शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सीबीएसई निकाल : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नऊ विद्यार्थी झाले टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:05 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

मुंबई/ ठाणे/नवी मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नऊ विद्यार्थी देशाच्या गुणवत्ता यादीत (टॉपर) झळकले आहेत. नवी मुंबईतील दीपस्ना पांडा, धात्री मेहता आणि ठाण्यातील अ‍ॅड्री दास या तिघांनी ५०० पैकी ४९७ गुण मिळवले आहेत. तर नवी मुंबईतील वंशिका लोहाना हिला ४९६ गुण मिळाले. नवी मुंबईतील ऋजुता कुलकर्णी, प्रांजल गोयल, मुंबईतील अनिकेत बोरकर, आदित्य संखला आणि प्रणिता राव या पाच जणांना ५०० पैकी ४९५ गुण मिळाले.ठाण्याच्या न्यू होरायझन्स स्कूलचा अ‍ॅड्री दास हा शहरात प्रथम आला आहे. त्याने ९९.४ टक्के इतके गुण पटकावले आहेत. इंजिनीअरिंग क्षेत्रात आपले करिअर करायचे असल्याचा मानस त्याने व्यक्त केला. लहानपणापासूनच अ‍ॅड्रीला अभ्यासामध्ये रुची होती आणि शाळेत पहिल्यापासून तो अव्वल असे. दहावीत त्याने फक्त गणित या विषयासाठी खासगी शिकवणी लावली होती. इतर विषयांचा अभ्यास तो घरच्या घरीच करत होता. दिवसातून सहा ते सात तास तो अभ्यास करीत असे. तो त्याची आई अनिमिता यांच्या सोबत घोडबंदर रोड येथे वास्तव्यास आहे. त्याचे वडील कामानिमित्त परदेशात असतात. हिंदी या विषयात त्याला ९७ गुण मिळाले असून इतर विषयांत त्याला १०० गुण मिळाले आहेत. दुपारी २.३० वाजता त्याला निकाल कळताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुटुंब, मित्रांना समजल्यावर त्यांनी घरी तर अनेकांनी फोन करून शुभेच्छा दिल्याचे अ‍ॅड्रीने सांगितले. वडिलांना आम्ही स्वत: परदेशात भेटायला जाऊन त्यांच्यासोबत हा आनंद साजरा करणार असल्याचे तो म्हणाला.नवी मुंबई व पनवेलमधील पाच जणांना ९९ टक्के गुण मिळाले आहेत. अभ्यासाचा अधिक ताण न घेता इतर छंद जोपासत केवळ नियमित अभ्यास करून हे यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले.सीबीएसई बोर्डातही दहावीच्या निकालात नवी मुंबईत मुलींनी बाजी मारली आहे. नेरूळच्या एपीजे स्कूलची दीपस्ना पांडा व कोपरखैरणेतील रिलायन्स फाउंडेशन स्कूलची धात्री मेहता या दोन्ही विद्यार्थिनींनी ५०० पैकी ४९७ गुण मिळवले. तर याच शाळेतील ऋजुता कुलकर्णी हिने ४९५ गुण मिळवले. न्यू हॉरीझन पब्लिक स्कूलमधील वंशिका रूपचंद लोहाना हिला ४९६ व खारघरमधील बालभारती पब्लिक स्कूलमधील प्रांजल गोयलला ४९५ गुण मिळाले आहेत. धात्री मेहता हिने विज्ञान, गणित, संस्कृत व सोशल सायन्स या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. दीपस्ना हिनेही विज्ञान, गणित व संस्कृत या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.मुंबईतील अणुशक्तीनगरमधील अ‍ॅटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल शाळेतील अनिकेत बोरकर, आदित्य संखला आणि मुलुंडच्या व्हीपीएमएस बीआर तोल इंग्रजी शाळेतील प्रणिता राव या तिन्ही विद्यार्थ्यांना ४९५ गुण मिळाले आहेत.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र