शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महिनाअखेर मुंबई होणार शंभर टक्के अनलॉक, या आठवड्यात मुंबईकरांचे १०० टक्के लसीकरण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 06:22 IST

राज्य सरकारने ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झालेल्या शहरांमधील सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र मुंबईत अद्यापही हॉटेल आणि लग्नसमारंभ येथील एकूण उपस्थितीची मर्यादा आहे.

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. दररोजची रुग्ण संख्याही पाचशेहून कमी असल्याने मुंबईतील सर्व निर्बंध लवकरच शिथिल होणार आहेत. पुढच्या आठवड्याभरात नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण होत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत मुंबई शंभर टक्के अनलॉक होईल, असे संकेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.

राज्य सरकारने ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झालेल्या शहरांमधील सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र मुंबईत अद्यापही हॉटेल आणि लग्नसमारंभ येथील एकूण उपस्थितीची मर्यादा आहे. येत्या आठवड्याभरात मुंबईत शंभर टक्के लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईत शंभर टक्के अनलॉक केला जाऊ शकतो, अशी शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा ऑफलाईनही... ऑनलाईनही !- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांवर लेखी परीक्षेची सक्ती करू नका. परीक्षेसाठी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षेचाही पर्याय उपलब्ध करून द्या, अशी सूचना मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांना केली. - यामुळे अजूनही ऑनलाइन शिक्षणालाच पसंती देणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांसमोर ऑफलाइन तसेच ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे परिपत्रक मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी शाळांना पाठवले आहे. 

शनिवार- रविवारीही शाळा सुरू ठेवा - उपमुख्यमंत्री -कोरोनामुळे विद्यार्थ्यांची पावणेदोन वर्षे वाया गेली आहेत. हे नुकसान भरून निघाले पाहिजे. त्यामुळे राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवारी शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. आधीच सततच्या सुट्ट्यांमुळे मुलांचे खूप नुकसान झाले आहे. आता पुन्हा शनिवार, रविवार सुट्टी कशाला? त्यापेक्षा मुलांना शिकवा व झालेले नुकसान भरून काढा. कोरोनामुळे राज्यातील ऑनलाइन शाळांचा उपक्रम यशस्वी झाला.  पण, प्रत्यक्ष शाळेची मजा ऑनलाइनमध्ये येत नाही. त्यामुळे शाळा ऑफलाइन पद्धतीने भरवण्यावर त्यांनी भर दिला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्रCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस