शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

महिनाअखेर मुंबई होणार शंभर टक्के अनलॉक, या आठवड्यात मुंबईकरांचे १०० टक्के लसीकरण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 06:22 IST

राज्य सरकारने ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झालेल्या शहरांमधील सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र मुंबईत अद्यापही हॉटेल आणि लग्नसमारंभ येथील एकूण उपस्थितीची मर्यादा आहे.

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. दररोजची रुग्ण संख्याही पाचशेहून कमी असल्याने मुंबईतील सर्व निर्बंध लवकरच शिथिल होणार आहेत. पुढच्या आठवड्याभरात नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण होत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत मुंबई शंभर टक्के अनलॉक होईल, असे संकेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.

राज्य सरकारने ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झालेल्या शहरांमधील सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र मुंबईत अद्यापही हॉटेल आणि लग्नसमारंभ येथील एकूण उपस्थितीची मर्यादा आहे. येत्या आठवड्याभरात मुंबईत शंभर टक्के लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईत शंभर टक्के अनलॉक केला जाऊ शकतो, अशी शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा ऑफलाईनही... ऑनलाईनही !- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांवर लेखी परीक्षेची सक्ती करू नका. परीक्षेसाठी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षेचाही पर्याय उपलब्ध करून द्या, अशी सूचना मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांना केली. - यामुळे अजूनही ऑनलाइन शिक्षणालाच पसंती देणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांसमोर ऑफलाइन तसेच ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे परिपत्रक मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी शाळांना पाठवले आहे. 

शनिवार- रविवारीही शाळा सुरू ठेवा - उपमुख्यमंत्री -कोरोनामुळे विद्यार्थ्यांची पावणेदोन वर्षे वाया गेली आहेत. हे नुकसान भरून निघाले पाहिजे. त्यामुळे राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवारी शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. आधीच सततच्या सुट्ट्यांमुळे मुलांचे खूप नुकसान झाले आहे. आता पुन्हा शनिवार, रविवार सुट्टी कशाला? त्यापेक्षा मुलांना शिकवा व झालेले नुकसान भरून काढा. कोरोनामुळे राज्यातील ऑनलाइन शाळांचा उपक्रम यशस्वी झाला.  पण, प्रत्यक्ष शाळेची मजा ऑनलाइनमध्ये येत नाही. त्यामुळे शाळा ऑफलाइन पद्धतीने भरवण्यावर त्यांनी भर दिला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्रCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस