शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

सीबीएसई निकाल : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नऊ विद्यार्थी झाले टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:05 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

मुंबई/ ठाणे/नवी मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नऊ विद्यार्थी देशाच्या गुणवत्ता यादीत (टॉपर) झळकले आहेत. नवी मुंबईतील दीपस्ना पांडा, धात्री मेहता आणि ठाण्यातील अ‍ॅड्री दास या तिघांनी ५०० पैकी ४९७ गुण मिळवले आहेत. तर नवी मुंबईतील वंशिका लोहाना हिला ४९६ गुण मिळाले. नवी मुंबईतील ऋजुता कुलकर्णी, प्रांजल गोयल, मुंबईतील अनिकेत बोरकर, आदित्य संखला आणि प्रणिता राव या पाच जणांना ५०० पैकी ४९५ गुण मिळाले.ठाण्याच्या न्यू होरायझन्स स्कूलचा अ‍ॅड्री दास हा शहरात प्रथम आला आहे. त्याने ९९.४ टक्के इतके गुण पटकावले आहेत. इंजिनीअरिंग क्षेत्रात आपले करिअर करायचे असल्याचा मानस त्याने व्यक्त केला. लहानपणापासूनच अ‍ॅड्रीला अभ्यासामध्ये रुची होती आणि शाळेत पहिल्यापासून तो अव्वल असे. दहावीत त्याने फक्त गणित या विषयासाठी खासगी शिकवणी लावली होती. इतर विषयांचा अभ्यास तो घरच्या घरीच करत होता. दिवसातून सहा ते सात तास तो अभ्यास करीत असे. तो त्याची आई अनिमिता यांच्या सोबत घोडबंदर रोड येथे वास्तव्यास आहे. त्याचे वडील कामानिमित्त परदेशात असतात. हिंदी या विषयात त्याला ९७ गुण मिळाले असून इतर विषयांत त्याला १०० गुण मिळाले आहेत. दुपारी २.३० वाजता त्याला निकाल कळताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुटुंब, मित्रांना समजल्यावर त्यांनी घरी तर अनेकांनी फोन करून शुभेच्छा दिल्याचे अ‍ॅड्रीने सांगितले. वडिलांना आम्ही स्वत: परदेशात भेटायला जाऊन त्यांच्यासोबत हा आनंद साजरा करणार असल्याचे तो म्हणाला.नवी मुंबई व पनवेलमधील पाच जणांना ९९ टक्के गुण मिळाले आहेत. अभ्यासाचा अधिक ताण न घेता इतर छंद जोपासत केवळ नियमित अभ्यास करून हे यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले.सीबीएसई बोर्डातही दहावीच्या निकालात नवी मुंबईत मुलींनी बाजी मारली आहे. नेरूळच्या एपीजे स्कूलची दीपस्ना पांडा व कोपरखैरणेतील रिलायन्स फाउंडेशन स्कूलची धात्री मेहता या दोन्ही विद्यार्थिनींनी ५०० पैकी ४९७ गुण मिळवले. तर याच शाळेतील ऋजुता कुलकर्णी हिने ४९५ गुण मिळवले. न्यू हॉरीझन पब्लिक स्कूलमधील वंशिका रूपचंद लोहाना हिला ४९६ व खारघरमधील बालभारती पब्लिक स्कूलमधील प्रांजल गोयलला ४९५ गुण मिळाले आहेत. धात्री मेहता हिने विज्ञान, गणित, संस्कृत व सोशल सायन्स या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. दीपस्ना हिनेही विज्ञान, गणित व संस्कृत या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.मुंबईतील अणुशक्तीनगरमधील अ‍ॅटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल शाळेतील अनिकेत बोरकर, आदित्य संखला आणि मुलुंडच्या व्हीपीएमएस बीआर तोल इंग्रजी शाळेतील प्रणिता राव या तिन्ही विद्यार्थ्यांना ४९५ गुण मिळाले आहेत.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र