शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आरटीओतील कथित घोटाळ्यांचे प्रकरण लोकायुक्तांकडून बंद; ठोस पुरावे नसल्याचा दिला अभिप्राय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 07:16 IST

आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या माध्यमातून परिवहन विभागात बदल्या आणि अन्य प्रकरणांत घोटाळे करण्यात आल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती.

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन विभागातील कथित घोटाळ्यासंदर्भात दिलेल्या तक्रारीत ठोस पुरावे नसल्याचा अभिप्राय देत लोकायुक्तांनी ते प्रकरण बंद केले आहे. आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या माध्यमातून परिवहन विभागात बदल्या आणि अन्य प्रकरणांत घोटाळे करण्यात आल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही त्यांच्याकडे सोमय्यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्यास लोकायुक्तांना सांगितले होते. खरमाटे यांच्या अनुषंगाने परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले होते. लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी स्पष्ट केले की, सोमय्या यांचे म्हणणे मी विस्ताराने ऐकले आहे. सोमय्या यांनी एका निनावी पत्राचा आधार घेत आरोप केले होते. मात्र त्यातील आरोपांची पुष्टी होईल, असे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. परिवहन मंत्री अनिल परब, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) आशिषकुमार सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य  आढळत नाही.  लोकायुक्तांनी असेही स्पष्ट केले की, या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे, सोमय्यादेखील उच्च न्यायालयात दाद मागू शकतात. शासनाकडून खरमाटे प्रकरणात खुली चौकशीबजरंग खरमाटे यांच्यासंदर्भात आलेल्या तक्रारीची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. लोकायुक्तांसमोरील सुनावणीदरम्यान राज्य शासनाकडून ही माहिती देण्यात आली. त्यामुळे लवकरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणी चौकशी केली जाईल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी