शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 05:43 IST

५,५८७ कोटी रुपये खर्चून १३२ स्थानकांचा ‘अमृत स्थानके’ म्हणून विकास केला जात आहे.

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी २३ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

५,५८७ कोटी रुपये खर्चून १३२ स्थानकांचा ‘अमृत स्थानके’ म्हणून विकास केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, औरंगाबाद, जालना, नागपूर आणि अजनी स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरु आहे, असेही वैष्णव म्हणाले. 

राज्यात २०१४ नंतर काय झाले?

२,१०५ किलोमीटरचे नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले आहेत. ३,५८६ किलोमीटर रेल्वे लाईनचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. राज्यात १९ जिल्ह्यातून ११ वंदे भारत ट्रेन धावत आहेत.

राज्यात सध्या ४७ प्रकल्पांचे काम सुरू असून त्याची एकूण लांबी ६,९८५ किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पांसाठी १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रुपये खर्च येणार आहे.

१०६२ रेल्वे उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांमध्ये २३६ लिफ्ट, ३०२ सरकते जीने आणि ५६६ स्थानकांवर वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रासाठी ही भरीव तरतूद केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो. २००९ ते २०१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी ११७१ कोटी रुपये मिळायचे, यंदा एकाच वर्षातील तरतूद ही त्यापेक्षा २० पट अधिक आहे. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबई