शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

Budget 2023 : शेतीवर फक्त घाेषणांचा पाऊस, ठोस तरतूद नसल्याने शेतकऱ्यांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 11:44 IST

Budget 2023 : केंद्रीय अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी  काहीही ठाेस तरतूद नसल्याने शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली आहे. अर्थसंकल्पात सेंद्रिय शेतीचा उदाे उदाे केला आहे.

-राजू शेट्टी( स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते)

केंद्रीय अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी  काहीही ठाेस तरतूद नसल्याने शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली आहे. अर्थसंकल्पात सेंद्रिय शेतीचा उदाे उदाे केला आहे. सेंद्रिय शेतीने जर प्रश्न सुटले असते तर  या देशात हरितक्रांतीचा पर्याय अवलंबला गेला नसता. हरितक्रांतीपूर्वी देशात सेंद्रिय शेती केली जात हाेती. हरितक्रांती का करावी लागली. रासायनिक खते, हायब्रीड बियाणे का आणावी लागली? याचाही विचार हाेणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षभरात रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्याचा परिणाम ऊस उत्पादक व सर्व शेतकऱ्यांवर झालेला आहे. यावर्षी उसाचे एकरी उत्पादन ५ ते ७ टनांनी कमी झाले आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे उसाची उत्पादकता कमी झाली आहे. वाढत्या खतांच्या किंमतीचा परिणाम सर्व पिकांवर हाेऊ शकताे. या अर्थसंकल्पात ना प्रक्रिया उद्याेगाला चालना दिली, ना बाजारपेठ विकसित हाेण्यासाठी प्रयत्न केले गेले. पायाभुत सुविधांसाठी प्रयत्न हाेताना दिसत नाहीत. या अर्थसंकल्पात फक्त घाेषणांचा पाऊस झाला आहे. यापूर्वीही अशा अनेक घाेषणा झाल्या आहेत. सरकार २०२२मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार हाेते. उत्पन्न काही दुप्पट झाले नाही. मात्र, खतांच्या किमती दुप्पट झाल्या. २०१४मध्ये उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार हाेते. ताे काही दिला नाही. मात्र, उत्पादन खर्च दीडपट झाला आहे. 

बाजरी, भरड धान्याचे हब करण्याची कल्पना चांगली आहे. अख्खा जगाला भरड धान्य पुरवण्याची क्षमता आपल्या देशात आहे. पण त्यासाठी जिराईत शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे. सर्व पिकांना हमीभाव अनिवार्य करणारा कायदा संसदेने मंजूर केला पाहिजे. यावर सरकार काहीच करताना दिसत नाही. यामुळे या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यांच्या हातात काहीही पडलेले नाही.

 

टॅग्स :Farmerशेतकरी