शहरं
Join us  
Trending Stories
1
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
2
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
3
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
4
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
5
Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
6
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी
7
भारतासमोर चीन गुडघ्यांवर, ड्रॅगन सर्व अटी मानण्यास तयार; नक्की काय आहे प्रकरण?
8
Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या!
9
जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात पुन्हा RBI कपात करणार का? लोन होऊ शकतात आणखी स्वस्त
10
लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका अन् सीडीएससीओने ‘त्या’ ३५ औषधांवर घातली बंदी
11
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
12
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
13
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
14
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका
15
लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं
16
"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..."
17
यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान
18
भयंकर! ४०० प्रवाशांसह बोट नदीत उलटली, ५० जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता
19
दिनेश माहेश्वरी २३ व्या विधि आयोगाचे अध्यक्ष, पुण्याचे ॲड. हितेश जैन यांची सदस्यपदी निवड

महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 05:43 IST

५,५८७ कोटी रुपये खर्चून १३२ स्थानकांचा ‘अमृत स्थानके’ म्हणून विकास केला जात आहे.

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी २३ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

५,५८७ कोटी रुपये खर्चून १३२ स्थानकांचा ‘अमृत स्थानके’ म्हणून विकास केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, औरंगाबाद, जालना, नागपूर आणि अजनी स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरु आहे, असेही वैष्णव म्हणाले. 

राज्यात २०१४ नंतर काय झाले?

२,१०५ किलोमीटरचे नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले आहेत. ३,५८६ किलोमीटर रेल्वे लाईनचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. राज्यात १९ जिल्ह्यातून ११ वंदे भारत ट्रेन धावत आहेत.

राज्यात सध्या ४७ प्रकल्पांचे काम सुरू असून त्याची एकूण लांबी ६,९८५ किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पांसाठी १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रुपये खर्च येणार आहे.

१०६२ रेल्वे उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांमध्ये २३६ लिफ्ट, ३०२ सरकते जीने आणि ५६६ स्थानकांवर वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रासाठी ही भरीव तरतूद केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो. २००९ ते २०१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी ११७१ कोटी रुपये मिळायचे, यंदा एकाच वर्षातील तरतूद ही त्यापेक्षा २० पट अधिक आहे. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबई