शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

कर्जाने पिचलेल्या शेतकऱ्यांचा ‘क’ वर्ग

By admin | Updated: February 10, 2015 02:19 IST

विदर्भ व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या, प्रापंचिक समस्यांनी गांजलेल्या आणि कर्जाच्या

संदीप प्रधान, मुंबईविदर्भ व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या, प्रापंचिक समस्यांनी गांजलेल्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेल्या शेतकऱ्यांचा ‘क ’वर्ग निर्माण केला जाणार आहे. अन्नसुरक्षेपासून पेन्शनपर्यंत सर्व सरकारी योजनांचा लाभ मुख्यत्वे याच शेतकऱ्यांना देऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले जाणार आहे.पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी फुलंब्री, पैठण व औरंगाबाद या परिसरातील ३० हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून अशा ‘क’ वर्गातील २ हजार शेतकऱ्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली आहे. आता पुन्हा सर्वेक्षण करून अत्यंत अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार केली जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये राज्यात शेतकऱ्यांचा ‘क’ वर्ग शोधून काढण्याची आग्रही मागणी कदम यांची होती. यामुळे मागील मंत्रिमंडळ बैठकीत विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी एका जिल्ह्यात सर्वेक्षण करून कदम यांची कल्पना साकारते काय हे तपासणीचे आदेश दिले होते. शेतकऱ्यांकडून एकूण १५ प्रश्नांची उत्तरे घेतली जातील. यात कौटुंबिक माहितीसह, इतर उत्पन्नाचे साधन, बँक-सोसायटी-खासगी कर्ज, धार्मिक कार्य किंवा विवाहाची तरतूद, विम्याचे संरक्षण आणि कमावत्या व्यक्ती याचा समावेश असेल. हे सर्वेक्षण त्याच गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, अंगणवाडी सेविका व डॉक्टर करणार असल्याने फसवाफसवी करून ‘क’ वर्ग पदरात पाडून घेण्याची क्लृप्ती करण्यास वाव राहणार नाही. या सर्वेक्षणानंतर मोठ्या व सधन शेतकऱ्यांचा ‘अ’ वर्ग, आर्थिक परिस्थितीचे नेटके नियोजन केलेल्या शेतकऱ्यांचा ‘ब’ वर्ग आणि संकटात असलेल्या व कदाचित जीवनयात्रा संपवण्याचा विचार करू शकणाऱ्या शेतकऱ्यांचा ‘क’ वर्ग तयार केला जाईल. (प्रतिनिधी)