शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? एकनाथ शिंदेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 06:51 IST

Eknath Shinde : सध्या राज्यात युतीचे सरकार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही युतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढविल्या जातील, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

ठाणे  : कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला तोच मुख्यमंत्री होणार का? सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का?, असा सवाल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. ठाण्यातील नागरिकांतर्फे शनिवारी रात्री डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून हा सवाल उपस्थित केला.

सध्या राज्यात युतीचे सरकार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही युतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढविल्या जातील, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. मागील अडीच वर्षांपासून शिवसेना अडचणीत होती; मात्र आता अडचणीत आलेली शिवसेना आम्ही पुढे नेत आहोत. त्यामुळे येत्या अडीच वर्षांत एकाही शिवसैनिकाच्या केसाला हात लावणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या राज्यात कोणालाही वेडेवाकडे  बोलता येणार नाही. हिंदू देवदेवतांबदल चुकीचे बोलू नये, असा सूचनावजा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

आरे कारशेड झाले नाही, तर प्रकल्प तीन ते चार वर्षे लांबणीवर पडल्याने त्याचा खर्चही वाढणार आहे. मात्र, त्यात आता येथील एकही वृक्ष तोडला जाणार नाही. जे तुम्हाला जमले ते अजित पवारांना का जमले नाही? असा सवाल त्यांना केला असता, पवार यांनी प्रयत्न केला होता. मात्र त्यांना ते शक्य झाले नसल्याचे त्यांनी सांगत, आम्ही घड्याळ बघून काम करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

‘मुंबई वेगळी करू शकणार नाही’पुढील अडीच वर्षांत मुंबईतील रस्ते काँक्रीटचे होणार आहेत. त्यामुळे प्रवास सुखकारक होईल. ठाणेही खड्डे आणि वाहतूककोंडीमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच वेगळी करू शकत नाही, फक्त काहीजण राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 

७५ रिक्षा, दुचाकींसह स्वागतयात्रा व्यासपीठावर शिंदे यांचा आजवरचा राजकीय जीवनप्रवास प्रतिकृतींद्वारे रेखाटण्यात आला. त्यात किसननगर शाखेपासून ठाणे महापालिका ते मंत्रालयाची बोलकी प्रतिकृती उभारली होती. ७५ रिक्षा आणि ७५ दुचाकींची स्वागतयात्रा शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानापासून नितीन सिग्नल, कॅडबरी सिग्नल, वर्तकनगर सिग्नल, शिवाईनगर सिग्नल, गांधीनगर सिग्नल, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहापर्यंत काढण्यात आली.

शेवटच्या घटकाची कामे होवोत : काडसिद्धेश्वर स्वामी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही शिंदे हे मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले. एखाद्या खेड्यातील व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होतेय, हेच भारतीय लोकशाहीचे बळ आहे. शिंदे हे संवेदनशील आहेत. काहीच न बोलता ते काम करतात. त्यांच्या हातून समाजातील शेवटच्या घटकाची कामे होवोत आणि सर्वच घटक त्यांच्या कार्याने सुखावतील, असा विश्वास कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी कार्यक्रमात व्यक्त केला. अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत असतात. या कामाच्या तपश्चर्येतून सिद्धी प्राप्त होते. तेव्हा त्या व्यक्तीच्या परिश्रमाचा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाचा गौरव होतो. अशाच प्रकारे शिंदे यांचा इथे गौरव होत आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे