शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Budget 2020: अक्षय ऊर्जेसाठी २२ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 04:17 IST

वीज वितरण कंपन्यांची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील.

वीज क्षेत्राला उभारी देण्यासाठी सौरऊर्जेवर शेतीपंप सुरू केले, असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आणखी १५ लाख शेतकऱ्यांना सौरपंप देणार असल्याची घोषणाच अर्थसंकल्पातून केली. अक्षय ऊर्जेसाठी २२ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सांगत अन्नदात्याला ऊर्जादाता बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषत: प्रीपेड मीटर, स्मार्ट मीटरचा विचार करता घराघरात स्मार्ट मीटर बसविणार असल्याचे सांगत त्यांनी ऊर्जा क्षेत्राला उभारी देण्याचा प्रयत्न केला.

वीज वितरण कंपन्यांची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील. स्मार्ट मीटर योजनेस आणखी प्रोत्साहन दिले जाईल. नॅशनल गॅस ग्रीडचा १६ हजार २०० किमीवरून २७ हजार किमीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. घराघरांत वीज पोहोचावी याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहेत. वीज वितरण क्षेत्र आर्थिक तोट्यात आहे. मात्र यातून उभारी घेण्यासह आता स्मार्ट मीटरवर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे.

यासाठी पुढील तीन वर्षांत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील पारंपरिक मीटर हे प्रीपेट स्मार्ट मीटरमध्ये बदलण्यात येतील. आणि या सेवेंतर्गत ग्राहकांना दर निवडीसह पुरवठादाराची निवड करता येणार आहे.मार्च २०१९ मधील ३ लाख ५६ हजार १०० मेगावॅटची स्थापित क्षमता ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत वाढून ३ लाख ६४ हजार ९६० मेगावॅट झाली.

३१ मार्च २०१९ पर्यंत देशातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी १६ हजार ३२० कोटी रुपयांच्या खर्चासह २ सप्टेंबर २०१९ रोजी ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ (सौभाग्य) सुरू करण्यात आली, अशा अनेक योजना केंद्राकडून मांडण्यात आल्या असून, प्रीपेड मीटर, स्मार्ट मीटरचा उल्लेख २ जानेवारी २०१९ च्या आसपास करण्यात आला होता.

प्रीपेड मीटर योजनेत ग्राहक कमीतकमी शंभर रुपयांचा भरणा करू शकतील. प्रीपेड मीटरमध्ये ग्राहकांच्या वीज वापरानुसार आगाऊ भरणा केलेली रक्कम कमी होणार, अशी मीटरची कार्यप्रणाली आहे. ठरावीक रक्कम शिल्लक राहिल्यास ग्राहकास अलार्मद्वारे सूचना मिळणार, अशीही यंत्रणा मीटरमध्ये आहे.

टॅग्स :budget 2020बजेटbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणelectricityवीजNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारत