शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

फडणवीस उद्यापासून काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात का? काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 20:57 IST

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई : महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्याशी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आणि उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकले. राज्यपाल पुढील काळात कोणते पाऊल उचलतात हे पहावे लागेल. त्यांच्यावर जबाबदारी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. 

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आमच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी आकडा नाही. जनतेचा कौल पाहता भाजपाने पुढाकार घेऊन सत्ता स्थापन करायला हवी होती. आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राज्यपाल प्रक्रिया सुरू करतील. बिगर भाजपा सरकार यावे ही कल्पना योग्य आहे मात्र ते कसे येणार यावर विचार केलेला नाही. राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे. पवारांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली, असे  थोरात म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादीची विचारधारा एकच आहे. आम्हाला भाजपाला सत्तेबाहेर ठेवायचे आहे असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले असले तरीही विचार केलेला नाही असे सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले.  

मुख्यमंत्र्यांनी सरकारचा नाकर्तेपणा मान्य केला : पृथ्वीराज चव्हाणगेले 15 दिवस राज्यात अस्थिर परिस्थिती होती, ती संपली आहे. भाजपा सरकार बनवू शकणार नाही याची कबुली त्यांनी दिली आहे. राजीनामा देताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे म्हटले त्यावर बोलू. त्यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेने त्यांना नाकारले आहे. 220 जागा जिंकण्याची वल्गना फोल ठरली आहे. ते म्हणाले की गेली 4 वर्षे दुष्काळ पडला त्यावर उपाय करण्याऐवजी लाखो कोटींची बुलेट ट्रेन आणत कर्ज वाढवत आहेत. महाराष्ट्र कोलमडलेला असताना सरकार स्थापन करण्यास आणि मित्र पक्षांवर टीका करण्यासाठी वेळ आहे. फडणवीस सरकारने 2 टक्केही कामे पूर्ण केलेली नाहीत. भाजपाने कितीही फोडाफोडी केली तरीही त्यांचे सरकार येणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.  राज्यपालांनी लवकरात लवकर राज्याला सरकार द्यावे. मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. मुख्यमंत्री उद्यापासून काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात का? असा घटनात्मक पेच आहे. यावरही राज्यपालांनी स्पष्टीकरण द्यावे, असे चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAshok Chavanअशोक चव्हाण