शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

‘कॅशलेस’ची क्रेझ

By admin | Updated: January 1, 2017 02:17 IST

जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या गुमथी येथील तरुणांमध्ये ‘कॅशलेस’ची जबदरस्त क्रेझ आहे. गावातील ५० टक्के नागरिकांकडे

कोराडी (नागपूर) : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या गुमथी येथील तरुणांमध्ये ‘कॅशलेस’ची जबदरस्त क्रेझ आहे. गावातील ५० टक्के नागरिकांकडे स्मार्ट फोन असून, ‘कॅशलेस’च्या दिशेने त्यांनी पाऊल टाकले आहे. गेल्या दीड महिन्यात गावातील मोठे आर्थिक व्यवहार ‘कॅशलेस’ झाले असून, याची टक्केवारी ९ आहे. यासाठी नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग, आरटीजीएस व चेक हा पर्याय नागरिकांनी स्वीकारला आहे. गावातील किरकोळ आर्थिक व्यवहार रोखीनेच केले जात आहेत. मात्र, तांत्रिक सुविधांअभावी त्यात अडचणी येत आहेत.गाव : गुमथीगावचे नाव : गुमथी, ता. कामठी, जि. नागपूरजिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर : १५ किलोमीटर.बॅँक/ पतसंस्थांची संख्या : एकही नाही.पोस्ट आॅफिस : आहेएटीएम केंद्र : नाही.वाहतूक सुविधा : एसटी बस जात नाही, खासगी वाहने.वीजपुरवठा : वीजपुरवठा अखंडित.इंटरनेट सुविधा : आहे.कनेक्टिव्हिटी : अधूनमधून तुटते.दोन महिन्यांत कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले का? : किरकोळ प्रमाणातपरंपरागत पद्धतीने व्यवहार करणाऱ्या खातेदारांना कॅशलेस व्यवहाराचे फायदे, विश्वासार्हता पटवून देण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. नवीन पिढी कॅशलेससाठी सकारात्मक आहे. - अंजली आशिष मोरे, उपसरपंच, गुमथी.गुमथी ग्रामपंचायत कार्यालयात वाय-फायच्या माध्यमातून विनामूल्य इंटरनेटसेवा उपलब्ध आहे, परंतु कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेक अडचणी येतात. कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी इंटरनेट क्षमता वाढवावी, तसेच इंटरनेट सेवा मोफत द्यावी.- गौतम मानवटकर, नागरिक, गुमथी.कॅशलेस व्यवहार सोयीचे असले, तरी त्यासाठी लागणारी संसाधने व तंत्रज्ञान ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने अडचणी येतात. गावातील लहान आर्थिक व्यवहार करताना समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे गावामध्ये कॅशलेस व्यवहार त्रासदायक ठरत आहेत. - नलिनी ढोक, सरपंच, गुमथीगावातील भाजीविक्रेते, शेतमजूर, न्हावी, किराणा दुकानदार यांच्याशी केले जाणारे आर्थिक व्यवहार रोख रकमेत करण्याची सवय पडली आहे. जनधन योजनेंतर्गत बँकेत खाते उघडले असले, तरी अनेकांना बँकिंग व्यवहार करण्याची सवय नाही. बँकिंग व्यवहाराची सवय नसल्याने कॅशलेसमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. - सुधाकर तकीत, नागरिक, गुमथी.कॅशलेस व्यवहारांमुळे तरुण मंडळी उत्साहित आहेत. कारण बहुतांश तरुण स्मार्ट फोनचा वापर मोठ्या करतात. त्यामुळे ते फोनवरून सहज आर्थिक व्यवहार करतात. शेतकरी व शेतमजुरांना मात्र वेळेचा अभाव व पुरेसे ज्ञान नसल्यामुळे कॅशलेस व्यवहास करण्यात अडचणी येत आहेत.- विश्वेश्वर बोलधने, नागरिक, गुमथी.