शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून खर्च वाढवू नका!

By admin | Updated: October 8, 2016 04:37 IST

अधिकाऱ्यांना बैठकांसाठी मुंबईत बोलावण्याऐवजी त्यांना कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या साहाय्याने संवाद साधायला सांगा.

अतुल कुलकर्णी,

मुंबई- अधिकाऱ्यांना बैठकांसाठी मुंबईत बोलावण्याऐवजी त्यांना कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या साहाय्याने संवाद साधायला सांगा. खर्च आणि वेळ दोन्ही वाचेल, असा सल्ला वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.भाजपा-शिवसेनेचे मंत्री मंत्रालयात बसत नाहीत, मंत्रिमंडळ बैठकीपुरते ते मंत्रालयात येतात, दोन दिवसांच्या वर मुंबईत थांबत नाहीत, अशा तक्रारी वाढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्याचे वेळापत्रक सर्व मंत्र्यांना १६ सप्टेंबर रोजी पाठवले होते आणि त्यावर अभिप्रायही मागवला होता. पण अद्याप कोणीही उत्तर दिले नाही, असे स्वत: मुख्यमंत्र्यांनीच लोकमतशी बोलताना सांगितले होते. पण मुख्यमंत्री कार्यालयातील पत्रव्यवहार कदाचित मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला नसावा, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. मुख्यमंत्र्यांचे पत्र येताच आपण त्यावर दोन-तीन दिवसांतच उत्तर दिले आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, असेही ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बैठकांचेही वेळापत्रक आखले होते. पण त्यास वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे त्याला विरोध दर्शविला आहे. जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालये व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधेद्वारे जोडलेली असताना क्षेत्रीय कार्यालयांच्या आढाव्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावण्यापेक्षा या यंत्रणेचा अधिकाधिक क्षमतेने उपयोग करण्याचे सोडून प्रत्येक मंत्री जर जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावू लागला तर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी थांबू शकणार नाहीत. त्यापेक्षा त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सवर संवाद साधला तर वेळ, श्रम आणि पैशाची बचत होईल, असे मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे.>कांद्याच्या मदतीसाठीचा प्रस्ताव अद्याप केंद्राला गेलेला नाही. वर्षभर आदिवासी मुलांना सोयी मिळालेल्या नाहीत, शिक्षक संप करत आहेत. मंत्रालयात बसून काम करण्याऐवजी दर दोन महिन्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या व त्यातून पैसे काढायचे एवढेच काम सध्या सुरू आहे.- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद>मंत्र्यांना मंत्रालयात येऊन बसा आणि काम करा हे सांगावे लागते यावरून हे सरकार किती अधोगतीला चालले आहे हे दिसून येते. मंत्रीच जर ऐकत नसतील तर अधिकारी तरी या सरकारचे कसे ऐकतील?- राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा