शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

‘जीवनदायी’ ठरणारे निवडुंग मृत्यूपंथाला!

By admin | Updated: September 11, 2015 23:40 IST

संवर्धन गरजेचे : कमजोर हृदयाला बळकटी देण्याचे काम

श्रीकांत चाळके - खेड --विज्ञानाने सर्वदूर शोध लावल्यानंतरही काही वनस्पती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत़ यात कडुनिंबासारखी वनस्पती अनेक शारीरिक कमजोरींवर गुणकारी आहे़ मात्र, हृदय कमजोर झाल्यास त्याला बळकटी आणून धडधड सामान्य करणारा आणि आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ संबोधलेला निवडूंग दुर्मिळ झाला आहे़ निवडूंगचे विविध गुण जोपासण्यात तसेच त्याचे संवर्धन करण्यात शासन पातळीवर उदासीनता दिसून येत असल्याने बहुगुणी असलेला हा निवडूंग आता मृत्यूपंथाला लागला आहे़सिमेंटच्या वाढलेल्या जंगलात आपल्यावर रासायनिक फवारे मारलेली आणि पावडर टाकून अकाली कृत्रिम पिकवलेली फळे खाण्याची वेळ आली आहे़ अशा काळात आयुर्वेदाने वाखाणलेली नागाची फणी आकाराचे अथवा पंचकोनी निवडूंग डोंगरदऱ्यांतून लुप्त होत चालले आहे.़ हृदयाची दुर्बलता निवडूंग रसाने दूर होते़, असे आयुर्वेदात म्हटले आहे. पूर्वी कोकणातील डोंगरदऱ्यांमध्ये निवडूंग नजरेला पडत असे़ मात्र, येथील निवडुंगांना फळे येत नव्हती़ या निवडुंगाचा कुंपणासाठी चांगला वापर होत असे. कोकणात बांधावर कुंपणात दिसणारा निवडूंग तसेच दोन दशके कोकणात फळरहीत आढळणारा निवडूंग आज दुर्मीळ झाला आहे.़ मराठवाडा विभागात डोंगरदऱ्यांतून पूर्वी मुबलक प्रमाणात या फळरहीत निवडुंगाचे दर्शन होत होते़ याच निवडुंगाच्या फळांचा उपयोग शरिरातील धोकादायक आजारांवर होत आहे़ असे हे बहुगणी आणि दीर्घकालीन उपयोगी असलेले निवडूंग दुर्मीळ होऊ लागले आहे. निवडूंंग उष्ण कटिबंध आणि ओसाड जंगल व दऱ्याखाऱ्यातून आढळते़ डोंगरदऱ्यातील शेतीला कुंपण म्हणूनही याचा वापर होतो़ पूर्वी आदिवासी लोक द्रोण, पत्रावळी तसेच बिडी तयार करण्यासाठी पळसाची पाने तोडण्यासाठी जात असत तेव्हा निवडुंगाची पिकलेली फळे खाऊन ते या रानमेव्याचा आस्वाद घेत. निवडुंगाच्या रस सेवनाने भुक वाढते. कफ विकारावरही हे गुणकारी आहे.़ सतत होणारा मूत्रविकार तसेच दाह, हृदयविकारावर या फळाचा रस गुणकारी आहे़ या गुणकारी निवडुंगाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.बंजारा समाज व आदीवासी लोक निवडुंगाची बोंड आवडीने खातात़, असे येथील भरणे व खेड परिसरातील आयुर्वेदाचार्य सांगतात़ या फळात ४१ टक्के शर्करा, साडेसहा टक्के मांसजन्य घटक, ३० टक्के साखर असते व उर्वरीत भाग चोथा असतो़ शिशिर ऋतुत या झाडांना फळे येतात. फळांपासून सरबत केले जाते तर काही ठिकाणी फळे भाजून खाल्ली जातात. कफ व दम्यासाठी हे गुणकारी आहे़ आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ म्हणून याचा आवर्जून उल्लेख केला असला तरी हे निवडूंग आता मृत्यूपंथाला लागले आहे़