शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिकाऊ डॉक्टरांवर तालुक्याचा भार

By admin | Updated: July 14, 2017 03:33 IST

रुग्णालयातील एकमेव डॉक्टर आजारी पडल्यामुळे सध्या या संपूर्ण रुग्णालयाचा भार आता शिकाऊ (इंटर्नी) डॉक्टरांवर येऊन पडला

राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : येथील रुग्णालयातील एकमेव डॉक्टर आजारी पडल्यामुळे सध्या या संपूर्ण रुग्णालयाचा भार आता शिकाऊ (इंटर्नी) डॉक्टरांवर येऊन पडला आहे. त्यामुळे गर्भवती, प्रसूतिच्या उंबरठ्यावर असलेल्या माता तसेच विंचू आणि सर्पदंशाचे व साथीच्या आजारांचे रुग्ण यांना खासगी रुग्णालयातून महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. किंवा लांबच्या शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी धाव घ्यावी लागते आहे.तालुक्यातील ग्रामीणभागात वातारणातील बदलानुसार आजार बळावत असून विक्रमगड ग्रामीण रुग्णालयावर दैनंदिन ३०० ते ३५० बाह्य रुग्णांचा वाढता भार पडतो आहे. त्यामध्ये मलेरिया, टायफाईड, सर्पदंश व गरोदर महिला या रुग्णांचा समावेश जास्त असून त्यांच्यावर सध्या आवश्यकते उपचार होत नाहीत. कारण या रुग्णालयास एकच डॉक्टर होते. आता ते ही आजारी पडल्याने तीन आठवडयापासून येथील रुग्णालयाचा कार्यभार हा शिकाऊ डॉक्टरांवर (इंटर्नी) पडला आहे. या डॉक्टरांकडे अनुभव नाही ते फक्त प्राथमिक उपचारा व्यतिरिक्त काहीही करु शकत नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना येथे उपाचार मिळत नसल्याने जव्हार, डहाणू, ठाणे, पालघर वा अन्य ठिकाणी पाठविले जाते व यामध्ये रुग्णाची मोठयाप्रमाणवर हेळसांड होते आहे़. त्यामुळे एखादा रुग्ण दगावल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातो आहे़येथे कर्मचारीही अपुरे असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांस तारेवरची कसरत करावी लागते आहे़ या रुग्णालयात अधीक्षकासह, वैद्यकीय अधिकारी व इतर वर्गाची पदे रिक्त आहेत. त्यात एकमेव वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुनील भडांगे हे गेल्या तीन आठवड्यापासून आजारी असल्याने रजेवर आहेत.़ त्यामुळे इंटर्नींना अनुभव नसतांनाही त्यांच्यावर संपूर्ण रुग्णालयाचा भार टाकण्यात आला आहे. गंभीर रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नसल्याने त्यांना रेफर केले गेले तरी अनेकदा शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसते. त्यामुळे हजारो रुपये मोजून खासगी रुग्णवाहिका घ्यावी लागते. ऐवढे करुन ज्या रुग्णालयात नेले जाते तिथे दाखल करुन घेतले जाईलच याची शाश्वती नसते. अनेकदा ते रुग्णालय आणखी दुसऱ्या रुग्णालयाकडे त्या रुग्णाला रेफर करते. म्हणजे पुन्हा रुग्णवाहिकेचा भुर्दंड वाढतो, अशी अवस्था आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकासमंत्री व पालकमंत्री विष्णू सवरा यांचा हा मतदारसंघ असून तेथील रुग्णालयाची अशी दुरावस्था आहे. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी येथील त्यांना वेळ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.़ तसेच या रुग्णालयात शासनाने आॅपरेशनसाठी लागणारी यंत्रसामुग्री दिलेली आहे़ परंतु तिचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ मात्र दिलेले नाही. त्यामुळे या सामुग्रीचा कोणताही फायदा रुग्णांना होत नाही़ या रुग्णालयाची इमारत जरी चांगली असली तरी येथे अद्यापही पूर्वीप्रमाणेच प्राथमिकच उपाचार केले जातात. हा जंगलग्रस्त परिसर असल्याने साथीचे आजार बळवतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टार व मंजूर असलेली कर्मचाऱ्यांची सर्व पदे भरलेली असणे आवश्यक आहे. तालुक्यातील ९४ गावपाडे व दीड लाख लोकसंख्येकरिता हेच मोठे एकमेव रुग्णालय आहे़खेड्यापाड्यातील व शहरातील घाणीचे साम्राज्य, खडडयातील गढूळ पाणी, उघडयावरील दूषित पदार्थ खाल्याने आजार बळावत आहे.़>अशी आहे दुर्दशासध्या खरिपाचा हंगाम सुरु असल्याने संर्प व विंचूदंशाचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत, तर घाणीचे साम्राज्य जागोजागी तयार होणारी डबकी, अस्वच्छता, तुंबलेली गटारे, सांडपाणी त्यापासून होणारी डासांची मोठी उत्पत्ती यामुळे मलेरिया, टायफाईडदेखील बळवत आहेत. त्यात कुपोषणाची भर पडलेली आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याने अशा रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड व त्रास सहन करावा लागतो आहे़