शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

‘जीवनदायी’ ठरणारे निवडुंग मृत्यूपंथाला!

By admin | Updated: September 11, 2015 23:40 IST

संवर्धन गरजेचे : कमजोर हृदयाला बळकटी देण्याचे काम

श्रीकांत चाळके - खेड --विज्ञानाने सर्वदूर शोध लावल्यानंतरही काही वनस्पती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत़ यात कडुनिंबासारखी वनस्पती अनेक शारीरिक कमजोरींवर गुणकारी आहे़ मात्र, हृदय कमजोर झाल्यास त्याला बळकटी आणून धडधड सामान्य करणारा आणि आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ संबोधलेला निवडूंग दुर्मिळ झाला आहे़ निवडूंगचे विविध गुण जोपासण्यात तसेच त्याचे संवर्धन करण्यात शासन पातळीवर उदासीनता दिसून येत असल्याने बहुगुणी असलेला हा निवडूंग आता मृत्यूपंथाला लागला आहे़सिमेंटच्या वाढलेल्या जंगलात आपल्यावर रासायनिक फवारे मारलेली आणि पावडर टाकून अकाली कृत्रिम पिकवलेली फळे खाण्याची वेळ आली आहे़ अशा काळात आयुर्वेदाने वाखाणलेली नागाची फणी आकाराचे अथवा पंचकोनी निवडूंग डोंगरदऱ्यांतून लुप्त होत चालले आहे.़ हृदयाची दुर्बलता निवडूंग रसाने दूर होते़, असे आयुर्वेदात म्हटले आहे. पूर्वी कोकणातील डोंगरदऱ्यांमध्ये निवडूंग नजरेला पडत असे़ मात्र, येथील निवडुंगांना फळे येत नव्हती़ या निवडुंगाचा कुंपणासाठी चांगला वापर होत असे. कोकणात बांधावर कुंपणात दिसणारा निवडूंग तसेच दोन दशके कोकणात फळरहीत आढळणारा निवडूंग आज दुर्मीळ झाला आहे.़ मराठवाडा विभागात डोंगरदऱ्यांतून पूर्वी मुबलक प्रमाणात या फळरहीत निवडुंगाचे दर्शन होत होते़ याच निवडुंगाच्या फळांचा उपयोग शरिरातील धोकादायक आजारांवर होत आहे़ असे हे बहुगणी आणि दीर्घकालीन उपयोगी असलेले निवडूंग दुर्मीळ होऊ लागले आहे. निवडूंंग उष्ण कटिबंध आणि ओसाड जंगल व दऱ्याखाऱ्यातून आढळते़ डोंगरदऱ्यातील शेतीला कुंपण म्हणूनही याचा वापर होतो़ पूर्वी आदिवासी लोक द्रोण, पत्रावळी तसेच बिडी तयार करण्यासाठी पळसाची पाने तोडण्यासाठी जात असत तेव्हा निवडुंगाची पिकलेली फळे खाऊन ते या रानमेव्याचा आस्वाद घेत. निवडुंगाच्या रस सेवनाने भुक वाढते. कफ विकारावरही हे गुणकारी आहे.़ सतत होणारा मूत्रविकार तसेच दाह, हृदयविकारावर या फळाचा रस गुणकारी आहे़ या गुणकारी निवडुंगाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.बंजारा समाज व आदीवासी लोक निवडुंगाची बोंड आवडीने खातात़, असे येथील भरणे व खेड परिसरातील आयुर्वेदाचार्य सांगतात़ या फळात ४१ टक्के शर्करा, साडेसहा टक्के मांसजन्य घटक, ३० टक्के साखर असते व उर्वरीत भाग चोथा असतो़ शिशिर ऋतुत या झाडांना फळे येतात. फळांपासून सरबत केले जाते तर काही ठिकाणी फळे भाजून खाल्ली जातात. कफ व दम्यासाठी हे गुणकारी आहे़ आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ म्हणून याचा आवर्जून उल्लेख केला असला तरी हे निवडूंग आता मृत्यूपंथाला लागले आहे़