शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

रस्त्यावर मजुरी करून सांभाळते गावाचा कारभार!

By admin | Updated: April 5, 2017 01:08 IST

जिद्दीने ही रणरागिणी गावाच्या विकासासाठी, गाव आदर्श करण्यासाठी झटत आहे.

अतुल डोंगरे,निमगाव केतकी- तिचं हातावरचं पोट... रोजंदारीवर काम केलं तरच घरातील चूल पेटते. तिला गावच्या सरपंचपदाची संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्यासाठी तिनेही कंबर कसली. चुकीची कामे करण्यासाठी तिच्यावर दबाव वाढला, प्रसंगी मारहाणही झाली. परंतु जिद्दीने ही रणरागिणी गावाच्या विकासासाठी, गाव आदर्श करण्यासाठी झटत आहे. व्याहळी (ता. इंदापूर) येथील सरपंच पल्लवी शिंदे या रणरागिणीचा हा लढा सर्व महिलांना प्रेरक आहे. व्याहळी गावासाठी सरपंच पदासाठी आरक्षण पडले. अन् त्या दोन वर्षांपूर्वी पारधी समाजातील पल्लवी शिंदे गावाच्या सरपंचपदावर विराजमान झाल्या. सत्तेचे विकेंद्रीकरण होत असताना पंचायतराजमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषदची निर्मिती झाली. पुढे अनुषंगाने पुरुषांबरोबर महिलांना आरक्षण मिळाले. अन इतक्या दिवस उपेक्षीत राहिलेल्या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांना राजकारणात स्थान मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी महिला गावचा कारभार चालवितात. पण व्याहळी गावाच्या या सरपंच महिलेची कहाणी काही वेगळीच आहे. लोकांनी निवडून दिले. सरपंच झाल्या. परंतु, कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी, प्रपंचाचा गाडा चालविण्यासाठीरोज तिला चिखलवाटा तुडवत रोजंदारीवर काम करावे लागते. पती सुकडोबा शिंदे यांच्यासह रस्त्याच्या कामावर त्या दररोज रोजंदारीसाठी जात आहेत. सरपंच पल्लवी शिंदे यांनी सांगितले, मला दोन मुले आहेत. मिळणाऱ्या मजुरीवर आम्ही चार जण सुखाचे घास खातो. गावासाठी काहीतरी करण्याची एवढी मोठी संधी मिळाली आहे. गावाचा विकास करायचा आहे. गावात गटर, पिण्याच्या पाण्याची सोय, गावातील मुलांच्या व समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करावयाचे आहे. एखाद्या सधन कुटुंबातील महिला सरपंच झाली. तर ती महिला केवळ कागदावर सहीपुरतीच सरपंच असते. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीत ‘सरपंच पती’ हे नवीन पद तयार झाले आहे. मात्र पल्लवी शिंदे या स्वत: ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कामकाजाची माहिती घेतात. >दोन वर्षांतच त्यांनी गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. गावात अनेक विकासकामे करण्याचा नेहमीच प्रयत्न आहे. परंतु काही ग्रामपंचायत सदस्यांमुळे त्यांना काम करताना अडचणी येत आहेत. बेकायदेशीर कामांसाठी त्यांना ग्रामपंचायतीचे काही सदस्य सही करण्यासाठी हट्ट करतात. पण त्या काही सही करत नाही. यामुळे कित्येक वेळा सदस्यांमध्ये भांडणेही झाले आहेत. दोन वेळा त्यांना मारहाणही झाली आहे. परंतु या सर्व वेदना सहन करत सरपंचपदाला गालबोट लागू नये, म्हणून चोख कारभार करताहेत.