शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

रस्त्यावर मजुरी करून सांभाळते गावाचा कारभार!

By admin | Updated: April 5, 2017 01:08 IST

जिद्दीने ही रणरागिणी गावाच्या विकासासाठी, गाव आदर्श करण्यासाठी झटत आहे.

अतुल डोंगरे,निमगाव केतकी- तिचं हातावरचं पोट... रोजंदारीवर काम केलं तरच घरातील चूल पेटते. तिला गावच्या सरपंचपदाची संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्यासाठी तिनेही कंबर कसली. चुकीची कामे करण्यासाठी तिच्यावर दबाव वाढला, प्रसंगी मारहाणही झाली. परंतु जिद्दीने ही रणरागिणी गावाच्या विकासासाठी, गाव आदर्श करण्यासाठी झटत आहे. व्याहळी (ता. इंदापूर) येथील सरपंच पल्लवी शिंदे या रणरागिणीचा हा लढा सर्व महिलांना प्रेरक आहे. व्याहळी गावासाठी सरपंच पदासाठी आरक्षण पडले. अन् त्या दोन वर्षांपूर्वी पारधी समाजातील पल्लवी शिंदे गावाच्या सरपंचपदावर विराजमान झाल्या. सत्तेचे विकेंद्रीकरण होत असताना पंचायतराजमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषदची निर्मिती झाली. पुढे अनुषंगाने पुरुषांबरोबर महिलांना आरक्षण मिळाले. अन इतक्या दिवस उपेक्षीत राहिलेल्या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांना राजकारणात स्थान मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी महिला गावचा कारभार चालवितात. पण व्याहळी गावाच्या या सरपंच महिलेची कहाणी काही वेगळीच आहे. लोकांनी निवडून दिले. सरपंच झाल्या. परंतु, कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी, प्रपंचाचा गाडा चालविण्यासाठीरोज तिला चिखलवाटा तुडवत रोजंदारीवर काम करावे लागते. पती सुकडोबा शिंदे यांच्यासह रस्त्याच्या कामावर त्या दररोज रोजंदारीसाठी जात आहेत. सरपंच पल्लवी शिंदे यांनी सांगितले, मला दोन मुले आहेत. मिळणाऱ्या मजुरीवर आम्ही चार जण सुखाचे घास खातो. गावासाठी काहीतरी करण्याची एवढी मोठी संधी मिळाली आहे. गावाचा विकास करायचा आहे. गावात गटर, पिण्याच्या पाण्याची सोय, गावातील मुलांच्या व समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करावयाचे आहे. एखाद्या सधन कुटुंबातील महिला सरपंच झाली. तर ती महिला केवळ कागदावर सहीपुरतीच सरपंच असते. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीत ‘सरपंच पती’ हे नवीन पद तयार झाले आहे. मात्र पल्लवी शिंदे या स्वत: ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कामकाजाची माहिती घेतात. >दोन वर्षांतच त्यांनी गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. गावात अनेक विकासकामे करण्याचा नेहमीच प्रयत्न आहे. परंतु काही ग्रामपंचायत सदस्यांमुळे त्यांना काम करताना अडचणी येत आहेत. बेकायदेशीर कामांसाठी त्यांना ग्रामपंचायतीचे काही सदस्य सही करण्यासाठी हट्ट करतात. पण त्या काही सही करत नाही. यामुळे कित्येक वेळा सदस्यांमध्ये भांडणेही झाले आहेत. दोन वेळा त्यांना मारहाणही झाली आहे. परंतु या सर्व वेदना सहन करत सरपंचपदाला गालबोट लागू नये, म्हणून चोख कारभार करताहेत.