शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतकरी सन्मान योजनेची पाच एकरची अट रद्द करू; मोदींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:47 IST

चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी आज मोदी यांनी नंदुरबारमध्ये सभा घेतली.

नंदुरबार : महाराष्ट्र व नंदुरबार शहीदांची भूमी आहे. परंतू शहीदांवरही काँग्रेस राजकारण करते. रेल्वे व महामार्गने राज्यातील दुर्गम भाग जोडला आहे. जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत आरक्षणाला हात लावणार नाही. आदिवासींच्या जमिनी सुरक्षित राहतील, असे आश्वासन मोदी यांनी नंदुरबारमध्ये दिले. 

चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी आज मोदी यांनी नंदुरबारमध्ये सभा घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दोन महिन्यांपूर्वी नंदुरबारातील चौधरी चहाची आठवण काढली होती, आज पुन्हा ही आठवण ताजी झाली आहे. चाय वाल्याने कडकपणे देश चालविला यापुढेही चालविणार. ऊसापासून इथेनॉल तयार करण्याचे कारखाने सुरू करायचे आहेत. ऊसाला चांगला भाव मिळावा हा प्रयत्न, यामागे असल्याचे मोदी म्हणाले. 

नियत साफ राहिली तर देशाच्या नितीला ही चांगल्या पध्दतीने राबविता येवू शकते. बांबू उत्पादनाला विशेष प्रोत्साहन देणार. शेतकरी सन्मान योजनेचा ऐतिहासिक निर्णय आहे. या योजनेची व्याप्ती वाढविणार असून 5 एकरची अटच रद्द करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

काँग्रेसने नंदुरबारातून आधार सुरू केले. परंतू आधारला निराधार केले. आधारला खरी ओळख मोदी सरकारने दिली. मजबूत सरकार, मजबूत पंतप्रधान पाहिजे असेल तर भाजपला मदत करा, चौकीदारला मजबूत करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnandurbar-pcनंदुरबार