शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

बदायूँचा तपास सीबीआयकडे

By admin | Updated: May 31, 2014 23:03 IST

क्रूर घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटल्यानंतर उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली आह़े

बदायूँ/लखनौ(उप्र) :  चुलत बहिणी असलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचे मृतदेह झाडाला टांगून ठेवल्याच्या क्रूर घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटल्यानंतर उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली आह़े
 दरम्यान या बलात्कार व हत्याप्रकरणी आतार्पयत दोन पोलीस कर्मचा:यांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आह़े या सर्व आरोपींना सर्वादेखत फाशी द्या़ ज्याप्रमाणो त्यांनी आमच्या मुलींना फासावर लटकवले तसेच त्यांनाही लटकवा, अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आह़े या कुटुंबाने सरकारी मदतही नाकारली असून आम्हाला पैशांची मदत नको तर न्याय हवा, अशी मागणी केली आह़े दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणापेक्षाही हे प्रकरण गंभीर व भयावह असल्याचेही पीडितांच्या कुटुंबियांनी म्हटले आह़े
उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यातील उशैत येथे दलित कुटुंबातील दोन चुलत बहिणींवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली होती़ 14 व 15 वयोगटातील या मुली 27 मेच्या रात्री बेपत्ता झाल्या होत्या़ दुस:या दिवशी त्यांचे मृतदेह झाडाला टांगलेले आढळले होत़े या घटनेवरून उत्तर प्रदेशासह देशभर संतापाची लाट उसळल्यानंतर आज शनिवारी उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली़ दरम्यान, बसपाप्रमुख मायावती रविवारी पिडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.
आरोपी तीन भावांना अटक
याप्रकरणी पप्पू यादव, अवधेश यादव व उव्रेश यादव या तीन भावांना अटक करण्यात आली़ त्यांच्याविरूत्र भांदवीच्या कलम 3क्2 (हत्या) आणि 376 (बलात्कार) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सव्रेक्ष यादव आणि छत्रपाल यादव या दोन कॉन्स्टेबलला काल अटक करण्यात आली़ त्यांच्याविरूद्ध कलम 12क् ब (फौजदारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याप्रकरणी एकूण सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दोन अज्ञात अद्यापही फरार आहेत़ (वृत्तसंस्था)
 
- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी कटरा सादतगंज येथे जाऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केल़े या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली़ यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी पीडित कुटुंबाची व्यथा बोलून दाखवली़ मी पीडित कुटुंबाशी बोललो़ सरकारी मदतीने आपल्या मुलींचा सन्मान परत येणार नाही, असे पीडित कुटुंबाने मला सांगितल़े त्यांना पैशांची मदत नको, न्याय हवा आह़े 
- उत्तर प्रदेश पोलिसांवर त्यांचा विश्वास नाही़ उत्तर प्रदेश पोलीस आम्हाला न्याय देऊ शकणार नाही, यावर ते ठाम आहेत़ आम्हीही पीडित कुटुंबाच्या या मताशी सहमत आहोत़ या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, असे राहुल म्हणाल़े