शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

‘कॅशलेस’ची क्रेझ

By admin | Updated: January 1, 2017 02:17 IST

जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या गुमथी येथील तरुणांमध्ये ‘कॅशलेस’ची जबदरस्त क्रेझ आहे. गावातील ५० टक्के नागरिकांकडे

कोराडी (नागपूर) : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या गुमथी येथील तरुणांमध्ये ‘कॅशलेस’ची जबदरस्त क्रेझ आहे. गावातील ५० टक्के नागरिकांकडे स्मार्ट फोन असून, ‘कॅशलेस’च्या दिशेने त्यांनी पाऊल टाकले आहे. गेल्या दीड महिन्यात गावातील मोठे आर्थिक व्यवहार ‘कॅशलेस’ झाले असून, याची टक्केवारी ९ आहे. यासाठी नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग, आरटीजीएस व चेक हा पर्याय नागरिकांनी स्वीकारला आहे. गावातील किरकोळ आर्थिक व्यवहार रोखीनेच केले जात आहेत. मात्र, तांत्रिक सुविधांअभावी त्यात अडचणी येत आहेत.गाव : गुमथीगावचे नाव : गुमथी, ता. कामठी, जि. नागपूरजिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर : १५ किलोमीटर.बॅँक/ पतसंस्थांची संख्या : एकही नाही.पोस्ट आॅफिस : आहेएटीएम केंद्र : नाही.वाहतूक सुविधा : एसटी बस जात नाही, खासगी वाहने.वीजपुरवठा : वीजपुरवठा अखंडित.इंटरनेट सुविधा : आहे.कनेक्टिव्हिटी : अधूनमधून तुटते.दोन महिन्यांत कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले का? : किरकोळ प्रमाणातपरंपरागत पद्धतीने व्यवहार करणाऱ्या खातेदारांना कॅशलेस व्यवहाराचे फायदे, विश्वासार्हता पटवून देण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. नवीन पिढी कॅशलेससाठी सकारात्मक आहे. - अंजली आशिष मोरे, उपसरपंच, गुमथी.गुमथी ग्रामपंचायत कार्यालयात वाय-फायच्या माध्यमातून विनामूल्य इंटरनेटसेवा उपलब्ध आहे, परंतु कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेक अडचणी येतात. कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी इंटरनेट क्षमता वाढवावी, तसेच इंटरनेट सेवा मोफत द्यावी.- गौतम मानवटकर, नागरिक, गुमथी.कॅशलेस व्यवहार सोयीचे असले, तरी त्यासाठी लागणारी संसाधने व तंत्रज्ञान ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने अडचणी येतात. गावातील लहान आर्थिक व्यवहार करताना समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे गावामध्ये कॅशलेस व्यवहार त्रासदायक ठरत आहेत. - नलिनी ढोक, सरपंच, गुमथीगावातील भाजीविक्रेते, शेतमजूर, न्हावी, किराणा दुकानदार यांच्याशी केले जाणारे आर्थिक व्यवहार रोख रकमेत करण्याची सवय पडली आहे. जनधन योजनेंतर्गत बँकेत खाते उघडले असले, तरी अनेकांना बँकिंग व्यवहार करण्याची सवय नाही. बँकिंग व्यवहाराची सवय नसल्याने कॅशलेसमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. - सुधाकर तकीत, नागरिक, गुमथी.कॅशलेस व्यवहारांमुळे तरुण मंडळी उत्साहित आहेत. कारण बहुतांश तरुण स्मार्ट फोनचा वापर मोठ्या करतात. त्यामुळे ते फोनवरून सहज आर्थिक व्यवहार करतात. शेतकरी व शेतमजुरांना मात्र वेळेचा अभाव व पुरेसे ज्ञान नसल्यामुळे कॅशलेस व्यवहास करण्यात अडचणी येत आहेत.- विश्वेश्वर बोलधने, नागरिक, गुमथी.