शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

दीड कोटी जनतेला कॅशलेस आरोग्य विमा

By admin | Updated: August 19, 2016 00:45 IST

राज्यातील ५ कोटी जनता अर्थिक दुर्बल घटकात येते. त्यातील दीड कोटी लोकांना पहिल्या टप्प्यात १२०० आजारांसाठी कॅशलेस आरोग्य विमा दिला जाणार आहे. महात्मा फुले

पुणे : राज्यातील ५ कोटी जनता अर्थिक दुर्बल घटकात येते. त्यातील दीड कोटी लोकांना पहिल्या टप्प्यात १२०० आजारांसाठी कॅशलेस आरोग्य विमा दिला जाणार आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ही सुविधा दिली जाईल,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात दिली. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अत्याधुनिक एम.आर.आय युनिटच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, रुग्णालयाचे विश्वस्त व ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर व रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते. राज्यातील ५०० रुग्णालयांची निवड करुन त्याठिकाणी कॅशलेस विमा सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. याचा लाभ घेता यावा यासाठी दीड कोटी जनतेला स्मार्ट कार्ड दिली जाणार आहेत. यामध्ये शेतकरी, दुर्बल घटकातील लोकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व रुग्णालयात धर्मादायसाठी विशिष्ट खाटा राखीव असतात. मात्र रुग्णालयांकडून त्याचा योग्य पद्धतीने वापर केला जात नसल्याने राज्यात अनेक नामांकित रुग्णालयांवर फौजदारी खटला भरावा लागतो हे दुर्दैवी आहे. येत्या काळात डिजिटल इंटरफेसच्या साह्याने शहरांतील रुग्णालयांतील दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या राखीव जागांबाबतची माहिती वेबसाईटवर टाकण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जे.जे. रुग्णालयाला ५ खेडी जोडून त्याअंतर्गत टेलिमेडीसीनचा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला. येत्या काळात राज्यातील ग्रामीण भाग अशा पद्धतीने शहराला जोडण्याचा प्रयत्न करण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविकात डॉ. धनंजय केळकर यांनी मंगेशकर हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सेवेची माहिती देऊन २९ कोटीहून अधिक रकमेचे वैद्यकीय उपचार गरिबांवर केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान - मुंबईमधील इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक करताना कोणताच वाद नको आहे. त्यासाठी सर्व नेत्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी चर्चा करून स्मारकाचे काम सुरू झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन २०१५-१६ वर्षाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. - पुण्यातील सावळाराम वानखेडे, अशोकलाल शहा, अजय चांदणे, आप्पा मोहिते, देवीचंद जैन आणि स्वरूप वर्धिनी व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.राकेश शर्मा यांना शौर्य पुरस्कार : थोरले बाजीराव पेशवे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर (निवृत्त) राकेश शर्मा यांना शौर्य पुरस्कार वितरीत करण्यात आला. उद्योगपती अभय फिरोदिया प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. शर्मा यांनी पुरस्कार स्विकारताच प्रेक्षागृहाने टाळ्यांच्या कडकडाट करीत उभे राहून त्यांना मानवंदना दिली.