शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 18:34 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. या अधिवासात शंभर वाघ गुण्यागोविंदाने तेथे राहू शकतात.

- अनिल कडू  अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. या अधिवासात शंभर वाघ गुण्यागोविंदाने तेथे राहू शकतात. दरम्यान आजमितीस मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत केवळ ५० वाघ आहेत. देशात सर्वप्रथम अस्तित्वात आलेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांमधील एक आणि महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. जैविक विविधता व वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनात मेळघाटचे योगदान सर्वाधिक आहे.मेळघाटात साग, ऐन, अर्जून, हलदु, बांबू या प्रमुख वृक्ष प्रजातींसह वृक्षाच्या ९०, झुडपांच्या ६६, तृणांच्या ३७६, वेलींच्या ५६, गवताच्या ९९ प्रजाती आहेत. यात औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. वन्य प्राण्यांमध्ये वाघ, बिबट, रानकुत्रे, तडस, रानगवे, सांबर, चितळ, भेडकी, चौसिंगा, अस्वल, मोर, सायळ, माकड यांचे सुद्धा वास्तव्य आहे. २६३ पेक्षा अधिक पक्षी, ९६ प्रकारचे मासे, ५४ प्रकारचे सरपटणारे प्राणी, उडती खार आणि रंग बदलणारा सरडा या मेळघाटच्या जमेच्या बाजू आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आज ५० वाघांसह अत्यंत दुर्मिळ असलेला रानपिंगळाही मेळघाटात आहे. हा रानपिंगळा सर्वप्रथम १८७२ मध्ये जगासमोर आला. नंतर पुढे साधारणत: शंभर वर्षात रानपिंगळ्याचे कुठेच अस्तित्व आढळून आले नाही. रानपिंगळा जगातून नामशेष झाल्याचे बोलले जात असतानाच १९९७ ला मध्यप्रदेश, ओरीसा व महाराष्ट्रात त्याचे अस्तित्व दिसून आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गंत चौराकुंड क्षेत्रात फालतू नामक वनमजुराने त्यास हुडकून काढले आणि हा फालतू चक्क रानपिंगळ्याच्या प्रेमातच पडला. मेळघाटचे ऋतुमानानुसार बदलणारे नैसर्गिक सौंदर्य, येथील समृद्ध वन्यजीव संपदा, जैवविविधता आणि वन्यजीव बघण्याकरिता पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढीवर आहे. यात विदेशी पर्यटकही ब-यापैकी आहेत. दरम्यान सततच्या पावसामुळे पर्यटकांची निराशा होत आहे. जंगल सफारीला पावसामुळे ब्रेक सेमाडोह निसर्ग निर्वचन संकुलात दाखल झालेले पर्यटक जंगल सफारीपासून वंचित राहत आहे. जंगल सफारीचा पिपल पडावा ते अँगल नालापर्यंतचा रस्ता पावसामुळे, नाल्यांवरील पुलावर खड्डे पडल्यामुळे बंद पडला आहे. कुवापाटी-बुजरूकदोड-कोलकास दरम्यानचा जंगल सफारी मार्ग सुरू असला तरी तो केव्हाही बंद राहतो. या मार्गावर पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येत नाही.  हमखास दिसणारे प्राणीही या पावसामुळे पर्यटकांच्या नजरेसमोर फिरकत नाहीत.

वन्यजीव सप्ताहयंदा वेगवेगळ्या उपक्रमांतर्गंत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केल्या गेला. देशात दरवर्षी  २ ते ८ ऑक्टोंबरपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा केल्या जायचा. पुढे १९८३ पासून हा सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर असा साजरा केला जातो. तर तत्कालिन पंत्प्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या दुरदर्शीपणातूनच वन्यजीवांना कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. त्यांच्याच प्रयत्नातूनच १ एप्रिल १९७३ ला भारतात व्याघ्र प्रकल्पाची योजना कार्यान्वित झाली.

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पTigerवाघMaharashtraमहाराष्ट्र