शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

शिकाऊ डॉक्टरांवर तालुक्याचा भार

By admin | Updated: July 14, 2017 03:33 IST

रुग्णालयातील एकमेव डॉक्टर आजारी पडल्यामुळे सध्या या संपूर्ण रुग्णालयाचा भार आता शिकाऊ (इंटर्नी) डॉक्टरांवर येऊन पडला

राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : येथील रुग्णालयातील एकमेव डॉक्टर आजारी पडल्यामुळे सध्या या संपूर्ण रुग्णालयाचा भार आता शिकाऊ (इंटर्नी) डॉक्टरांवर येऊन पडला आहे. त्यामुळे गर्भवती, प्रसूतिच्या उंबरठ्यावर असलेल्या माता तसेच विंचू आणि सर्पदंशाचे व साथीच्या आजारांचे रुग्ण यांना खासगी रुग्णालयातून महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. किंवा लांबच्या शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी धाव घ्यावी लागते आहे.तालुक्यातील ग्रामीणभागात वातारणातील बदलानुसार आजार बळावत असून विक्रमगड ग्रामीण रुग्णालयावर दैनंदिन ३०० ते ३५० बाह्य रुग्णांचा वाढता भार पडतो आहे. त्यामध्ये मलेरिया, टायफाईड, सर्पदंश व गरोदर महिला या रुग्णांचा समावेश जास्त असून त्यांच्यावर सध्या आवश्यकते उपचार होत नाहीत. कारण या रुग्णालयास एकच डॉक्टर होते. आता ते ही आजारी पडल्याने तीन आठवडयापासून येथील रुग्णालयाचा कार्यभार हा शिकाऊ डॉक्टरांवर (इंटर्नी) पडला आहे. या डॉक्टरांकडे अनुभव नाही ते फक्त प्राथमिक उपचारा व्यतिरिक्त काहीही करु शकत नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना येथे उपाचार मिळत नसल्याने जव्हार, डहाणू, ठाणे, पालघर वा अन्य ठिकाणी पाठविले जाते व यामध्ये रुग्णाची मोठयाप्रमाणवर हेळसांड होते आहे़. त्यामुळे एखादा रुग्ण दगावल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातो आहे़येथे कर्मचारीही अपुरे असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांस तारेवरची कसरत करावी लागते आहे़ या रुग्णालयात अधीक्षकासह, वैद्यकीय अधिकारी व इतर वर्गाची पदे रिक्त आहेत. त्यात एकमेव वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुनील भडांगे हे गेल्या तीन आठवड्यापासून आजारी असल्याने रजेवर आहेत.़ त्यामुळे इंटर्नींना अनुभव नसतांनाही त्यांच्यावर संपूर्ण रुग्णालयाचा भार टाकण्यात आला आहे. गंभीर रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नसल्याने त्यांना रेफर केले गेले तरी अनेकदा शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसते. त्यामुळे हजारो रुपये मोजून खासगी रुग्णवाहिका घ्यावी लागते. ऐवढे करुन ज्या रुग्णालयात नेले जाते तिथे दाखल करुन घेतले जाईलच याची शाश्वती नसते. अनेकदा ते रुग्णालय आणखी दुसऱ्या रुग्णालयाकडे त्या रुग्णाला रेफर करते. म्हणजे पुन्हा रुग्णवाहिकेचा भुर्दंड वाढतो, अशी अवस्था आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकासमंत्री व पालकमंत्री विष्णू सवरा यांचा हा मतदारसंघ असून तेथील रुग्णालयाची अशी दुरावस्था आहे. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी येथील त्यांना वेळ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.़ तसेच या रुग्णालयात शासनाने आॅपरेशनसाठी लागणारी यंत्रसामुग्री दिलेली आहे़ परंतु तिचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ मात्र दिलेले नाही. त्यामुळे या सामुग्रीचा कोणताही फायदा रुग्णांना होत नाही़ या रुग्णालयाची इमारत जरी चांगली असली तरी येथे अद्यापही पूर्वीप्रमाणेच प्राथमिकच उपाचार केले जातात. हा जंगलग्रस्त परिसर असल्याने साथीचे आजार बळवतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टार व मंजूर असलेली कर्मचाऱ्यांची सर्व पदे भरलेली असणे आवश्यक आहे. तालुक्यातील ९४ गावपाडे व दीड लाख लोकसंख्येकरिता हेच मोठे एकमेव रुग्णालय आहे़खेड्यापाड्यातील व शहरातील घाणीचे साम्राज्य, खडडयातील गढूळ पाणी, उघडयावरील दूषित पदार्थ खाल्याने आजार बळावत आहे.़>अशी आहे दुर्दशासध्या खरिपाचा हंगाम सुरु असल्याने संर्प व विंचूदंशाचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत, तर घाणीचे साम्राज्य जागोजागी तयार होणारी डबकी, अस्वच्छता, तुंबलेली गटारे, सांडपाणी त्यापासून होणारी डासांची मोठी उत्पत्ती यामुळे मलेरिया, टायफाईडदेखील बळवत आहेत. त्यात कुपोषणाची भर पडलेली आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याने अशा रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड व त्रास सहन करावा लागतो आहे़