शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘वसंतदादा’चा गाळप परवाना रोखला

By admin | Updated: November 18, 2014 02:09 IST

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामातील ३१ कोटी रुपयांची ऊसबिले दिली नसल्याने साखर आयुक्तांनी या कारखान्याचा यंदाच्या हंगामाचा परवाना रोखला आहे

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामातील ३१ कोटी रुपयांची ऊसबिले दिली नसल्याने साखर आयुक्तांनी या कारखान्याचा यंदाच्या हंगामाचा परवाना रोखला आहे. शेतकऱ्यांचे थकीत बील दिल्यानंतरच परवाना देण्यात येईल, असे आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे कारखान्याचा यंदाचा हंगाम सुरू होण्यात अडचणी निर्माण झाल्या असून, कार्यक्षेत्रातील उसाच्या गाळपाचा प्रश्न गंभीर बनला आहे.वसंतदादा कारखान्याकडे शेतकऱ्यांची ऊसबीले, जिल्हा बँक आणि व्यापाऱ्यांची देणी थकली आहेत. कारखान्याने ही देणी भागवण्यासाठी २१ एकर जागा विक्रीला काढली आहे. मात्र विक्री प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ऊसबिले अद्यापही दिलेली नाहीत. त्यामुळे कारखान्याच्या यंदाच्या हंगामाबाबत उलट-सुलट चर्चा रंगू लागली. मात्र कारखान्याने गळीत हंगामाची पूर्ण तयारी केली. १० नोव्हेंबरला बॉयलर पेटवण्यात आला.तथापि, कारखान्याने मागील हंगामातील ऊसबीले दिली नसल्याबाबत शेतकरी संघटनेने पुणे येथील साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन साखर आयुक्तालय येथील प्रादेशिक सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी यंदाच्या गळीत हंगामाचा कारखान्याचा परवाना रोखला आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना शेळके म्हणाले की, वसंतदादा कारखान्याने २०१४-१५ वर्षातील गाळप परवान्यासाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांची बिले दिलेली नाहीत, अशा तक्रारी होत्या. वस्तुस्थिती पाहिली असता त्यास दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे अद्यापि कारखान्यास गाळप परवाना दिलेला नाही. सर्व बिले भागविल्याचा दाखला दिल्यास त्यांना परवाना मिळू शकतो.याबाबत कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)