शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

‘कॅशलेस’ची क्रेझ

By admin | Updated: January 1, 2017 02:17 IST

जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या गुमथी येथील तरुणांमध्ये ‘कॅशलेस’ची जबदरस्त क्रेझ आहे. गावातील ५० टक्के नागरिकांकडे

कोराडी (नागपूर) : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या गुमथी येथील तरुणांमध्ये ‘कॅशलेस’ची जबदरस्त क्रेझ आहे. गावातील ५० टक्के नागरिकांकडे स्मार्ट फोन असून, ‘कॅशलेस’च्या दिशेने त्यांनी पाऊल टाकले आहे. गेल्या दीड महिन्यात गावातील मोठे आर्थिक व्यवहार ‘कॅशलेस’ झाले असून, याची टक्केवारी ९ आहे. यासाठी नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग, आरटीजीएस व चेक हा पर्याय नागरिकांनी स्वीकारला आहे. गावातील किरकोळ आर्थिक व्यवहार रोखीनेच केले जात आहेत. मात्र, तांत्रिक सुविधांअभावी त्यात अडचणी येत आहेत.गाव : गुमथीगावचे नाव : गुमथी, ता. कामठी, जि. नागपूरजिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर : १५ किलोमीटर.बॅँक/ पतसंस्थांची संख्या : एकही नाही.पोस्ट आॅफिस : आहेएटीएम केंद्र : नाही.वाहतूक सुविधा : एसटी बस जात नाही, खासगी वाहने.वीजपुरवठा : वीजपुरवठा अखंडित.इंटरनेट सुविधा : आहे.कनेक्टिव्हिटी : अधूनमधून तुटते.दोन महिन्यांत कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले का? : किरकोळ प्रमाणातपरंपरागत पद्धतीने व्यवहार करणाऱ्या खातेदारांना कॅशलेस व्यवहाराचे फायदे, विश्वासार्हता पटवून देण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. नवीन पिढी कॅशलेससाठी सकारात्मक आहे. - अंजली आशिष मोरे, उपसरपंच, गुमथी.गुमथी ग्रामपंचायत कार्यालयात वाय-फायच्या माध्यमातून विनामूल्य इंटरनेटसेवा उपलब्ध आहे, परंतु कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेक अडचणी येतात. कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी इंटरनेट क्षमता वाढवावी, तसेच इंटरनेट सेवा मोफत द्यावी.- गौतम मानवटकर, नागरिक, गुमथी.कॅशलेस व्यवहार सोयीचे असले, तरी त्यासाठी लागणारी संसाधने व तंत्रज्ञान ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने अडचणी येतात. गावातील लहान आर्थिक व्यवहार करताना समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे गावामध्ये कॅशलेस व्यवहार त्रासदायक ठरत आहेत. - नलिनी ढोक, सरपंच, गुमथीगावातील भाजीविक्रेते, शेतमजूर, न्हावी, किराणा दुकानदार यांच्याशी केले जाणारे आर्थिक व्यवहार रोख रकमेत करण्याची सवय पडली आहे. जनधन योजनेंतर्गत बँकेत खाते उघडले असले, तरी अनेकांना बँकिंग व्यवहार करण्याची सवय नाही. बँकिंग व्यवहाराची सवय नसल्याने कॅशलेसमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. - सुधाकर तकीत, नागरिक, गुमथी.कॅशलेस व्यवहारांमुळे तरुण मंडळी उत्साहित आहेत. कारण बहुतांश तरुण स्मार्ट फोनचा वापर मोठ्या करतात. त्यामुळे ते फोनवरून सहज आर्थिक व्यवहार करतात. शेतकरी व शेतमजुरांना मात्र वेळेचा अभाव व पुरेसे ज्ञान नसल्यामुळे कॅशलेस व्यवहास करण्यात अडचणी येत आहेत.- विश्वेश्वर बोलधने, नागरिक, गुमथी.