शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

टोलमधील गैरव्यवहाराचे ‘कॅग’ने फोडले होते बिंग

By admin | Updated: October 7, 2015 01:38 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावरील राज्यातील ५२ प्रकल्पांतील करारांवर महालेखा परीक्षकांनी २००१ सालीच

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावरील राज्यातील ५२ प्रकल्पांतील करारांवर महालेखा परीक्षकांनी २००१ सालीच गंभीर आक्षेप घेतले होते़ कंत्राटदारांना कोट्यवधींचा फायदा होत असल्याचे त्यांनी अहवालात नमूद केले होते़राज्यातील महालेखा परीक्षकांनी १९९६ ते २००१ दरम्यान ३२ रस्ते आणि २० पुलांची कामे बीओटीनुसार खासगी कंत्राटदारांना विकसित करण्याची परवानगी पीडब्ल्यूडीला दिली होती. त्यावर टोलआकारणी करण्याचीही मुभा देण्यात आली होती. कंत्राटदारांबरोबर झालेल्या कराराचे परीक्षण करताना कॅगने अनेक गंभीर आक्षेप नोंदविले होते़ त्यात दाखविण्यात आलेला वाहतुकीचे प्रमाण, दरवर्षी वाहनांच्या संख्येत होणारी वाढ आणि गुंतवणुकीवर देण्यात येणारे जादा व्याज हे न पटणारे आणि या रस्त्यांचा वापर करणाऱ्यांवर जादा भार टाकणारे असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते़ २१ प्रकल्पांत पाच महिन्यांपासून ९ वर्षांचा कालावधी जास्त देण्यात आला आहे़ त्यामुळे कंत्राटदारांना ५३३़७१ कोटी रुपये जादा टोल मिळणार आहे़ वाहनसंख्या आणि विभागाकडे असलेल्या माहितीची पडताळणी न केल्याने कंत्राटदारांना ९०़१२ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे़ वाहनांची संख्या अतिशय कमी दाखविल्याने कंत्राटदारांना ४५़१८ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे़ समिती स्थापन करण्याची मागणीमाहिती आयुक्तांच्या दणक्यामुळे पीडब्ल्यूडी आणि एमएसआरडीसी यांनी ही कागदपत्रे व करार उघड केले आहेत़ त्यातील आकडेवारीमधील विसंगती लक्षात घेता, त्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे़ टोलचा हा झोल संपविण्यासाठी शासनाने तातडीने एक समिती स्थापन करावी़ त्यात कंत्राटदारांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, वाहतूकदार संघटना आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे़