शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Budget 2023 : शेतीवर फक्त घाेषणांचा पाऊस, ठोस तरतूद नसल्याने शेतकऱ्यांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 11:44 IST

Budget 2023 : केंद्रीय अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी  काहीही ठाेस तरतूद नसल्याने शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली आहे. अर्थसंकल्पात सेंद्रिय शेतीचा उदाे उदाे केला आहे.

-राजू शेट्टी( स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते)

केंद्रीय अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी  काहीही ठाेस तरतूद नसल्याने शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली आहे. अर्थसंकल्पात सेंद्रिय शेतीचा उदाे उदाे केला आहे. सेंद्रिय शेतीने जर प्रश्न सुटले असते तर  या देशात हरितक्रांतीचा पर्याय अवलंबला गेला नसता. हरितक्रांतीपूर्वी देशात सेंद्रिय शेती केली जात हाेती. हरितक्रांती का करावी लागली. रासायनिक खते, हायब्रीड बियाणे का आणावी लागली? याचाही विचार हाेणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षभरात रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्याचा परिणाम ऊस उत्पादक व सर्व शेतकऱ्यांवर झालेला आहे. यावर्षी उसाचे एकरी उत्पादन ५ ते ७ टनांनी कमी झाले आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे उसाची उत्पादकता कमी झाली आहे. वाढत्या खतांच्या किंमतीचा परिणाम सर्व पिकांवर हाेऊ शकताे. या अर्थसंकल्पात ना प्रक्रिया उद्याेगाला चालना दिली, ना बाजारपेठ विकसित हाेण्यासाठी प्रयत्न केले गेले. पायाभुत सुविधांसाठी प्रयत्न हाेताना दिसत नाहीत. या अर्थसंकल्पात फक्त घाेषणांचा पाऊस झाला आहे. यापूर्वीही अशा अनेक घाेषणा झाल्या आहेत. सरकार २०२२मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार हाेते. उत्पन्न काही दुप्पट झाले नाही. मात्र, खतांच्या किमती दुप्पट झाल्या. २०१४मध्ये उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार हाेते. ताे काही दिला नाही. मात्र, उत्पादन खर्च दीडपट झाला आहे. 

बाजरी, भरड धान्याचे हब करण्याची कल्पना चांगली आहे. अख्खा जगाला भरड धान्य पुरवण्याची क्षमता आपल्या देशात आहे. पण त्यासाठी जिराईत शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे. सर्व पिकांना हमीभाव अनिवार्य करणारा कायदा संसदेने मंजूर केला पाहिजे. यावर सरकार काहीच करताना दिसत नाही. यामुळे या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यांच्या हातात काहीही पडलेले नाही.

 

टॅग्स :Farmerशेतकरी