शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

बिहारप्रमाणे महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व्हावी - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 13:52 IST

बिहारची माहिती मागवली असून, महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले.

जातीनिहाय जनगणना व्हावी, असा ठराव विधानसभा अध्यक्षांनी मांडला होता आणि त्यास सगळ्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आता केंद्राची मदत न घेता बिहारप्रमाणे महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार बिहारची माहिती मागवली असून, महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक दौऱ्यावर असताना शनिवारी म्हटले. राष्ट्रवादी भवनातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जातीनिहाय जनगणना करणे ही बाब खर्चिक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलावे लागेल. तसेच, सगळ्या समाज घटकांना कोण किती आहे? हे समजायला हवे, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, नाशिकच्या छगन भुजबळ यांच्या पालकमंत्रिपदाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, हा पक्षांतर्गत विषय आहे. मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांना खाती देणे, पालकमंत्री नेमणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मात्र पुढे चांगल्या गोष्टी घडतील. 

याचबरोबर, आरक्षणासंबंधी प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. कायदा, नियमाच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यावे लागेल. यापूर्वी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. ओबीसी, मराठा समाज, इतर समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यामुळे आताच्या ५२ टक्के आणि केंद्राच्या आर्थिक दुर्बलांसाठीच्या दहा टक्के आरक्षणाला धक्का न लावता न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांसंबंधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अजित पवार म्हणाले.

कांद्याचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न सुरुकांद्याच्या निर्यातशुल्काचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले असताना त्यांना हा विषय मांडायला सांगितला होता, असे अजित पवार म्हणाले. तसेच, नाशिकच्या दौऱ्यात कांदे, टोमॅटो फेकल्याच्या घटनेकडे पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार म्हणाले, कांदे फेकले नाहीत. मला समजले, की टोमॅटोचे क्रेट्स ओतत होते. तेव्हा मी जात असतो, तर त्याबद्दल विचारले असते. मला मिळालेल्या माहितीनुसार आमच्या पूर्वीच्या पक्षातील तीन कार्यकर्त्यांनी टोमॅटोचे क्रेट्स ओतले होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारण