शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सीबीएसई निकाल : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नऊ विद्यार्थी झाले टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:05 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

मुंबई/ ठाणे/नवी मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नऊ विद्यार्थी देशाच्या गुणवत्ता यादीत (टॉपर) झळकले आहेत. नवी मुंबईतील दीपस्ना पांडा, धात्री मेहता आणि ठाण्यातील अ‍ॅड्री दास या तिघांनी ५०० पैकी ४९७ गुण मिळवले आहेत. तर नवी मुंबईतील वंशिका लोहाना हिला ४९६ गुण मिळाले. नवी मुंबईतील ऋजुता कुलकर्णी, प्रांजल गोयल, मुंबईतील अनिकेत बोरकर, आदित्य संखला आणि प्रणिता राव या पाच जणांना ५०० पैकी ४९५ गुण मिळाले.ठाण्याच्या न्यू होरायझन्स स्कूलचा अ‍ॅड्री दास हा शहरात प्रथम आला आहे. त्याने ९९.४ टक्के इतके गुण पटकावले आहेत. इंजिनीअरिंग क्षेत्रात आपले करिअर करायचे असल्याचा मानस त्याने व्यक्त केला. लहानपणापासूनच अ‍ॅड्रीला अभ्यासामध्ये रुची होती आणि शाळेत पहिल्यापासून तो अव्वल असे. दहावीत त्याने फक्त गणित या विषयासाठी खासगी शिकवणी लावली होती. इतर विषयांचा अभ्यास तो घरच्या घरीच करत होता. दिवसातून सहा ते सात तास तो अभ्यास करीत असे. तो त्याची आई अनिमिता यांच्या सोबत घोडबंदर रोड येथे वास्तव्यास आहे. त्याचे वडील कामानिमित्त परदेशात असतात. हिंदी या विषयात त्याला ९७ गुण मिळाले असून इतर विषयांत त्याला १०० गुण मिळाले आहेत. दुपारी २.३० वाजता त्याला निकाल कळताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुटुंब, मित्रांना समजल्यावर त्यांनी घरी तर अनेकांनी फोन करून शुभेच्छा दिल्याचे अ‍ॅड्रीने सांगितले. वडिलांना आम्ही स्वत: परदेशात भेटायला जाऊन त्यांच्यासोबत हा आनंद साजरा करणार असल्याचे तो म्हणाला.नवी मुंबई व पनवेलमधील पाच जणांना ९९ टक्के गुण मिळाले आहेत. अभ्यासाचा अधिक ताण न घेता इतर छंद जोपासत केवळ नियमित अभ्यास करून हे यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले.सीबीएसई बोर्डातही दहावीच्या निकालात नवी मुंबईत मुलींनी बाजी मारली आहे. नेरूळच्या एपीजे स्कूलची दीपस्ना पांडा व कोपरखैरणेतील रिलायन्स फाउंडेशन स्कूलची धात्री मेहता या दोन्ही विद्यार्थिनींनी ५०० पैकी ४९७ गुण मिळवले. तर याच शाळेतील ऋजुता कुलकर्णी हिने ४९५ गुण मिळवले. न्यू हॉरीझन पब्लिक स्कूलमधील वंशिका रूपचंद लोहाना हिला ४९६ व खारघरमधील बालभारती पब्लिक स्कूलमधील प्रांजल गोयलला ४९५ गुण मिळाले आहेत. धात्री मेहता हिने विज्ञान, गणित, संस्कृत व सोशल सायन्स या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. दीपस्ना हिनेही विज्ञान, गणित व संस्कृत या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.मुंबईतील अणुशक्तीनगरमधील अ‍ॅटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल शाळेतील अनिकेत बोरकर, आदित्य संखला आणि मुलुंडच्या व्हीपीएमएस बीआर तोल इंग्रजी शाळेतील प्रणिता राव या तिन्ही विद्यार्थ्यांना ४९५ गुण मिळाले आहेत.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र