शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

विविध विभागांच्या गैरकारभारावर कॅगचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 03:15 IST

नागपूर गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने नागपूर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केल्यामुळे १२४.२0 कोटी विक्री किंमत दिल्यानंतरही नागपूरच्या दोन गृहनिर्माण योजनेचे लाभार्थी ३ ते ४ वर्षें उलटूनही घरांपासून वंचित राहिले.

मुंबई : भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी सामान्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध विभागांच्या कामकाजाचे अनेक गंभीर निष्कर्ष आपल्या अहवालातून समोर आणले आहेत. यामुळे सरकारचे काही ठिकाणी आर्थिक नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी विकासकांना अवाजवी फायदे झाले आहेत.महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम या दोन्ही विभागांनी शासकीय कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ६.७१ कोटी रुपये खर्च करून बांधलेली शासकीय राज्यगृह इमारत पाच वर्षांपासून अधिक काळ विनावापर पडून राहिली. त्यामुळे मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिलांसाठी अतिरिक्त निवास उपलब्ध करून देण्याच्या योजनाच फोल ठरल्याचे कॅगने म्हटले आहे.नागपूर गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने नागपूर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केल्यामुळे १२४.२0 कोटी विक्री किंमत दिल्यानंतरही नागपूरच्या दोन गृहनिर्माण योजनेचे लाभार्थी ३ ते ४ वर्षें उलटूनही घरांपासून वंचित राहिले. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास योजनांना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने दिलेल्या चुकीच्या मंजुरीमुळे बिल्डरचा ८.६४ कोटीचा आर्थिक फायदा झाला. शिवाय ५९.७६ कोटींचे ९६0.४६ चौरस मीटर एवढे अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळ बिल्डरने हस्तांतरीतच केले नाही.झाले आर्थिक नुकसानबिल्डरला वाटप केलेल्या संक्रमण गाळ्यांच्या भाडे व सेवाशुल्काच्या सुमार वसुलीविषयी संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे व पुनर्बांधणी केलेल्या गाळ्यांची विक्री करण्यासाठी विकासकाला दिलेली परवानगी काढून घेण्याची तसेच येणे असलेली रक्कम जमीन महसूल थकबाकी म्हणून वसूल करण्याची शिफारस लोकलेखा समितीने केली होती. ९८.९१ कोटी रकमेच्या वसुलीसाठी विकासकाविरुद्ध कारवाई करण्यात झालेल्या विलंबामुळे म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे आर्थिक नुकसान झाले, असेही कॅगने म्हटले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र