडून शासकीय अधिकाºयांनाही प्रवेश दिला जात नाही. अवाजवी शुल्क आकारणी केली जाते. यापुढे हे चालू देणार नाही. सीबीएसई शाळांची ही मुजोरी बंद करून त्यांच्यावर नियंत्रणासाठी यंत्रणा निर्माण करण्याचा विचार आहे, असे मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी स्पष्ट केले.
 
मनुष्यबळ विकास मंत्रालय, शालेय शिक्षण आणि सारक्षता विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय विभागीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनुष्यबळ विकास विभागाचे सचिव अनिल स्वरूप, सह सचिव अजय तिरके, राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. बालेवाडी येथे सुरू झालेल्या या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दीव प दमण तसेच दादरा नगर हवेली या राज्य व केंद्र शासित प्रदेशांतील शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश आहे. संबंधित राज्यांमध्ये सुरू असणारे शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपुर्ण उपक्रम, प्रयोगशील शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे कार्यक्रम यांचे सादरीकरण होणार आहे. तसेच प्रत्येक राज्याच्या वैशिष्ट्यपुर्ण ठरलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांची देवाण घेवाण होणार आहे. 
 
जावडेकर म्हणाले, देशात सीबीएसईच्या सुमारे १८ हजार शाळा आहेत. मंडळाची संलग्नता घेतल्यानंतर या शाळांना कसलेही बंधन राहत नाही. शासकीय अधिकारी शाळेत जावू शकत नाही. विद्यार्थ्ययांकडून मोठे शुल्क घेतले जाते. या शाळांवर नियंत्रणासाठी मंडळाकडे स्वत:ची यंत्रणा नाही. शिक्षणामध्ये खासगी शाळेंचे महत्व आहे. पण गुणवत्तेच्या पातळीवर शासकीय आणि खासगी शाळांची निकोप स्पर्धा व्हायला हवी. सर्वसामान्य मुलांना खासगी शाळांमध्ये सहज शिक्षण घेता यायला हवे. त्यासाठी या शाळांमध्ये वाजवी शुल्क असायला हवे. त्यामुळे सीबीएसई शाळांची सध्याची व्यवस्था बंद केली जाईल. 
इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ४ टक्के कमी झाली असून खासगी शाळांमध्ये ८ टक्के वाढ झाली आहे. हेे चित्र चिंताजनक असले तरी सरकारी शाळांची स्थिती सुधारून त्या खासगी शाळांप्रमाणेच सक्षम केल्या जातील. मागील दहा वर्षांत शिक्षणाची स्थिती खुप खालवली आहे. यापुढील काळात प्रत्येक घटकांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. अध्ययनाचे निष्कर्ष तयार करण्यात आले असून त्याचे सर्व शाळांमध्ये पालन करावे लागेल, असे जावेडकर यांनी नमुद केले.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जात नाही. पण काही राज्यांनी यावर नाराजी व्यक्त करून त्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाचवी आणि आठवीच्या परीक्षा घेणे, विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याबाबतचा निर्णय राज्यांवर सोपविला जाणार आहे. तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जुनमध्ये परीक्षा घेवून पुन्हा संधी दिली जाईल. त्यामुळे कमी विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील. याविषयी आरटीईमध्ये बदल करण्याचे विधेयक संसदेच्या येत्या अधिवेशनात सादर केले जाईल, असे जावडेकर यांनी सांगितले.