बदायूँ/लखनौ(उप्र) : चुलत बहिणी असलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचे मृतदेह झाडाला टांगून ठेवल्याच्या क्रूर घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटल्यानंतर उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली आह़े
दरम्यान या बलात्कार व हत्याप्रकरणी आतार्पयत दोन पोलीस कर्मचा:यांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आह़े या सर्व आरोपींना सर्वादेखत फाशी द्या़ ज्याप्रमाणो त्यांनी आमच्या मुलींना फासावर लटकवले तसेच त्यांनाही लटकवा, अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आह़े या कुटुंबाने सरकारी मदतही नाकारली असून आम्हाला पैशांची मदत नको तर न्याय हवा, अशी मागणी केली आह़े दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणापेक्षाही हे प्रकरण गंभीर व भयावह असल्याचेही पीडितांच्या कुटुंबियांनी म्हटले आह़े
उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यातील उशैत येथे दलित कुटुंबातील दोन चुलत बहिणींवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली होती़ 14 व 15 वयोगटातील या मुली 27 मेच्या रात्री बेपत्ता झाल्या होत्या़ दुस:या दिवशी त्यांचे मृतदेह झाडाला टांगलेले आढळले होत़े या घटनेवरून उत्तर प्रदेशासह देशभर संतापाची लाट उसळल्यानंतर आज शनिवारी उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली़ दरम्यान, बसपाप्रमुख मायावती रविवारी पिडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.
आरोपी तीन भावांना अटक
याप्रकरणी पप्पू यादव, अवधेश यादव व उव्रेश यादव या तीन भावांना अटक करण्यात आली़ त्यांच्याविरूत्र भांदवीच्या कलम 3क्2 (हत्या) आणि 376 (बलात्कार) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सव्रेक्ष यादव आणि छत्रपाल यादव या दोन कॉन्स्टेबलला काल अटक करण्यात आली़ त्यांच्याविरूद्ध कलम 12क् ब (फौजदारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याप्रकरणी एकूण सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दोन अज्ञात अद्यापही फरार आहेत़ (वृत्तसंस्था)
- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी कटरा सादतगंज येथे जाऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केल़े या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली़ यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी पीडित कुटुंबाची व्यथा बोलून दाखवली़ मी पीडित कुटुंबाशी बोललो़ सरकारी मदतीने आपल्या मुलींचा सन्मान परत येणार नाही, असे पीडित कुटुंबाने मला सांगितल़े त्यांना पैशांची मदत नको, न्याय हवा आह़े
- उत्तर प्रदेश पोलिसांवर त्यांचा विश्वास नाही़ उत्तर प्रदेश पोलीस आम्हाला न्याय देऊ शकणार नाही, यावर ते ठाम आहेत़ आम्हीही पीडित कुटुंबाच्या या मताशी सहमत आहोत़ या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, असे राहुल म्हणाल़े