शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘जीवनदायी’ ठरणारे निवडुंग मृत्यूपंथाला!

By admin | Updated: September 11, 2015 23:40 IST

संवर्धन गरजेचे : कमजोर हृदयाला बळकटी देण्याचे काम

श्रीकांत चाळके - खेड --विज्ञानाने सर्वदूर शोध लावल्यानंतरही काही वनस्पती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत़ यात कडुनिंबासारखी वनस्पती अनेक शारीरिक कमजोरींवर गुणकारी आहे़ मात्र, हृदय कमजोर झाल्यास त्याला बळकटी आणून धडधड सामान्य करणारा आणि आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ संबोधलेला निवडूंग दुर्मिळ झाला आहे़ निवडूंगचे विविध गुण जोपासण्यात तसेच त्याचे संवर्धन करण्यात शासन पातळीवर उदासीनता दिसून येत असल्याने बहुगुणी असलेला हा निवडूंग आता मृत्यूपंथाला लागला आहे़सिमेंटच्या वाढलेल्या जंगलात आपल्यावर रासायनिक फवारे मारलेली आणि पावडर टाकून अकाली कृत्रिम पिकवलेली फळे खाण्याची वेळ आली आहे़ अशा काळात आयुर्वेदाने वाखाणलेली नागाची फणी आकाराचे अथवा पंचकोनी निवडूंग डोंगरदऱ्यांतून लुप्त होत चालले आहे.़ हृदयाची दुर्बलता निवडूंग रसाने दूर होते़, असे आयुर्वेदात म्हटले आहे. पूर्वी कोकणातील डोंगरदऱ्यांमध्ये निवडूंग नजरेला पडत असे़ मात्र, येथील निवडुंगांना फळे येत नव्हती़ या निवडुंगाचा कुंपणासाठी चांगला वापर होत असे. कोकणात बांधावर कुंपणात दिसणारा निवडूंग तसेच दोन दशके कोकणात फळरहीत आढळणारा निवडूंग आज दुर्मीळ झाला आहे.़ मराठवाडा विभागात डोंगरदऱ्यांतून पूर्वी मुबलक प्रमाणात या फळरहीत निवडुंगाचे दर्शन होत होते़ याच निवडुंगाच्या फळांचा उपयोग शरिरातील धोकादायक आजारांवर होत आहे़ असे हे बहुगणी आणि दीर्घकालीन उपयोगी असलेले निवडूंग दुर्मीळ होऊ लागले आहे. निवडूंंग उष्ण कटिबंध आणि ओसाड जंगल व दऱ्याखाऱ्यातून आढळते़ डोंगरदऱ्यातील शेतीला कुंपण म्हणूनही याचा वापर होतो़ पूर्वी आदिवासी लोक द्रोण, पत्रावळी तसेच बिडी तयार करण्यासाठी पळसाची पाने तोडण्यासाठी जात असत तेव्हा निवडुंगाची पिकलेली फळे खाऊन ते या रानमेव्याचा आस्वाद घेत. निवडुंगाच्या रस सेवनाने भुक वाढते. कफ विकारावरही हे गुणकारी आहे.़ सतत होणारा मूत्रविकार तसेच दाह, हृदयविकारावर या फळाचा रस गुणकारी आहे़ या गुणकारी निवडुंगाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.बंजारा समाज व आदीवासी लोक निवडुंगाची बोंड आवडीने खातात़, असे येथील भरणे व खेड परिसरातील आयुर्वेदाचार्य सांगतात़ या फळात ४१ टक्के शर्करा, साडेसहा टक्के मांसजन्य घटक, ३० टक्के साखर असते व उर्वरीत भाग चोथा असतो़ शिशिर ऋतुत या झाडांना फळे येतात. फळांपासून सरबत केले जाते तर काही ठिकाणी फळे भाजून खाल्ली जातात. कफ व दम्यासाठी हे गुणकारी आहे़ आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ म्हणून याचा आवर्जून उल्लेख केला असला तरी हे निवडूंग आता मृत्यूपंथाला लागले आहे़