शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

टोलमधील गैरव्यवहाराचे ‘कॅग’ने फोडले होते बिंग

By admin | Updated: October 7, 2015 01:38 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावरील राज्यातील ५२ प्रकल्पांतील करारांवर महालेखा परीक्षकांनी २००१ सालीच

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावरील राज्यातील ५२ प्रकल्पांतील करारांवर महालेखा परीक्षकांनी २००१ सालीच गंभीर आक्षेप घेतले होते़ कंत्राटदारांना कोट्यवधींचा फायदा होत असल्याचे त्यांनी अहवालात नमूद केले होते़राज्यातील महालेखा परीक्षकांनी १९९६ ते २००१ दरम्यान ३२ रस्ते आणि २० पुलांची कामे बीओटीनुसार खासगी कंत्राटदारांना विकसित करण्याची परवानगी पीडब्ल्यूडीला दिली होती. त्यावर टोलआकारणी करण्याचीही मुभा देण्यात आली होती. कंत्राटदारांबरोबर झालेल्या कराराचे परीक्षण करताना कॅगने अनेक गंभीर आक्षेप नोंदविले होते़ त्यात दाखविण्यात आलेला वाहतुकीचे प्रमाण, दरवर्षी वाहनांच्या संख्येत होणारी वाढ आणि गुंतवणुकीवर देण्यात येणारे जादा व्याज हे न पटणारे आणि या रस्त्यांचा वापर करणाऱ्यांवर जादा भार टाकणारे असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते़ २१ प्रकल्पांत पाच महिन्यांपासून ९ वर्षांचा कालावधी जास्त देण्यात आला आहे़ त्यामुळे कंत्राटदारांना ५३३़७१ कोटी रुपये जादा टोल मिळणार आहे़ वाहनसंख्या आणि विभागाकडे असलेल्या माहितीची पडताळणी न केल्याने कंत्राटदारांना ९०़१२ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे़ वाहनांची संख्या अतिशय कमी दाखविल्याने कंत्राटदारांना ४५़१८ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे़ समिती स्थापन करण्याची मागणीमाहिती आयुक्तांच्या दणक्यामुळे पीडब्ल्यूडी आणि एमएसआरडीसी यांनी ही कागदपत्रे व करार उघड केले आहेत़ त्यातील आकडेवारीमधील विसंगती लक्षात घेता, त्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे़ टोलचा हा झोल संपविण्यासाठी शासनाने तातडीने एक समिती स्थापन करावी़ त्यात कंत्राटदारांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, वाहतूकदार संघटना आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे़