शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

रस्त्यावर मजुरी करून सांभाळते गावाचा कारभार!

By admin | Updated: April 5, 2017 01:08 IST

जिद्दीने ही रणरागिणी गावाच्या विकासासाठी, गाव आदर्श करण्यासाठी झटत आहे.

अतुल डोंगरे,निमगाव केतकी- तिचं हातावरचं पोट... रोजंदारीवर काम केलं तरच घरातील चूल पेटते. तिला गावच्या सरपंचपदाची संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्यासाठी तिनेही कंबर कसली. चुकीची कामे करण्यासाठी तिच्यावर दबाव वाढला, प्रसंगी मारहाणही झाली. परंतु जिद्दीने ही रणरागिणी गावाच्या विकासासाठी, गाव आदर्श करण्यासाठी झटत आहे. व्याहळी (ता. इंदापूर) येथील सरपंच पल्लवी शिंदे या रणरागिणीचा हा लढा सर्व महिलांना प्रेरक आहे. व्याहळी गावासाठी सरपंच पदासाठी आरक्षण पडले. अन् त्या दोन वर्षांपूर्वी पारधी समाजातील पल्लवी शिंदे गावाच्या सरपंचपदावर विराजमान झाल्या. सत्तेचे विकेंद्रीकरण होत असताना पंचायतराजमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषदची निर्मिती झाली. पुढे अनुषंगाने पुरुषांबरोबर महिलांना आरक्षण मिळाले. अन इतक्या दिवस उपेक्षीत राहिलेल्या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांना राजकारणात स्थान मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी महिला गावचा कारभार चालवितात. पण व्याहळी गावाच्या या सरपंच महिलेची कहाणी काही वेगळीच आहे. लोकांनी निवडून दिले. सरपंच झाल्या. परंतु, कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी, प्रपंचाचा गाडा चालविण्यासाठीरोज तिला चिखलवाटा तुडवत रोजंदारीवर काम करावे लागते. पती सुकडोबा शिंदे यांच्यासह रस्त्याच्या कामावर त्या दररोज रोजंदारीसाठी जात आहेत. सरपंच पल्लवी शिंदे यांनी सांगितले, मला दोन मुले आहेत. मिळणाऱ्या मजुरीवर आम्ही चार जण सुखाचे घास खातो. गावासाठी काहीतरी करण्याची एवढी मोठी संधी मिळाली आहे. गावाचा विकास करायचा आहे. गावात गटर, पिण्याच्या पाण्याची सोय, गावातील मुलांच्या व समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करावयाचे आहे. एखाद्या सधन कुटुंबातील महिला सरपंच झाली. तर ती महिला केवळ कागदावर सहीपुरतीच सरपंच असते. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीत ‘सरपंच पती’ हे नवीन पद तयार झाले आहे. मात्र पल्लवी शिंदे या स्वत: ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कामकाजाची माहिती घेतात. >दोन वर्षांतच त्यांनी गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. गावात अनेक विकासकामे करण्याचा नेहमीच प्रयत्न आहे. परंतु काही ग्रामपंचायत सदस्यांमुळे त्यांना काम करताना अडचणी येत आहेत. बेकायदेशीर कामांसाठी त्यांना ग्रामपंचायतीचे काही सदस्य सही करण्यासाठी हट्ट करतात. पण त्या काही सही करत नाही. यामुळे कित्येक वेळा सदस्यांमध्ये भांडणेही झाले आहेत. दोन वेळा त्यांना मारहाणही झाली आहे. परंतु या सर्व वेदना सहन करत सरपंचपदाला गालबोट लागू नये, म्हणून चोख कारभार करताहेत.